शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

कामाच्या तणावाचा आणखी एक बळी; सॉफ्टवेअर इंजिनिअरने विजेच्या धक्क्याने स्वतःला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 11:23 IST

तमिळनाडूमध्ये कामाच्या तणावाखाली असलेल्या एका अभियंत्याने स्वतःला अत्यंत भयानक पद्धतीने स्वतःला संपवले.

Shocking News तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये कामाच्या तणावाखाली एका सॉफ्टवेअर अभियंत्याने स्वतःला भयानकपणे संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्या महाबलीपुरम रोड जवळील थजंबूर येथे एका सॉफ्टवेअर अभियंत्याने स्वत:ला विजेचा धक्का देऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरातून घरी परतलेल्या पत्नीला तो बेशुद्धावस्थेत आणि त्याच्याभोवती तार गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला.

कार्तिकेयन (३८) असं मृत अभियंत्याचे नाव असून तो मूळचा थेनीचा रहिवासी आहे. कार्तिकेयन हा पल्लवरम येथील एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये गेल्या १५ वर्षांपासून नोकरीला होता. कार्तिकेयन हा त्याची पत्नी के जयराणी आणि त्यांच्या १० आणि ८ वर्षांच्या दोन मुलांसोबत राहत होता. कामाच्या दबावामुळे त्याने नैराश्याची तक्रार त्याने केली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्यावर मेडावक्कम येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

सोमवारी जयराणी बचतगटातील तिच्या मैत्रिणींसोबत थिरुनल्लारू मंदिरात गेली होती. कार्तिकेयनला घरी एकटे सोडून तिने आपल्या मुलांना आईकडे ठेवले होते. गुरुवारी रात्री ती परत आली असता दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. वारंवार दरवाजा ठोकूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने दुसरी चावी वापरली आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघताच जयराणीला धक्का बसला. घरात कार्तिकेयन बेशुद्ध पडलेला होता.

कार्तिकेयनने केवळ अंतर्वस्त्र घातले होते आणि हॉलमधील मुख्य जंक्शन बॉक्सला जोडलेल्या पॉवर केबलने त्याचे संपूर्ण शरीर गुंडाळले होते. हे पाहून घाबरलेल्या जयराणीने शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ थाळंबूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी कार्तिकेयनचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी क्रोमपेट सरकारी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून कार्तिकेयनने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास सुरु केला आहे.

कामाच्या ताणामुळे पुण्यात तरुणीचा मृत्यू

पुण्यातील अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) कंपनीच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या २६ वर्षीय सीए अॅना सेबॅस्टियन पिरेयिल हिचा अतिकामामुळे आणि तणावामुळे बळी गेला. नोकरीला लागल्यानंतर अवघ्या चार महिन्यात अॅनाचा मृत्यू झाला. अॅना कामावर रूजू झाल्यापासून प्रंचड तणावाखाली होती. तिच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांनी कंपनीच्या भारतीय प्रमुखांना पत्र लिहित गंभीर आरोप केले होते. या घटनेची मोदी सरकारने गंभीर दखल घेतली आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस