शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Sterlite Protest : पोलिसांच्या गोळीबारात झालेल्या 13 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 13:30 IST

तुतिकोरिनमधील स्टरलाइट कंपनीच्या विरोधात मंगळवारी (22 मे) झालेल्या  निदर्शनांत पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये मरण पावलेल्यांची संख्या 13वर गेली असून, परिसरात आजही प्रचंड तणाव आहे.

मदुराई - तुतिकोरिनमधील स्टरलाइट कंपनीच्या विरोधात मंगळवारी (22 मे) झालेल्या निदर्शनांत पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये मरण पावलेल्यांची संख्या 13वर गेली असून, परिसरात आजही प्रचंड तणाव आहे. गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयाची काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी भेट घेण्याची शक्यता आहे. यासाठी तुतिकोरिनमधील परिस्थिती नियंत्रणात येण्याची प्रतीक्षा सध्या केली जात आहे. राहुल गांधी यांचा तामिळनाडू दौऱ्याचा कार्यक्रम एक-दोन दिवसांत निश्चित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या निर्दशनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात झालेल्या 13 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?, असा प्रश्नदेखील राहुल गांधी यानी उपस्थित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी येथील नागरिकांशी संवाद साधू इच्छित आहेत. मात्र आता सद्यपरिस्थितीमुळे नागरिकांसोबत संवाद साधणं अशक्य आहे. शिवाय, परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तुतिकोरिनमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पहिल्या दिवशी 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन जखमींचा मृत्यू झाला. बुधवारीदेखील स्टरलाइट स्टरलाइट कंपनीविरोधात निदर्शन करणाऱ्या लोकांनी हिंसाचार करत पोलिसांच्याही कित्येक वाहनांची जाळपोळ केली. अद्यापही तेथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. यामुळे राहुल गांधी येथील हिंसाचार थांबवण्याची प्रतीक्षा करत आहेत. 

दुसरीकडे, तुतिकोरिन परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. येथील सर्व रुग्णालयांत जखमींची गर्दी झाली आहे. या कंपनीच्या कॉपर प्लांट योजनेला प्रस्तावाला मद्रास उच्च न्यायालयानं बुधवारी (23 मे) स्थगिती दिली. तसंच मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नये, असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. पोलिसांनी पोटाच्या वरच गोळ्या माकल्याचा आरोप करण्यात आला असून, याची तपासणी केली जाणार आहे. केंद्र सरकारनंही या गोळीबाराची तसंच तेथील स्थितीची माहिती मागवली आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगही या प्रकाराची चौकशी करणार आहे.

तुतिकोरिनमध्ये निदर्शकांवर गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला? तुतिकोरिनचे नवे जिल्हाधिकारी संदीप नंदूरी यांनी सांगितले की, गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला?, याचा तपशिल यासंबंधी स्थापन करण्यात आलेला आयोग देऊ शकतो. निदर्शनादरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या, जखमी झालेल्या आणि सोबत अटक करण्यात आलेल्या लोकांची एक यादी लवकरच जारी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.  

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस