शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

Tauktae Cyclone: तौक्तेचे २६ बळी, ४९ बेपत्ता तर १८६ जणांची सुखरूप सुटका; अद्यापही शोधमोहिम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 06:30 IST

तटरक्षक दलाच्या जवानांचे शाेध व बचावकार्य नेटाने सुरू

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे उधाणलेल्या समुद्राच्या तडाख्यात सापडून भरकटलेल्या ५ नौकांपैकी पी-३०५ या बार्जवरील २६ जणांचे मृतदेह बुधवारी तटरक्षक दल पथकाच्या हाती लागले. उर्वरित ४९ जणांचा शोध अद्याप सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत या बार्जवरील १८६ जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. दोन दिवसांत पाच बार्जवरील ६२२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. 

प्रचंड वेगाने वाहणारे वारे, २० ते २५ फूट उंचीच्या लाटा आणि खराब हवामानामुळे शून्यावर आलेली दृश्यमानता अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय नौदल, तटरक्षक दलाच्या जवानांनी अरबी समुद्रातील मुंबई हाय परिसरात शोध आणि बचावकार्य नेटाने सुरू ठेवले. बेपत्ता कर्मचाऱ्यांबाबत आम्ही अद्याप आशा सोडली नाही. मात्र, जसजसा वेळ जात आहे, तसतशी कर्मचाऱ्यांची वाचण्याची शक्यता कमी होते, अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली.

चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने पी-३०५ या बार्जवरील (कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय असणारी मोठी तराफा) २७३ जणांचा जीव धोक्यात आला होता. याशिवाय, गॅल कन्स्ट्रक्टरवर १३७, ‘सागरभूषण’वर १०१, तर एस. एस. -३ वर १९६ जण अडकून पडले होते. दोन दिवसांपासून नौदल आणि तटरक्षक दलाकडून ओएनजीसीसह शोध आणि बचावकार्य सुरू आहे. पी-३०५ वगळता अन्य ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात यंत्रणांना यश आले आहे. आपत्तीग्रस्त पी-३०५ मधून सुखरूप बाहेर पडलेल्या १८६ कर्मचाऱ्यांसह आयएनएस कोची ही युद्धनौका आज नौदल गोदीत दाखल झाली. तर, तब्बल २६ जणांचे मृतदेह बचाव पथकांच्या हाती लागले आहेत. अद्याप ४९ जणा बेपत्ता असल्याची माहिती असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती नौदलाच्या जनसंपर्क विभागाने दिली. 

भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची, आयएनएस कोलकत्ता, आयएनएस तलवार या युद्धनौकांसह बेतवा, तेग, बिआस ही जहाजे पी-८१ विमानासह सी-किंग हेलिकाॅप्टर्स या बचावकार्यात गुंतली आहेत. याशिवाय, तटरक्षक दलाच्या सम्राट, अन्य जहाजे आणि चेतक हेलिकाॅप्टर्ससह खासगी संस्थांकडून मदतकार्यासाठी लागणारी टोईंग आणि अन्य जहाजे या कामात वापरण्यात येत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये धडकणार ‘यास’ अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळ शमले नसतानाही उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचे बंगालच्या उपसागरात पुढील ७२ तासांत चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते २६ मेच्या सायंकाळी पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशासह लगतच्या आसाम, मेघालय भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. या वेळी वार्‍याचा वेग ताशी ४० ते ६० किमी असण्याची शक्यता आहे.

चाैकशीसाठी समिती स्थापनवादळाच्या धोक्याची पूर्वसूचना असतानाही इतक्या संख्येने कर्मचारी समुद्रातच राहिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याच्या चौकशीसाठी शिपिंग महासंचालक अमिताभ कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. समितीत संरक्षण विभागासह संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

गुजरातमध्ये ४५ मृत्यू 

तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गुजरातच्या १२ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला असून, प्रचंड नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चक्रीवादळाने प्रभावित भागाची हवाई पाहणी केली. मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील त्यांच्यासोबत होते. ‘तौक्ते’ चक्रीवादळ सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सौराष्ट्रमधील अमरेली, तसेच इतर काही जिल्ह्यांना बसला आहे. अमरेलीमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

चक्रीवादळामुळे कच्छ भागातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. चक्रीवादळ कमकुवत झाले तरी गुरुवारपर्यंत त्याचा पूर्ण प्रभाव ओसरण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. चक्रीवादळ एका तीव्र वादळात परिवर्त‍ित झाले असून, ते राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे राजस्थान, तसेच मध्य प्रदेशातील काही भागांत मुसळधार पावसाने थैमान घातले. 

गुजरातला १ हजार कोटींची मदत पंतप्रधान मोदी यांनी गुजरात, दमण व दीव भागाची हवाई पाहणी केली. त्यानंतर एकूण नुकसानीबाबत त्यांनी अहमदाबाद येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या गुजरातला पंतप्रधानांनी १ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाइकांना केंद्र सरकारने २ लाख रुपये, तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळNarendra Modiनरेंद्र मोदीindian navyभारतीय नौदल