शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

“PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर”; उदयनिधींचा भाजपवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 14:51 IST

Udayanidhi Stalin: गेल्या ९ वर्षांची भाजपची सर्व आश्वासने पोकळ ठरली. आमच्या कल्याणासाठी तुम्ही नेमके काय केले, असा प्रश्न संपूर्ण देश विचारत असल्याचे उदयनिधी यांनी म्हटले आहे.

Udayanidhi Stalin: सनातन धर्म समता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे आणि त्याचे निर्मूलन केले पाहिजे, असे मत द्रमुकच्या युथ विंगचे सचिव आणि तामिळनाडूचे युवा कल्याणमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी व्यक्त केले. सनातन धर्माची तुलना त्यांनी कोरोना व्हायरस, मलेरिया आणि डेंग्यूशी केली. अशा गोष्टींना विरोध करू नका, तर नष्ट करा, असे आवाहनही त्यांनी केले. उदयनिधी यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना उदयनिधी यांनी भाजपवर पलटवार केला आहे. 

सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनिधी यांच्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात देशातील २६२ नामवंतांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. उदयनिधी आपल्या विधानावर ठाम आहेत. तर, भाजपकडून केल्या जाणाऱ्या टीकेला उदयनिधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 

PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर

भाजप नेत्यांनी माझ्या विधानाचा योग्य प्रकारे अर्थ घेतला नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, हे सर्वांना माहिती आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी मणिपूर हिंसाचार तसेच भ्रष्टाचारापासून लक्ष विचलित करण्यासाठी सनातन धर्माचा वापर करत आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून भाजपची सर्व आश्वासने पोकळ ठरली आहेत. तुम्ही आमच्या कल्याणासाठी नेमके काय केले, असा प्रश्न भाजप सरकारविरोधात संपूर्ण देश एकजुटीने करत आहे. पंतप्रधान मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर केला जात आहे, अशी घणाघाती टीका उदयनिधी यांनी केली. 

दरम्यान, आश्चर्याची बाब म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री फेक न्यूजच्या आधारे माझ्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. मंत्री पदावर असताना त्यांनी माझी बदनामी केली, म्हणून त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल केले पाहिजेत. पण मला माहिती आहे की, अशा प्रकारे व्यक्त होणे ही त्यांची अस्तित्व टिकवण्याची पद्धत आहे. त्यांना जगण्याचा दुसरा मार्ग माहिती नाही, म्हणून कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उदयनिधी यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा