शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पंजाबमधील अकाली दल आणि भाजपमधील चर्चा निष्फळ; 'या' मुद्द्यामुळे युती होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 12:46 IST

पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजप आणि अकाली दल यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे.

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार असून सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू होती. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे, भाजप आणि अकाली दल यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. लोकसभा निवडणुकी आधी एनडीए विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि अकाली दल यांच्यात पंजाबमध्ये युतीबाबत काही काळ चर्चा सुरू होती.

राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' नियोजित वेळेपूर्वी संपणार? कारण... 

आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने पंजाबमध्ये एकत्र निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने आपली रणनीती बदलली आहे. शेतकरी आंदोलन आणि शीख कैद्यांच्या सुटकेबाबत अकाली दल भाजपवर दबाव टाकत आहे. याशिवाय पंजाबचे भाजप नेतृत्वही युतीच्या बाजूने नव्हते. यामुळे ही युतीची चर्चा निष्फळ ठरली असल्याचे बोलले जात आहे. 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवे कृषी कायदे आणले होते, तेव्हा अकाली दलाने त्याचा विरोध करत एनडीएतून बाहेर पडले होते. त्यानंतर अकाली दलाने बहुजन समाज पक्षासोबत युती करून पंजाब विधानसभेची निवडणूक लढवली.

भाजप पंजाबमधील लोकसभेच्या १३ पैकी ६ जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी करत आहे, तर अकाली दल इतक्या जागा देण्यास तयार नाही. अकाली दल जेव्हा एनडीएचा भाग होता तेव्हा तो १० जागांवर निवडणूक लढवत होते आणि भाजप तीन जागांवर निवडणूक लढवत होती. सध्या पंजाबमध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात युती आहे. पंजाबमध्ये बसपचा चांगला प्रभाव असल्याने त्यांना ही युती तोडायची नसल्याचे बोलले जात आहे. सुखदेव सिंह धिंडसा यांचा गटही अकाली दलात सामील झाल्याची चर्चा आहे. त्याचवेळी भाजपने पंजाबमध्ये अकाली दलाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अकाली नेत्यांनी केला आहे.

टॅग्स :PunjabपंजाबBJPभाजपा