शहरं
Join us  
Trending Stories
1
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
2
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
4
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
5
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
6
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
7
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
8
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
9
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
10
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
11
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
12
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
13
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
14
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
15
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
16
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
17
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
18
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
19
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
20
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

केजरीवाल पंजाबचे CM बनण्याची चर्चा, दिल्लीतील आपच्या बैठकीनंतर भगवंत मान यांचं मोठं विधान, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:08 IST

Bhagwant Maan News: आज दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि राज्यातील आपच्या आमदार आणि खासदारांसोबत अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती देतानाच सध्याच्या घडामोडींबाबत मोठं विधान केलं आहे. 

नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर स्वत: अरविंद केजरीवाल हेही त्यांच्या मतदारसंघात पराभूत झाले. या पराभवानंतर आपची सत्ता असलेल्या पंजाबमधील सरकारमध्ये मोठी उलथापालथ होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पंजाबमधील आम आदमी पक्षामध्ये फूट पडण्याचे दावे केले जात होते. तसेच केजरीवाल हे पंजाबचं मुख्यमंत्रिपद स्वीकारू शकतात, असेही सांगितले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि राज्यातील आपच्या आमदार आणि खासदारांसोबत अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती देतानाच सध्याच्या घडामोडींबाबत मोठं विधान केलं आहे.

भगवंत मान म्हणाले की, पंजाब सरकारचं संपूर्ण कॅबिनेट आणि आमच्या सर्व आमदारांनी कपूरथला हाऊसमध्ये आमच्या पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासोबत बैठकीत सहभाग घेतला. आम आदमी पक्षाच्या पंजाब संघटनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीत खूप मेहनत घेतली होती. त्यासाठी अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांनी पंजाबमधील नेत्यांचे आभार मानले. पंजाबमधील आमचं सरकार लोकांच्या हितासाठी वीज, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात खूप काम करत आहे.

भगवंत मान पुढे म्हणाले की, आपच्या १० वर्षांच्या सत्ताकाळात दिल्लीत जे काम झालं तेवढं काम मागच्या ७५ वर्षांत झालं नव्हतं. हारजीत राजकारणाचा भाग आहे. आम्ही दिल्लीत आलेल्या अनुभवाचा उपयोग पंजाबमध्ये करणार आहोत. आम्ही दिल्लीतील जनादेशाचा सन्मान करतो. आता आम्ही पंजाबला एक मॉडेल स्टेट म्हणून विकसित करू. आम्ही असं पंजाब राज्य घडवू की संपूर्ण देश त्याकडे पाहील. आम्हाला विकासकामांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. आमची पार्श्वभूमी सर्वसामान्य आहे. अधिकाधिक लोकांचं मन कसं जिंकता येईल, या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत. मागच्या काही काळात मोठमोठ्या कंपन्यांकडून पंजाबमध्ये गुंतवणूक होत आहे.

आम आदमी पक्षाचे ३० आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा प्रताप सिंह बाजवा यांनी केलेला दावा भगवंत मान यांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, ते मागच्या तीन वर्षांपासून आम आदमी पक्षाचे ३० ते ४० आमदार संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. त्यांना असे दावे करत राहू द्या.  त्यांनी आपच्या आमदारांची काळजी सोडून दिल्लीतील काँग्रेसच्या आमदारांची संख्या मोजली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, भगवंत मान हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात असून, कुठल्याही क्षणी बंड करू शकतात, असा दावा काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मान म्हणाले की, त्यांना बोलायचं ते बोलू द्या. त्यांनी असे दावे करणं सुरू ठेवावं. त्यांच्या पक्षात अशी संस्कृती आहे. त्यामुळे ते असे दावे करतात. आम्ही हा पक्ष आम्ही मेहनतीने उभा केला आहे. त्यामुळे हा पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.   

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाब