शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

मोदींनी भेटावं तरी नाहीतर आत्महत्येची परवानगी द्यावी, तामिळनाडूमधील शेतक-यांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 15:32 IST

'एकतर आम्हाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची परवानगी द्या नाहीतर आत्महत्या करु दे'

नवी दिल्ली, दि. 22 - केंद्र सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळत नसल्याने जंतर मंतरवर आंदोलनाला बसलेल्या तामिळनाडूमधील शेतक-यांनी आत्महत्येची परवानगी मागितली आहे. शेतक-यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं असून, त्यामध्ये आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्या अशी विनंतीच करण्यात आली आहे. एकतर आम्हाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची परवानगी द्या नाहीतर आत्महत्या करु दे असं शेतक-यांनी सांगितलं आहे. 

निवेदनात शेतकरी संघटनेने आमचं कर्ज माफ करा तसंच दुष्काळ निधी म्हणून 40 हजार रुपये देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. 'कृपया आमच्या मागण्या मांडण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटण्याची परवानगी द्या. नाहीतर आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्या', असं शेतक-यांनी निवेदनातून सांगितलं आहे. तामिळनाडूमधील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहेत. जंतर मंतरवर गेल्या 37 दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरु आहे.  

'मंत्रालयाने आमचं निवेदन स्विकारावं अशी विनंती आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिक असून पिकांचं नुकसान झाल्याने हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. राष्ट्रपतींनी आम्हाला भेटावं, आमच्याशी चर्चा करुन समस्या समजून घ्यायला हव्यात. नाहीतर आम्ही आत्महत्या करु', असं वक्तव्य आंदोलनाचं नेतृत्व करत असलेले प्रेम यांनी सांगितलं आहे. 

दुसरीकडे कर्नाटकात कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या सुरु असून एका महिन्यात 90 शेतक-यांनी जीवनयात्रा संपवली आहे. अधिकृत माहितीनुसार, गेल्या जुलै महिन्यात 90 हून जास्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुखमंत्री सिद्धरमय्या यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी 8,165 कोटी रुपयांची कर्जमाफी करत असल्याचं जाहीर केलं होतं. राज्यातील 22 लाख शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचं ओझं कमी करण्याच्या हेतूने ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतक-यांच्या आत्महत्या काही थांबत नसल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिलपासून ते 30 जून दरम्यान दिवसाला दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. मात्र जुलै महिन्यात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. जुलै महिन्यात दिवसाला तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आला आहे. गेल्या चार महिन्यात एकूण 297 शेतक-यांनी आत्महत्या केली असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीNew Delhiनवी दिल्ली