शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात मतदान सुरू होते, आंध्र प्रदेश पोलीस अचानक राज्यात घुसले, धरणाचे दरवाजे उघडले; पाण्यासाठी पुन्हा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:21 IST

तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील पाण्याचा वाद आता पुन्हा एकदा चिघळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. यातच आता दुसरीकडे तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील पाण्याचा वाद आता पुन्हा एकदा चिघळणार आहे. आंध्रप्रदेश पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिसासह नागार्जुनसागर धरण परिसरात घुसले आणि त्यांनी धरणाचे दरवाजे उघडले. यामुळे आता दोन्ही राज्यातील तणान वाढण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याचे संकट सुरू आहे. 

Telangana Election 2023 : तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळणार? आमदारांना बंगळुरूला पाठवण्याची तयारी

दरम्यान, आंध्र प्रदेशातील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी ४०० हून अधिक पोलीस कर्मचारी धरण परिसरात गेले आणि नागार्जुनसागर धरणाचे दरवाजे उघडले. याआधी या पोलिसांनी धरणाच्या ३६ पैकी निम्मे दरवाजे ताब्यात घेतल्याने निवडणुकीमध्ये व्यस्त असलेले तेलंगणा पोलिसही हैराण झाले होते.

अभियंता-इन-चीफ सी. नारायण रेड्डी म्हणाले की, आंध्र प्रदेशकडे ३,००० क्युसेक पाणी सोडण्यासाठी गेट उघडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. राज्यात पिण्याच्या पाण्याचे संकट शिगेला पोहोचले आहे.

"तणाव टाळण्यासाठी खबरदारी घ्या"

अधिकारी नारायण रेड्डी म्हणाले की, दोन राज्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी आम्ही स्वतःला सावरत होतो पण धोका शिगेला पोहोचला आहे. आमच्या पिण्याच्या गरजेसाठी ते आम्हाला वेळेवर पाणी सोडू देत नव्हते. अडचण अशी आहे की त्यांनी नागार्जुनसागर धरण आपल्या ताब्यात असल्याचे गृहीत धरले आहे. त्यांनी आमच्या भागात अतिक्रमण केले आहे.

पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, कृष्णा नदीच्या डाव्या बाजूचे कार्यक्षेत्र तेलंगणात येते आणि उजव्या बाजूचे क्षेत्र आंध्र प्रदेशात येते. या महत्त्वाच्या धरणाला २६ दरवाजे आहेत. यातील १३ दरवाजे तेलंगणाच्या अखत्यारीत येतात आणि उर्वरित १३ दरवाजे आंध्र प्रदेशच्या अखत्यारीत येतात. गुरुवारी आंध्र प्रदेश पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रकल्पाचा अर्धा भाग ताब्यात घेतला. तेलंगणानेही अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.

आता निवडणुका संपल्यानंतर दोन्ही राज्यांमधील संघर्ष वाढू शकतो. मात्र, आंध्रप्रदेश पोलिसांनी उघडलेल्या गेटवर आंध्र प्रदेश पोलिसांचा अधिक बंदोबस्त आहे, त्यामुळे या वेळी तो बंद करण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष वाढू शकतो.

टॅग्स :TelanganaतेलंगणाAndhra Pradeshआंध्र प्रदेशWaterपाणी