शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयमध्ये नेते, अधिकाऱ्यांचे फोन झाले टॅप; सरकारचे चौकशीचे आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 06:29 IST

दोन संचालकांच्या वादामुळे चर्चेत आलेल्या सीबीआयच्या मागे चौकशीचे आणखी एक प्रकरण लागले आहे.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : दोन संचालकांच्या वादामुळे चर्चेत आलेल्या सीबीआयच्या मागे चौकशीचे आणखी एक प्रकरण लागले आहे. परवानगीविना नेते व अधिकाºयांच्या फोन टॅपिंग झाल्याच्या प्रकरणाचा तपास करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारने गुप्तचर एजन्सीला दिले आहेत.हे प्रकरण केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अंतर्गत तपासात समोर आले होते आणि सीबीआयचे डीआयजी यांनीही सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत म्हटले होते की, देशाच्या प्रमुख तपास एजन्सीमध्ये फोन टॅपिंग उघडकीस आली आहे. सीबीआयचे हटविण्यात आलेले संचालक अलोक वर्मा आणि त्यांचे सहकारी राकेश अस्थाना यांच्यातील संघर्षातही हा मुद्दा चर्चेला आलेला आहे.भ्रष्टाचाराच्या प्रकरणात फोन टॅप करण्याची सुविधा सीबीआयला दिलेली असते. मात्र त्यासाठी गृहखात्याची परवानगी घेणे आवश्यक असते. अत्यंत तातडीच्या प्रकरणात फोन टॅप करून त्यानंतर परवानगी घेण्याची मूभा सीबीआयला आहे. मात्र या व्यवस्थेचा दूरूपयोग केला गेला नाही ना? याचा तपास आता सरकार करणार आहे. सीबीआय अधिकाºयांनी केंद्रीय गृह सचिवांच्या परवानगीशिवाय आपले अधिकारी आणि राजकारणी यांचे मोबाइल आणि लँडलाइन फोन टॅप केल्याचे समजते. या बेकायदेशीर फोन टॅपिंगबाबत सरकार काळजीत आहे. वस्तुत: सरकारने अलोक वर्मा यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेली आहे. यात म्हटलेले आहे की, सीबीआय संचालकांनी दक्षता आयोगाच्या प्रश्नाला उत्तरे देण्यास नकार दिला. ते टेलिफोन टॅप करत होते आणि स्वत:च्या अधिकाराचा दुरुपयोग करत होते.सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना आणि रॉचे अधिकारी यांचे फोन विनापरवानगी टॅप झाले होते. सीबीआयचे डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे.>सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणीअलोक वर्मा यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणीसाठी येणार आहे. या प्रकरणात सरन्यायाधीशांनी अशी टिप्पणी केली की, काही प्रकरणात दक्षता आयोगाचा अहवाल अस्पष्ट आहे. तो अलोक वर्मा यांच्याविरुद्ध आहे. सीबीआय डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी फोन टॅपिंगची माहिती दिल्यानंतर सरकारची काळजी वाढली. अधिकारी आणि काही व्यक्तिंचे फोन परवानगीशिवाय टॅप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणाचे फोन टॅप होत आहेत, हे माहीत होते. मात्र, काही प्रकरणात ही ओळख लपविण्यात आली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग