शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी भेटावं तरी नाहीतर आत्महत्येची परवानगी द्यावी, तामिळनाडूमधील शेतक-यांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 15:32 IST

'एकतर आम्हाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची परवानगी द्या नाहीतर आत्महत्या करु दे'

नवी दिल्ली, दि. 22 - केंद्र सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळत नसल्याने जंतर मंतरवर आंदोलनाला बसलेल्या तामिळनाडूमधील शेतक-यांनी आत्महत्येची परवानगी मागितली आहे. शेतक-यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं असून, त्यामध्ये आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्या अशी विनंतीच करण्यात आली आहे. एकतर आम्हाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची परवानगी द्या नाहीतर आत्महत्या करु दे असं शेतक-यांनी सांगितलं आहे. 

निवेदनात शेतकरी संघटनेने आमचं कर्ज माफ करा तसंच दुष्काळ निधी म्हणून 40 हजार रुपये देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. 'कृपया आमच्या मागण्या मांडण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटण्याची परवानगी द्या. नाहीतर आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्या', असं शेतक-यांनी निवेदनातून सांगितलं आहे. तामिळनाडूमधील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहेत. जंतर मंतरवर गेल्या 37 दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरु आहे.  

'मंत्रालयाने आमचं निवेदन स्विकारावं अशी विनंती आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिक असून पिकांचं नुकसान झाल्याने हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. राष्ट्रपतींनी आम्हाला भेटावं, आमच्याशी चर्चा करुन समस्या समजून घ्यायला हव्यात. नाहीतर आम्ही आत्महत्या करु', असं वक्तव्य आंदोलनाचं नेतृत्व करत असलेले प्रेम यांनी सांगितलं आहे. 

दुसरीकडे कर्नाटकात कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या सुरु असून एका महिन्यात 90 शेतक-यांनी जीवनयात्रा संपवली आहे. अधिकृत माहितीनुसार, गेल्या जुलै महिन्यात 90 हून जास्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुखमंत्री सिद्धरमय्या यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी 8,165 कोटी रुपयांची कर्जमाफी करत असल्याचं जाहीर केलं होतं. राज्यातील 22 लाख शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचं ओझं कमी करण्याच्या हेतूने ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतक-यांच्या आत्महत्या काही थांबत नसल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिलपासून ते 30 जून दरम्यान दिवसाला दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. मात्र जुलै महिन्यात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. जुलै महिन्यात दिवसाला तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आला आहे. गेल्या चार महिन्यात एकूण 297 शेतक-यांनी आत्महत्या केली असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीNew Delhiनवी दिल्ली