शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात मतदान सुरू होते, आंध्र प्रदेश पोलीस अचानक राज्यात घुसले, धरणाचे दरवाजे उघडले; पाण्यासाठी पुन्हा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:21 IST

तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील पाण्याचा वाद आता पुन्हा एकदा चिघळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. यातच आता दुसरीकडे तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील पाण्याचा वाद आता पुन्हा एकदा चिघळणार आहे. आंध्रप्रदेश पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिसासह नागार्जुनसागर धरण परिसरात घुसले आणि त्यांनी धरणाचे दरवाजे उघडले. यामुळे आता दोन्ही राज्यातील तणान वाढण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याचे संकट सुरू आहे. 

Telangana Election 2023 : तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळणार? आमदारांना बंगळुरूला पाठवण्याची तयारी

दरम्यान, आंध्र प्रदेशातील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी ४०० हून अधिक पोलीस कर्मचारी धरण परिसरात गेले आणि नागार्जुनसागर धरणाचे दरवाजे उघडले. याआधी या पोलिसांनी धरणाच्या ३६ पैकी निम्मे दरवाजे ताब्यात घेतल्याने निवडणुकीमध्ये व्यस्त असलेले तेलंगणा पोलिसही हैराण झाले होते.

अभियंता-इन-चीफ सी. नारायण रेड्डी म्हणाले की, आंध्र प्रदेशकडे ३,००० क्युसेक पाणी सोडण्यासाठी गेट उघडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. राज्यात पिण्याच्या पाण्याचे संकट शिगेला पोहोचले आहे.

"तणाव टाळण्यासाठी खबरदारी घ्या"

अधिकारी नारायण रेड्डी म्हणाले की, दोन राज्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी आम्ही स्वतःला सावरत होतो पण धोका शिगेला पोहोचला आहे. आमच्या पिण्याच्या गरजेसाठी ते आम्हाला वेळेवर पाणी सोडू देत नव्हते. अडचण अशी आहे की त्यांनी नागार्जुनसागर धरण आपल्या ताब्यात असल्याचे गृहीत धरले आहे. त्यांनी आमच्या भागात अतिक्रमण केले आहे.

पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, कृष्णा नदीच्या डाव्या बाजूचे कार्यक्षेत्र तेलंगणात येते आणि उजव्या बाजूचे क्षेत्र आंध्र प्रदेशात येते. या महत्त्वाच्या धरणाला २६ दरवाजे आहेत. यातील १३ दरवाजे तेलंगणाच्या अखत्यारीत येतात आणि उर्वरित १३ दरवाजे आंध्र प्रदेशच्या अखत्यारीत येतात. गुरुवारी आंध्र प्रदेश पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रकल्पाचा अर्धा भाग ताब्यात घेतला. तेलंगणानेही अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.

आता निवडणुका संपल्यानंतर दोन्ही राज्यांमधील संघर्ष वाढू शकतो. मात्र, आंध्रप्रदेश पोलिसांनी उघडलेल्या गेटवर आंध्र प्रदेश पोलिसांचा अधिक बंदोबस्त आहे, त्यामुळे या वेळी तो बंद करण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष वाढू शकतो.

टॅग्स :TelanganaतेलंगणाAndhra Pradeshआंध्र प्रदेशWaterपाणी