शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:48 IST

आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यादव आज आमदारांच्या बैठकीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कुटुंबातील वादामुळे ते तणावात असल्याचे दिसून आले.

बिहार विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाचा मोठा पराभव झाला.पक्षाला झालेला पराभव पचवणे कठीण जात आहे. दरम्यान, काल पक्षाची बैठक झाली. या बैठकीत तेजस्वी यादव यांची राजद विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी पुन्हा निवड झाली.  या बैठकीत नाराजीचा सूर पाहायला मिळाला.  सोमवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तेजस्वी यादव भावनिकही झाले. 'जर आमदारांची इच्छा असेल तर मी नेतृत्व सोडण्यास तयार आहेत. जर आमदारांचे मत असेल तर ते दुसऱ्या कोणाला तरी नेता म्हणून निवडू शकतात',असंही तेजस्वी यादव म्हणाले.

पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."

एका आमदाराने सांगितले की, तिकीट वाटप आणि पराभवाबाबतच्या आरोपांमुळे तेजस्वी यादव दुखावले आहेत. बैठकीदरम्यान त्यांनी असेही म्हटले की, "मी काय करावे? मी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी की पक्षाची?" तेजस्वी यादव त्यांच्या बहिणी रोहिणी आचार्य यांनी केलेल्या आरोपांमुळे दबावाखाली असल्याचे दिसत आहे. तेजस्वी यादव यांनी अजूनही उघड उघड काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांचे सल्लागार आणि जवळचे सहकारी, संजय यादव आणि रमीज नेमत खान यांच्यावरही आरोप आहेत. तेजस्वी यादव फक्त त्यांचेच ऐकतात, असा आरोपही त्यांच्यावर होत आहे.

बैठकीत भावूक वातावरण

तेजस्वी यादव यांच्या अचानक प्रस्तावामुळे भावनिक गोंधळ निर्माण झाला. उपस्थित सर्व आमदारांनी त्यांना त्यांचे नेते राहावे असा आग्रह धरला. लालू यादव यांनी स्वतः हस्तक्षेप केला आणि आमदारांना त्यांचे मन वळवण्यास सांगितले. त्यानंतर आमदारांनी एकमताने तेजस्वी यादव यांना त्यांचे नेते म्हणून निवडले. राबडी देवी, मीसा भारती आणि तेजस्वी यादव यांचे जवळचे सहकारी संजय यादव हे देखील यावेळी उपस्थित होते.

या निवडणुकीत पक्षाने १४३ जागा लढवल्या पण यामधील २५ जागांवर विजय मिळवला. आरजेडी तिसरा पक्ष ठरला आहे. हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बैठकीत EVM वर प्रश्न 

याआधीही बिहारमध्ये असा निकाल आला होता. २०१० मध्ये आरजेडीला फक्त २२ जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी त्यावेळी त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळवता आले नाही. या बैठकीत जगदानंद सिंह म्हणाले की, ईव्हीएम त्यांच्या पराभवाचे कारण आहे. या मशीनचा गैरवापर झाला. आमदार भाई वीरेंद्र यांनीही या दाव्याचे समर्थन केले.आपण ईव्हीएमविरुद्ध लढले पाहिजे. आपण फक्त मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली पाहिजे, असंही सिंह या बैठकीत म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Tejashwi Yadav offers to resign amid RJD defeat fallout.

Web Summary : Following RJD's Bihar defeat, Tejashwi Yadav offered to step down as leader during a party meeting amid accusations of flawed ticket distribution. Yadav cited family concerns and pressure from accusations against his advisors. Party members urged him to stay, with Lalu Yadav intervening to ensure his continued leadership.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Electionनिवडणूक 2024Biharबिहार