शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

कौतुकास्पद! बैलगाडीतून शाळांमध्ये पुस्तकं पाठवतायेत ‘हे’ शिक्षक; पण अशी वेळ त्यांच्यावर का आली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 14:41 IST

रायसेन जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोहचण्यासाठी आजही रस्ते नाहीत पण ज्यांच्याकडे इच्छाशक्ती असते त्यांना मार्ग सापडतोच.

ठळक मुद्देकोरोना संक्रमण वाढत असल्याने शाळा-कॉलेज बंद आहेत शिक्षक बैलगाडीतून शाळेय पुस्तक घेऊन शाळांमध्ये पोहचवत आहेतज्यावेळी शाळा सुरु होतील तेव्हा त्यांना पुस्तक हाती मिळताच शिक्षण तातडीनं सुरु होईल हा उद्देश

रायसेन – कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊन या संकटकाळात संपूर्ण देशात शाळा-कॉलेज बंद आहेत. परीक्षा आणि शिक्षण ठप्प आहे. काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे पण ज्या भागात इंटरनेट नाही, सोयीसुविधा नाहीत अशाठिकाणी काहीजण मोठ्या जिद्दीनं तेथील मुलांना शिक्षण देण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता काम करत आहेत.

समाजासाठी असलेलं कर्तव्य ओळखून मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत. रायसेनमध्ये अशा एका शिक्षिकाची कहाणी समोर येत आहे ज्याने शाळा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं सुरु केले आहे. कोण आहेत हे शिक्षक, काय करतात ते त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.

रायसेन जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोहचण्यासाठी आजही रस्ते नाहीत पण ज्यांच्याकडे इच्छाशक्ती असते त्यांना मार्ग सापडतोच. कोरोना संक्रमण वाढत असल्याने शाळा-कॉलेज बंद आहेत पण शाळा बंद असल्याने मुलांचे शिक्षण बंद होऊ नये यासाठी रायसेनमधील शिक्षक धडपड करत आहे. ते बैलगाडीतून शाळेय पुस्तक घेऊन शाळांमध्ये पोहचवत आहेत जेणेकरुन ज्यावेळी शाळा सुरु होतील तेव्हा त्यांना पुस्तक हाती मिळताच पुन्हा शिक्षण तातडीनं सुरु होईल.

ही घटना मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील भोजपूर भागातील आहे. सर्व देशांप्रमाणेच याठिकाणीही शाळा अजूनही येथे बंद आहेत. परंतु शिक्षक नीरज सक्सेना ५ किमी अंतरावर केंद्र इटखेडीची पुस्तके घेऊन सालेगड येथील प्राथमिक शाळेत पोहोचले. पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्ते नाहीत, त्यात काही रस्ते चिखलाने भरलेले आहेत. पण अशा परिस्थितीतही नीरज सक्सेना यांनी आपली जबाबदारी पार पाडली. त्याने बैलगाडीत पुस्तके ठेवली आणि स्वत: चालवून शाळेत पोहोचले.

शिक्षक नीरज सक्सेना नेहमीच त्यांच्या प्रयत्नात गुंतलेले असतात. त्यांनी सालेगडच्या या प्राथमिक शाळेचे नूतनीकरण केले आहे. शाळा व्यवस्था आणि स्वच्छता ही खासगी शाळेसारखी आहे. शिक्षक नीरज सक्सेना यांना पर्यावरणाची आवड आहे. त्यामुळे शाळेच्या आजूबाजूला झाडे लावण्यात आली आहेत. मुलांचे ज्ञान आणि सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी झाडांवर फलक लावण्यात आले आहेत. ज्यावर वेगवेगळी माहिती विद्यार्थ्यांना पोहचू शकते. शाळेतील वातावरण प्रसन्न असल्याने कडाक्याची थंडी असो वा ऊन-पाऊस मुलं आनंदाने शिक्षण घेण्यासाठी येतात.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Video: ‘अच्छा चलता हूँ दुवाओं मै याद रखना’; मृत्यूपूर्वी हॉस्पिटलमध्ये युवकानं गायलं गाणं, नेटिझन्स भावूक

पाक आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत पाठांतर करा, शाळेचा विद्यार्थ्यांना होमवर्क; पालक संतापले

चीन आणि इराणमध्ये ४०० अब्ज डॉलर्सचा करार होणार; अमेरिकेसह भारताचंही टेन्शन वाढणार

ते' स्टेटमेंट मी मुद्दामच केलं, भाजपा-सेनेचं सरकार बनू नये म्हणून...; अखेर शरद पवारांनी 'सिक्रेट' सांगितलं!

गर्लफ्रेंड, गँगस्टर आणि एन्काऊंटर; मुंबईत घडलेला ‘तो’ गुन्हा ४ वर्षानं पुन्हा चर्चेत, कारण...

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक