शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'चहालासुद्धा 20 रुपये लागतात, म्हणून निराधारांना महिना 2 हजारांची मदत द्या' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 17:23 IST

राष्ट्रवादी पुरस्कृत अमरावतीच्या खासदारही पती रवी राणा यांच्याप्रमाणेच आक्रमक झाल्याचे संसदेत पाहायला मिळाले.

नवी दिल्ली - देशातील निराधारांना श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत केवळ 200 रुपये महिना केंद्र सरकारकडून देण्यात येतो. तर राज्य सरकारकडूनही केवळ 400 रुपये भत्ता मिळतो. मात्र, सद्यपरिस्थिती पाहाता, देशातील वाढती महागाई लक्षात घेता. सहाशे रुपये महिन्यात या निराधार, गरजू-गरिबांना आपला उदरनिर्वाह कसा करायचा?. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत विचार करुन निराधार, गरिब, बेरोजगार, अंध-अपंग यांना केंद्र सरकारतर्फे किमान 2 हजार रुपयांचा मदत भत्ता द्यावा, अशी मागणी अमरावतीच्या खासदार राणा नवनीत कौर यांनी लोकसभेत केली. 

राष्ट्रवादी पुरस्कृत अमरावतीच्या खासदारही पती रवी राणा यांच्याप्रमाणेच आक्रमक झाल्याचे संसदेत पाहायला मिळाले. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही गरीबांसाठी घरकुल योजनेचा लाभ मिळायला हवा. महाराष्ट्राला केवळ 7 लाख घरकुल योजनेचं लक्ष्य देण्यात आलं आहे. पण, योजना ही 20 ते 25 लाख घरकुलाची मंजूर करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. तसेच, देशातील निराधारांना सरकारकडून मदत भत्ता म्हणून केवळ 200 रुपये देण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. तसेच राज्य सरकारचे 400 आणि केंद्राचे 200 असे मिळून केवळ 600 रुपये भत्ता 65 वर्ष वयावरील निराधारांना सरकारकडून मिळतो. मात्र, आजमित्तीला आपण चहा प्यायला गेलो तरी, 20 रुपये लागतात. मग, या निराधारांना 600 रुपयांत महिना कसा घालवायचा? असा प्रश्न नवनीत यांनी उपस्थित केला. तसेच, निराधार, अंध-अपंग, बेरोजगारांना केंद्र सरकारने किमान 2 हजार रुपये महिना भत्ता द्यावा, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली. पंतप्रधान हे देशाचे आहेत, ते कोण्या एका पक्षाचे नाहीत. त्यामुळे त्यांनी याकडे लक्ष द्यावे, असेही नवनीत यांनी म्हटले.   

टॅग्स :lok sabhaलोकसभाMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसMember of parliamentखासदार