शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

ताशी नामग्याल यांचा मृत्यू; त्यांनीच कारगीलमध्ये पाकिस्तानी सैन्य घुसल्याची माहिती दिली होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 08:43 IST

ताशी नामग्याल यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी वेळेवर दिलेल्या माहितीमुळे भारतीय सैन्याला मोठा फायदा झाला आहे.

१९९९ मध्ये कारगील युद्ध झाले. या युद्धाच्या आधी पाकिस्तानी सैनिकांनी वेष बदलून घुसखोरी करण्यास सुरुवात केली होती. या घुसखोरीची माहिती भारतीय सैनिकांना मेंढपाळ असलेले ताशी नामग्याल यांनी दिली होती. या मेंढपाळाने वेळीच माहिती दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. या महितीमुळे भारतीय सैन्याला मोठा फायदा झाला होता. पाकिस्तानच्या घुसखोरीबद्दल भारतीय सैन्याला सर्वात पहिल्यांदा सतर्क करणारे मेंढपाळ ताशी नामग्याल यांचा आर्यन व्हॅलीमध्ये मृत्यू झाला. ते ५८ वर्षांचे होते. नामग्याल यांनी या वर्षाच्या सुरुवातीला द्रास येथे २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात त्यांची मुलगी सेरिंग डोलकर हिच्यासोबत हजेरी लावली होती. ताशी नामग्याल यांची मुलगी पेशाने शिक्षिका आहे.

‘आरे’तील आणखी झाडे तोडण्याचा विचार आहे का? सर्वोच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

भारतीय लष्कराच्या लेह स्थित 'फायर अँड फ्युरी कॉर्प्स'ने त्यांच्या सोशल मीडिया हँडल  'एक्स'वर लिहिले, 'आम्ही ताशी नामग्याल यांना त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करतो. देशभक्त आता आपल्यात नाही. लडाखचे शूर- तुमच्या आत्म्याला शांती लाभो. या दु:खाच्या प्रसंगी, आम्ही शोकसंतप्त कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. नामग्याल यांना श्रद्धांजली अर्पण करताना, भारतीय सैन्याने १९९९ मध्ये ऑपरेशन विजय दरम्यान देशासाठी त्यांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला आणि त्यांचे नाव इतिहासात 'सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल' असंही लिहिले आहे.

ताशी नामग्याल यांचे लडाखच्या आर्यन व्हॅलीमधील गरखोनमध्ये निधन झाले. १९९९ मध्ये, मे महिन्याच्या सुरुवातीला, ताशी नामग्याल यांनी आपल्या हरवलेल्या याकच्या शोधात बटालिक पर्वत रांगेकडे कूच केली. येथे त्यांनी पठाणी पोशाखात काही लोक बंकर खोदताना पाहिले, ते सिव्हिल ड्रेसमध्ये पाकिस्तानी सैनिक होते. परिस्थितीचे गांभीर्य समजून त्यांनी तत्काळ भारतीय लष्कराला याची माहिती दिली.

ताशी नामग्याल यांनी दिलेल्या या वेळेवर माहितीने भारताच्या लष्करी प्रत्युत्तराला प्रत्युत्तर देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ३ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान झालेल्या कारगिल युद्धात, भारतीय सैन्याने त्वरीत जमवाजमव करून श्रीनगर-लेह महामार्ग रोखण्याचा पाकिस्तानचा गुप्त मोहीम हाणून पाडली. या युद्धात भारताच्या विजयात ताशी नामग्याल यांच्या सतर्कतेचा महत्त्वाचा वाटा होता. कारगिल युद्धातील त्यांच्या भूमिकेसाठी भारतीय सैन्याने ताशी यांचे शूर आणि देशभक्त मेंढपाळ म्हणून वर्णन केले आहे.

टॅग्स :ladakhलडाखJammu Kashmirजम्मू-काश्मीर