शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

संसदेत राहुल गांधी आक्रमक, मॉब लिंचिंगवरुन सरकारला विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 13:33 IST

संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावेळी राहुल गांधींनी केलेले भाषण देशभरात चर्चेचा विषय ठरले. मात्र,

नवी दिल्ली - संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावेळी राहुल गांधींनी केलेले भाषण देशभरात चर्चेचा विषय ठरले. मात्र, एनडीएने 325 मते घेऊन विश्वासदर्शक ठराव जिंकला. तरीही सत्ताधारी मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आजही संसेदबाहेर टीडीपीने मोदी सरकारविरुद्ध नारेबाजी करत आंदोलन सुरू केले आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अलवर मॉब लिंचिंगप्रकरणावरुन सरकारला जाब विचारला आहे. अलवर जमाव हत्याकांडप्रकरणातील मृत अकबर खानला केवळ 6 किमी अंतरावरील रुग्णालयात दाखल करण्यासाठी 3 तास का लागले असा प्रश्नही राहुल यांनी उपस्थित केला.

 

अविश्वास प्रस्तावानंतर आज पुन्हा लोकसभेत खासदारांचा गोंधळ सुरू झाला आहे. संसदेतील राहुल गांधींच्या असभ्य वर्तनाबद्दल सत्ताधिकाऱ्यांकडून राहुल यांना लक्ष्य करण्यात येत आहे. तर, विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र सुरु आहे. टीडीपी खासदारांनी लोकसभा सभागृहाबाहेर सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी जयदेव गल्ला यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे काहीही बदलले नसल्याचे म्हटले. तर विपक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सरकारवर टीका करताना, सरकार देशहित नसलेल्या कृत्यांचे समर्थन करत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे. तसेच काँग्रेस खासदारांनीही बेरोजगारीच्या समस्येवरुन संसदेबाहेर मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. दरम्यान, सभागृहात मॉब लिंचिंग, तीन तलाक, आरटीआय संशोधन यांसह आदि विधेयकांवरुन गोंधळ होण्याची शक्यता आहे.

 

टीडीपी खासदार

 

टॅग्स :Loksabhaलोकसभाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी