शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

ताशी नामग्याल यांचा मृत्यू; त्यांनीच कारगीलमध्ये पाकिस्तानी सैन्य घुसल्याची माहिती दिली होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 08:43 IST

ताशी नामग्याल यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी वेळेवर दिलेल्या माहितीमुळे भारतीय सैन्याला मोठा फायदा झाला आहे.

१९९९ मध्ये कारगील युद्ध झाले. या युद्धाच्या आधी पाकिस्तानी सैनिकांनी वेष बदलून घुसखोरी करण्यास सुरुवात केली होती. या घुसखोरीची माहिती भारतीय सैनिकांना मेंढपाळ असलेले ताशी नामग्याल यांनी दिली होती. या मेंढपाळाने वेळीच माहिती दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. या महितीमुळे भारतीय सैन्याला मोठा फायदा झाला होता. पाकिस्तानच्या घुसखोरीबद्दल भारतीय सैन्याला सर्वात पहिल्यांदा सतर्क करणारे मेंढपाळ ताशी नामग्याल यांचा आर्यन व्हॅलीमध्ये मृत्यू झाला. ते ५८ वर्षांचे होते. नामग्याल यांनी या वर्षाच्या सुरुवातीला द्रास येथे २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात त्यांची मुलगी सेरिंग डोलकर हिच्यासोबत हजेरी लावली होती. ताशी नामग्याल यांची मुलगी पेशाने शिक्षिका आहे.

‘आरे’तील आणखी झाडे तोडण्याचा विचार आहे का? सर्वोच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

भारतीय लष्कराच्या लेह स्थित 'फायर अँड फ्युरी कॉर्प्स'ने त्यांच्या सोशल मीडिया हँडल  'एक्स'वर लिहिले, 'आम्ही ताशी नामग्याल यांना त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करतो. देशभक्त आता आपल्यात नाही. लडाखचे शूर- तुमच्या आत्म्याला शांती लाभो. या दु:खाच्या प्रसंगी, आम्ही शोकसंतप्त कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. नामग्याल यांना श्रद्धांजली अर्पण करताना, भारतीय सैन्याने १९९९ मध्ये ऑपरेशन विजय दरम्यान देशासाठी त्यांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला आणि त्यांचे नाव इतिहासात 'सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल' असंही लिहिले आहे.

ताशी नामग्याल यांचे लडाखच्या आर्यन व्हॅलीमधील गरखोनमध्ये निधन झाले. १९९९ मध्ये, मे महिन्याच्या सुरुवातीला, ताशी नामग्याल यांनी आपल्या हरवलेल्या याकच्या शोधात बटालिक पर्वत रांगेकडे कूच केली. येथे त्यांनी पठाणी पोशाखात काही लोक बंकर खोदताना पाहिले, ते सिव्हिल ड्रेसमध्ये पाकिस्तानी सैनिक होते. परिस्थितीचे गांभीर्य समजून त्यांनी तत्काळ भारतीय लष्कराला याची माहिती दिली.

ताशी नामग्याल यांनी दिलेल्या या वेळेवर माहितीने भारताच्या लष्करी प्रत्युत्तराला प्रत्युत्तर देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ३ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान झालेल्या कारगिल युद्धात, भारतीय सैन्याने त्वरीत जमवाजमव करून श्रीनगर-लेह महामार्ग रोखण्याचा पाकिस्तानचा गुप्त मोहीम हाणून पाडली. या युद्धात भारताच्या विजयात ताशी नामग्याल यांच्या सतर्कतेचा महत्त्वाचा वाटा होता. कारगिल युद्धातील त्यांच्या भूमिकेसाठी भारतीय सैन्याने ताशी यांचे शूर आणि देशभक्त मेंढपाळ म्हणून वर्णन केले आहे.

टॅग्स :ladakhलडाखJammu Kashmirजम्मू-काश्मीर