शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
3
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
4
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
5
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
6
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
7
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
8
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
9
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
10
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
11
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
12
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
13
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
14
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
15
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
16
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
17
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
18
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
19
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
20
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 

TISS मधून १५५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 16:55 IST

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने १५५ कर्मचारी सदस्यांना त्यांना कंपनीतून बाहेर काढल्याच्या नोटिसा पाठवाव्या लागल्या आहेत.

Tiss Lyoffs : भारतातील प्रमुख सामाजिक विज्ञान संस्था टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने (टीस) अचानक आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने शुक्रवारी त्यांच्या चार कॅम्पसमधील एकूण १५५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. यामध्ये ५५ शिक्षक कर्मचारी आहेत तर ६० शिक्षकेतर कर्मचारी आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याचे म्हटलं जात आहे.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने गुवाहाटी कॅम्पसमधून सर्वात जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. गुवाहाटी कॅम्पसमधील शिक्षक आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. बडतर्फ केलेले कर्मचारी हे एक दशकाहून अधिक काळ संस्थेसोबत काम करत होते आणि ते सर्व कंत्राटी होते. मात्र कर्मचाऱ्यांना कोणतीही सूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचे कारण टाटा एज्युकेशन ट्रस्टचे अनुदान मिळत नसल्याचे सांगण्यात आलं आहे. टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून अनुदान न मिळाल्यानेकर्मचाऱ्यांना पगारही देण्यात आलेला नाही.

शुक्रवारी,टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्रशासनाने कर्मचाऱ्यांना करार समाप्त होत असल्याची पत्रे पाठवली होती. या पत्रातून कर्मचाऱ्यांना कळण्यात आले की त्यांच्या कराराचे नूतनीकरण केले जाणार नाही आणि ३० जून २०२४ रोजी सेवा समाप्त होईल. त्यामुळे टाटा एज्युकेशन ट्रस्टने यापूर्वी निधी उपलब्ध करून दिलेले हे कर्मचारी अनेक वर्षांच्या सेवेनंतर बेरोजगार झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे कर्मचारी २००८ पासून संस्थेत आहेत. 

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने मुंबई कॅम्पसमधील २०, हैदराबादमधील १५, गुवाहाटी कॅम्पसमधील १४ आणि तुळजापूर कॅम्पसमधील ६ शिक्षकांना काढून टाकले आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने मोठ्या प्रमाणावर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्कूल ऑफ हॅबिटॅट स्टडीजमध्ये प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात दिली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जुलै आहे. 

टॅग्स :TataटाटाAssamआसामMaharashtraमहाराष्ट्र