शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

...तोपर्यंत देशातलं आरक्षण कायम ठेवावं; संघानं स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 08:07 IST

ज्यांना अरक्षणाचे फायदे मिळतात व ज्यांना मिळत नाहीत त्यांच्यात सलोख्याच्या वातावरणात चर्चा-संवाद व्हायला हवा, अ

पुष्कर (राजस्थान) : समाजात अजूनही सामाजिक आणि आर्थिक विषमता कायम असल्याने त्याआधारे दिले जाणारे आरक्षण लाभार्थींना त्याची गरज वाटते तोपर्यंत सुरु ठेवायला हवे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोमवारी म्हटले.

संघाची ही भूमिका एका पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी असेही सांगितले की, मंदिरे, स्मशानभूमी व विहिरी आणि पाणवठे कोणत्याही एका समाजवर्गासाठी नव्हे तर सर्व जाती-धर्मांसाठी खुले असायला हवेत. होसबळे म्हणाले की, समाजात अजूनही विषमता असल्याने राज्यघटनेनुसार ठरलेल्या आरक्षणास संघाचा संपूर्ण पाठिंबा आहे.

ज्यांना अरक्षणाचे फायदे मिळतात व ज्यांना मिळत नाहीत त्यांच्यात सलोख्याच्या वातावरणात चर्चा-संवाद व्हायला हवा, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलिकडेच सुचविले होते. त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरु झाली होती. आरक्षण अनिश्चित काळ सुरु राहावे, असे संघाला वाटते की, असे विचारता होसबळे यांनी सांगितले की, या व्यवस्थेचा ज्यांना लाभ मिळतो त्यांनी याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यांना गरज वाटते तोपर्यंत आरक्षण सुरु राहायला हवे.समाजातील विषमता व पक्षपाती वागणूक संपुष्टात आणण्याच्या बाबतीत संघाने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करणारे पत्र एका दलित संघटनेने सरसंघचालकांना पाठविले आहे, असे सांगून ते म्हणाले की, मंदिरे, स्मशानभूमी आणि पाणवठे कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी खुले असायला हवेत. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघreservationआरक्षण