शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

संसदेत राहुल गांधी आक्रमक, मॉब लिंचिंगवरुन सरकारला विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 13:33 IST

संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावेळी राहुल गांधींनी केलेले भाषण देशभरात चर्चेचा विषय ठरले. मात्र,

नवी दिल्ली - संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावेळी राहुल गांधींनी केलेले भाषण देशभरात चर्चेचा विषय ठरले. मात्र, एनडीएने 325 मते घेऊन विश्वासदर्शक ठराव जिंकला. तरीही सत्ताधारी मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आजही संसेदबाहेर टीडीपीने मोदी सरकारविरुद्ध नारेबाजी करत आंदोलन सुरू केले आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अलवर मॉब लिंचिंगप्रकरणावरुन सरकारला जाब विचारला आहे. अलवर जमाव हत्याकांडप्रकरणातील मृत अकबर खानला केवळ 6 किमी अंतरावरील रुग्णालयात दाखल करण्यासाठी 3 तास का लागले असा प्रश्नही राहुल यांनी उपस्थित केला.

 

अविश्वास प्रस्तावानंतर आज पुन्हा लोकसभेत खासदारांचा गोंधळ सुरू झाला आहे. संसदेतील राहुल गांधींच्या असभ्य वर्तनाबद्दल सत्ताधिकाऱ्यांकडून राहुल यांना लक्ष्य करण्यात येत आहे. तर, विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र सुरु आहे. टीडीपी खासदारांनी लोकसभा सभागृहाबाहेर सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी जयदेव गल्ला यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे काहीही बदलले नसल्याचे म्हटले. तर विपक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सरकारवर टीका करताना, सरकार देशहित नसलेल्या कृत्यांचे समर्थन करत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे. तसेच काँग्रेस खासदारांनीही बेरोजगारीच्या समस्येवरुन संसदेबाहेर मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. दरम्यान, सभागृहात मॉब लिंचिंग, तीन तलाक, आरटीआय संशोधन यांसह आदि विधेयकांवरुन गोंधळ होण्याची शक्यता आहे.

 

टीडीपी खासदार

 

टॅग्स :Loksabhaलोकसभाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी