शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आंध्र प्रदेशात भाजपा-टीडीपीमध्ये युती? पवन कल्याण यांच्या पक्षाचाही एनडीएमध्ये समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 14:45 IST

सुत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपाचा करार या तिन्ही पक्षांमध्ये झाला आहे.

TDP all set to return to NDA (Marathi News) नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानेआंध्र प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) सोबत युती निश्चित केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत युती करण्यासंदर्भात भाजपा आणि टीडीपीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू होती. आता या चर्चेला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. यासोबतच अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाचाही एनडीएमध्ये समावेश करण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपाचा करार या तिन्ही पक्षांमध्ये झाला आहे.

चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपी यापूर्वीच एनडीएचा भाग होता. टीडीपीनेही केंद्रातील एनडीएच्या भागीदार पक्षाची भूमिका बजावली होती. नंतरच्या काळात भाजपा आणि टीडीपीमध्ये दुरावा झाल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी आंध्र प्रदेशात एकत्र लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पवन कल्याण यांच्या पक्षाशीही भाजपाने युती केली आहे. आंध्र प्रदेशात टीडीपीसोबतच पवन कल्याण यांच्या पक्ष जनसेनासोबत राष्ट्रीय पातळीवरही युती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि टीडीपी यांच्या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होण्याची शक्यता आहे. भाजपा आणि टीडीपी यांच्यात युती झाल्यानंतर जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. युतीसाठी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजपा आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या एकूण सहा जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या २० जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे. दुसरीकडे, चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपी लोकसभेच्या १६ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे, तर ३ जागा जनसेनेच्या वाट्याला गेल्या आहेत.

बऱ्याच दिवसांपासून सुरु होती चर्चाभाजपाचे सर्वोच्च नेते आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यात युतीबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. जागावाटपाबाबत समस्या होती, ती आता दूर झाली आहे. आतापर्यंतच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपा, टीडीपी आणि जनसेना पक्षामध्ये सामंजस्य करार झाला आहे. दरम्यान, भाजपा दक्षिण भारतात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात भाजपा आणि टीडीपीचे एकत्र येण्याचे पाऊल अतिशय महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीBJPभाजपाChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूlok sabhaलोकसभा