शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सरकारनं अल्पसंख्यकांसाठी काहीच केलं नाही, मोहम्मद अझहरुद्दीनचा बीआरएसवर बाउंसर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 16:06 IST

यावेळी काँग्रेसने त्यांना ज्युबली हिल्स विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे...

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तथा काँग्रेसचे माजी खासदार मोहम्मद अझरुद्दीन यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भारत राष्ट्र समितीवर (BRS) जबरदस्त हल्ला चढवला आहे. याच बरोबर त्यांनी काँग्रेस विजयाचा दावाही केला आहे. यावेळी काँग्रेसने त्यांना ज्युबली हिल्स विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

माध्यमांसोबत बोलताना मोहम्मद अजहरुद्दीन म्हणाले, तेलंगणातील लोकांना परिवर्तन हवे आहे. के. चंद्रशेखर राव सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी फार विशेष काहीही केलेले नाही. विशेषतः अल्पसंख्यक लोकांसाठी. मागास समाजाच्या विकासातही हे सरकार फार मागे पडले आहे. यामुळे, यावेळी बीआरएस सत्तेबाहेर जाईल आणि लोक काँग्रेसला संधी देतील.

महत्वाचे म्हणजे, यापूर्वी अझहरुद्दीन काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले आहेत. त्यांनी 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून आपल्या राजकिय कारकिर्दिला सुरुवात केली होती. तेव्हा ते विजयीही झाले होते. मात्र, 2014 मध्ये राजस्थानातील टोंक-सवाई माधोपूर लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसने, तेलंगणा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत जुबली हिल्स विधानसभा सीटसाठी त्यांचे नाव निश्चित केले आहे.तिकीट मिळाल्यानंतर काय म्हणाले होते -तिकीट मिळाल्यानंतर अझहरुद्दीन म्हणाले, “मला माझ्या राज्यातून तिकीट मिळाल्याचा अत्यंत आनंद आहे. मी मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी यांचे आभार मानतो. इंशा अल्लाह आम्ही संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करू आणि निवडणूक जिंकू.”

टॅग्स :congressकाँग्रेसTelanganaतेलंगणाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती