शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

आता सर्वांच्या नजरा तेलंगणातील निवडणुकीवर, प्रमुख पक्षांचा प्रचार जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 07:23 IST

Telangana Assembly Election 2023: तेलंगणातील जनता गेली ९ वर्षे सत्तेत असलेल्या बीआरएस सरकारला कंटाळली आहे. राज्यात भाजपची हवा दिसत असून बीआरएसचे सत्तेतून जाणे अटळ आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथील सभेत केली.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील मतदान आटोपल्यानंतर आता राजकीय पक्षांनी आपला मोर्चा तेलंगाणाकडे वळवला आहे. ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.  २ डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत.  बीआरएस सरकारचे जाणे अटळ : मोदीकामारेड्डी (तेलंगणा) -  तेलंगणातील जनता गेली ९ वर्षे सत्तेत असलेल्या बीआरएस सरकारला कंटाळली आहे. राज्यात भाजपची हवा दिसत असून बीआरएसचे सत्तेतून जाणे अटळ आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथील सभेत केली. पंतप्रधानांनी यावेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार टीका केली. प्रचारसभेत मोदी म्हणाले की, जनतेने आमचे काम पाहिले आहे. दिलेले आश्वासन भाजपकडून पूर्ण केले जाते. आम्ही वचन दिले होते तीन तलाख प्रथा संपवून टाकू. पुढे आम्ही ते करून दाखवले. कलम ३७० रद्द करणार, महिलांना आरक्षण देणार याचा शब्द भाजपने दिला होता. आमच्या सरकारने वन रँक वन पेन्शनचा शब्द दिला होता. तसेच अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते. मंदिर बांधण्याचे काम आज सुरु आहे. तेलंगणाला दिलेली विविध आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत. (वृत्तसंस्था) 

१० वर्षे केवळ भ्रष्टाचार : शाहहैदराबाद : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १० वर्षांत केवळ भ्रष्टाचार केला. तेलंगणातील जनता बीआरएस सरकारला सत्तेवरून हटविण्यासाठी सज्ज आहे. आज तरुण, शेतकरी, दलित व मागासवर्गीय लोक पूर्णपणे निराश झाले आहेत. तेलंगणात केवळ भाजपच बदल घडवून आणू शकतो, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे केला. येथे पत्रकारांना संबोधित करताना शाह म्हणाले की, एमआयएम आणि काँग्रेसचा इतिहास दर्शवितो की, दोन्ही पक्षांनी बीआरएसला पाठिंबा दिला होता. जेव्हाही (असदुद्दीन) ओवेसी आमदार म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांनी बीआरएसला पाठिंबा दिला. तसेच निवडून आलेले काँग्रेसचे आमदार बीआरएसमध्ये दाखल झाले. याचा अर्थ, राज्यातील सत्ता परिवर्तनासाठी तुम्ही काँग्रेसला मत दिले तर ते नक्कीच वाया जाईल. (वृत्तसंस्था)

परिवाराकडे मलाई देणारी खाती : राहुलनिजामाबाद : केसीआर यांच्या परिवाराकडे सर्वाधिक कमाई करून देणारी मंत्रालये होती. जमीन, मद्य आणि खाणी यामधून सर्वाधिक पैसा मिळवला जातो. जर तुम्ही भ्रष्टाचारी नव्हता तर ही तिन्ही मंत्रालये तुमच्या परिवाराकडे दिलीच नसती. दलित बंधू योजनेसाठी केसीआर यांचे आमदार तीन लाखांचे कमिशन घेतात, असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथील प्रचारसभेत केला. ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. २ डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत. या राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने या खेपेला आक्रमक प्रचार केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शुक्रवारी  प्रचारसभेत आरोप केला होता की, केसीआर यांनी तेलंगणाला लुबाडले आहे. मुख्यमंत्री आता दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही टीका करू लागले आहेत. (वृत्तसंस्था)

पैशांसाठी त्यांना हवी सत्ता : प्रियंकामाधिरा (तेलंगणा) : आपल्या परिवारासाठी गडगंज पैसा कमावण्यासाठी केसीआर यांना काहीही करून सत्तेत राहायचे आहे. निवडणूक जवळ आली की त्यांना जनतेची आठवण होते, अशी टीका काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी माधिरा येथील प्रचारसभेत केली. प्रियंका गांधी म्हणाल्या की, जनतेने तेलंगणा या राज्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. अनेक घरांतील माता-भगिनींनी राज्यासाठी बलिदान दिले आहे. आज येथील जनता कमालीच्या अडचणींचा सामना करीत आहे. ज्या गोष्टींची आम्ही खात्री देतो, त्यांची आम्ही पूर्तता करतो. तेलंगणात सध्या केवळ नेत्यांच्या फायद्यासाठी राजकारण सुरू आहे. लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही. स्वतंत्र भारतातील राजकारणाची परंपरा महात्मा गांधीजींनी सुरू केली. काँग्रेसच्या नेत्यांनी ही परंपरा पुढे चालवली. देशाची जनता सर्वतोपरी आहे, अशी आमच्या नेत्यांची धारणा आहे. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती