शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत देशातलं आरक्षण कायम ठेवावं; संघानं स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 08:07 IST

ज्यांना अरक्षणाचे फायदे मिळतात व ज्यांना मिळत नाहीत त्यांच्यात सलोख्याच्या वातावरणात चर्चा-संवाद व्हायला हवा, अ

पुष्कर (राजस्थान) : समाजात अजूनही सामाजिक आणि आर्थिक विषमता कायम असल्याने त्याआधारे दिले जाणारे आरक्षण लाभार्थींना त्याची गरज वाटते तोपर्यंत सुरु ठेवायला हवे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोमवारी म्हटले.

संघाची ही भूमिका एका पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी असेही सांगितले की, मंदिरे, स्मशानभूमी व विहिरी आणि पाणवठे कोणत्याही एका समाजवर्गासाठी नव्हे तर सर्व जाती-धर्मांसाठी खुले असायला हवेत. होसबळे म्हणाले की, समाजात अजूनही विषमता असल्याने राज्यघटनेनुसार ठरलेल्या आरक्षणास संघाचा संपूर्ण पाठिंबा आहे.

ज्यांना अरक्षणाचे फायदे मिळतात व ज्यांना मिळत नाहीत त्यांच्यात सलोख्याच्या वातावरणात चर्चा-संवाद व्हायला हवा, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलिकडेच सुचविले होते. त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरु झाली होती. आरक्षण अनिश्चित काळ सुरु राहावे, असे संघाला वाटते की, असे विचारता होसबळे यांनी सांगितले की, या व्यवस्थेचा ज्यांना लाभ मिळतो त्यांनी याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यांना गरज वाटते तोपर्यंत आरक्षण सुरु राहायला हवे.समाजातील विषमता व पक्षपाती वागणूक संपुष्टात आणण्याच्या बाबतीत संघाने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करणारे पत्र एका दलित संघटनेने सरसंघचालकांना पाठविले आहे, असे सांगून ते म्हणाले की, मंदिरे, स्मशानभूमी आणि पाणवठे कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी खुले असायला हवेत. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघreservationआरक्षण