शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

टाटा मोटर्सच्या जमशेदपूर कारखान्यात काही कामगारांचा संप, वाढीव पगार, कायमस्वरुपी नोकरीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 18:42 IST

नवी दिल्ली, दि. 8 - टाटा मोटर्सच्या जमशेदपूरमधल्या कारखान्यामध्ये संपसदृष स्थिती असून पगारामध्ये भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. बुधवारी कामगारांच्या लक्षात आले की हंगामी कामगारांच्या पगारामध्ये अनियमितता आहे आणि भेदभाव करण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास सहा हजार कामगारांनी उपोषणाचे हत्यार उचलल्याचे सांगण्यात येत आहे. टाटा मोटर्सच्या जमशेदपूर कारखान्यात एकंदर ...

ठळक मुद्देजुलैमध्ये झालेल्या चर्चेनुसार पगारामध्ये वाढ करण्यात आली होतीमात्र 5 तारखेला झालेल्या पगारामध्ये ही वाढ दिसली नाही500 कामगारांना ताबडतोब आणि दरवर्षी 700 कामगारांना कायम करावे अशी मागणी

नवी दिल्ली, दि. 8 - टाटा मोटर्सच्या जमशेदपूरमधल्या कारखान्यामध्ये संपसदृष स्थिती असून पगारामध्ये भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. बुधवारी कामगारांच्या लक्षात आले की हंगामी कामगारांच्या पगारामध्ये अनियमितता आहे आणि भेदभाव करण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास सहा हजार कामगारांनी उपोषणाचे हत्यार उचलल्याचे सांगण्यात येत आहे. टाटा मोटर्सच्या जमशेदपूर कारखान्यात एकंदर 10 हजार कर्मचारी आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार जुलैमध्ये झालेल्या चर्चेनुसार पगारामध्ये वाढ करण्यात आली होती, मात्र 5 तारखेला झालेल्या पगारामध्ये ही वाढ दिसली नाही. तर सूत्रांच्या हवाल्यानुसार कर्मचारी संपावर गेल्यानंतर व्यवस्थापनाने दखल घेत कामगारांची देणी दिली आहेत. पगाराची पुनर्रचना झाल्यानंतर माझ्या हातात जेवढे पैसे यायला हवे होते त्यापेक्षा 1,896 रुपये कमी मिळाल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. आम्ही संपाचे हत्यार उचलल्यावर अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि आमची शिल्लक देणी दिल्याचे एका कामगाराने सांगितले.

तर टाटा मोटर्सच्या व्यवस्थापनाने मात्र तांत्रिक समस्येमुळे ही समस्या निर्माण झाली होती असे म्हटले आहे. कामगारांना जितकी रक्कम मिळायला हवी होती, त्यापेक्षा पे स्लीपमध्ये तांत्रिक चुकीमुळे कमी दाखवली गेल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. ही चूक सुधारण्यात आली आणि नंतर कामगारांचे पैसे देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अर्थात, या संधीचा फायदा घेत कर्मचाऱ्यांनी हंगामी कामगारांना कायमस्वरुपी कामावर घ्यावे ही जुनी मागणी उचलली आहे. 500 कामगारांना ताबडतोब कायम करावे आणि दरवर्षी 700 या प्रमाणे अन्य कामगारांना कायम करावे अशी मागणी आता करण्यात आली आहे, असे संपात सहभागी झालेल्या कामगाराने सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी टाटा मोटर्सचे व्यवस्थापन प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे."काही कामगार कायमस्वरुपी करण्याची व अन्य काही मागण्या घेत संप करत आहेत. व्यवस्थापन त्यांच्या संपर्कात आहे. आम्ही ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत," असे कंपनीने पत्रकारांना सांगितले.

उत्पादनाच्या बाबतीतही परस्पर विरोधी दावे करण्यात येत आहेत. ट्रकचे रोजचे उत्पादन 80 वरून 30 - 40 वर आल्याचे कामगारांचे म्हणणे आहे तर व्यवस्थापनाने मात्र शेड्युलप्रमाणे उत्पान होत असल्याचा दावा केला आहे. टाटा मोटर्सच्या जमशेदपूर कारखान्यात झालेल्या या वादाचा परिणाम कंपनीच्या शेअरवर काही प्रमाणात शुक्रवारी दिसून आला.

टॅग्स :AutomobileवाहनTataटाटा