शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

तेलंगणात मतदान सुरू होते, आंध्र प्रदेश पोलीस अचानक राज्यात घुसले, धरणाचे दरवाजे उघडले; पाण्यासाठी पुन्हा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:21 IST

तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील पाण्याचा वाद आता पुन्हा एकदा चिघळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. यातच आता दुसरीकडे तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील पाण्याचा वाद आता पुन्हा एकदा चिघळणार आहे. आंध्रप्रदेश पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिसासह नागार्जुनसागर धरण परिसरात घुसले आणि त्यांनी धरणाचे दरवाजे उघडले. यामुळे आता दोन्ही राज्यातील तणान वाढण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याचे संकट सुरू आहे. 

Telangana Election 2023 : तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळणार? आमदारांना बंगळुरूला पाठवण्याची तयारी

दरम्यान, आंध्र प्रदेशातील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी ४०० हून अधिक पोलीस कर्मचारी धरण परिसरात गेले आणि नागार्जुनसागर धरणाचे दरवाजे उघडले. याआधी या पोलिसांनी धरणाच्या ३६ पैकी निम्मे दरवाजे ताब्यात घेतल्याने निवडणुकीमध्ये व्यस्त असलेले तेलंगणा पोलिसही हैराण झाले होते.

अभियंता-इन-चीफ सी. नारायण रेड्डी म्हणाले की, आंध्र प्रदेशकडे ३,००० क्युसेक पाणी सोडण्यासाठी गेट उघडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. राज्यात पिण्याच्या पाण्याचे संकट शिगेला पोहोचले आहे.

"तणाव टाळण्यासाठी खबरदारी घ्या"

अधिकारी नारायण रेड्डी म्हणाले की, दोन राज्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी आम्ही स्वतःला सावरत होतो पण धोका शिगेला पोहोचला आहे. आमच्या पिण्याच्या गरजेसाठी ते आम्हाला वेळेवर पाणी सोडू देत नव्हते. अडचण अशी आहे की त्यांनी नागार्जुनसागर धरण आपल्या ताब्यात असल्याचे गृहीत धरले आहे. त्यांनी आमच्या भागात अतिक्रमण केले आहे.

पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, कृष्णा नदीच्या डाव्या बाजूचे कार्यक्षेत्र तेलंगणात येते आणि उजव्या बाजूचे क्षेत्र आंध्र प्रदेशात येते. या महत्त्वाच्या धरणाला २६ दरवाजे आहेत. यातील १३ दरवाजे तेलंगणाच्या अखत्यारीत येतात आणि उर्वरित १३ दरवाजे आंध्र प्रदेशच्या अखत्यारीत येतात. गुरुवारी आंध्र प्रदेश पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रकल्पाचा अर्धा भाग ताब्यात घेतला. तेलंगणानेही अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.

आता निवडणुका संपल्यानंतर दोन्ही राज्यांमधील संघर्ष वाढू शकतो. मात्र, आंध्रप्रदेश पोलिसांनी उघडलेल्या गेटवर आंध्र प्रदेश पोलिसांचा अधिक बंदोबस्त आहे, त्यामुळे या वेळी तो बंद करण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष वाढू शकतो.

टॅग्स :TelanganaतेलंगणाAndhra Pradeshआंध्र प्रदेशWaterपाणी