शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी भेटावं तरी नाहीतर आत्महत्येची परवानगी द्यावी, तामिळनाडूमधील शेतक-यांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 15:32 IST

'एकतर आम्हाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची परवानगी द्या नाहीतर आत्महत्या करु दे'

नवी दिल्ली, दि. 22 - केंद्र सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळत नसल्याने जंतर मंतरवर आंदोलनाला बसलेल्या तामिळनाडूमधील शेतक-यांनी आत्महत्येची परवानगी मागितली आहे. शेतक-यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं असून, त्यामध्ये आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्या अशी विनंतीच करण्यात आली आहे. एकतर आम्हाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची परवानगी द्या नाहीतर आत्महत्या करु दे असं शेतक-यांनी सांगितलं आहे. 

निवेदनात शेतकरी संघटनेने आमचं कर्ज माफ करा तसंच दुष्काळ निधी म्हणून 40 हजार रुपये देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. 'कृपया आमच्या मागण्या मांडण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटण्याची परवानगी द्या. नाहीतर आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्या', असं शेतक-यांनी निवेदनातून सांगितलं आहे. तामिळनाडूमधील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहेत. जंतर मंतरवर गेल्या 37 दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरु आहे.  

'मंत्रालयाने आमचं निवेदन स्विकारावं अशी विनंती आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिक असून पिकांचं नुकसान झाल्याने हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. राष्ट्रपतींनी आम्हाला भेटावं, आमच्याशी चर्चा करुन समस्या समजून घ्यायला हव्यात. नाहीतर आम्ही आत्महत्या करु', असं वक्तव्य आंदोलनाचं नेतृत्व करत असलेले प्रेम यांनी सांगितलं आहे. 

दुसरीकडे कर्नाटकात कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या सुरु असून एका महिन्यात 90 शेतक-यांनी जीवनयात्रा संपवली आहे. अधिकृत माहितीनुसार, गेल्या जुलै महिन्यात 90 हून जास्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुखमंत्री सिद्धरमय्या यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी 8,165 कोटी रुपयांची कर्जमाफी करत असल्याचं जाहीर केलं होतं. राज्यातील 22 लाख शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचं ओझं कमी करण्याच्या हेतूने ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतक-यांच्या आत्महत्या काही थांबत नसल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिलपासून ते 30 जून दरम्यान दिवसाला दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. मात्र जुलै महिन्यात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. जुलै महिन्यात दिवसाला तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आला आहे. गेल्या चार महिन्यात एकूण 297 शेतक-यांनी आत्महत्या केली असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीNew Delhiनवी दिल्ली