शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

कायदा आणि सुव्यवस्था राखा; केंद्रीय गृह मंत्रालयाचे प. बंगाल सरकारला आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 08:59 IST

जे कोणी अधिकारी बेजबाबदारपणे वागत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल

कोलकाता - भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमधील तणाव निवडणूक निकालानंतरही शमला नसल्याचं चित्र आहे. शनिवारी तृणमूल आणि भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या राड्यात भाजपाच्या 3 आणि तृणमूलच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने या घटनेचा सविस्तर अहवाल मागविला असून राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच जे कोणी अधिकारी बेजबाबदारपणे वागत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा गृह मंत्रालयाने दिला आहे. भाजपाचे प्रदेश महासचिव सयांतन बसु यांनी भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांचा हिंसक घटनेत मृत्यू झाल्याचं सांगितलं. तपन मंडल, सुकांत मंडल आणि प्रदीप मंडल असं या कार्यकर्त्यांची नावे आहेत. भाजपा नेते मुकुल रॉय यांनीही ट्विट करत घडलेल्या हिंसक प्रकाराला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. 

तसेच मुकुल रॉय यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालमधील घटनेबाबत आढावा दिला आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री ज्योतिप्रियो मलिक यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्याची हत्या केली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम राज्य सरकार करेल यामध्ये केंद्र सरकारचं देणंघेणं नाही. 

लोकसभा निवडणुकीदरम्यानही पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसेचे अनेक प्रकार समोर आले होते. तसेच काही कार्यकत्यांची हत्या झाली होती. कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावरून शनिवारी भाजपाचे स्थानिक नेते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. तसेच रविवारी अंत्यसंस्कारासाठी बशीरहाट येथील पक्ष कार्यालयात नेण्यात येणारे भाजपा कार्यकर्त्यांचे मृतदेह मध्येच अडवण्यात आले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यातच या दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यर्त्यामधील वैर दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, बशीरहाट लोकसभा मतदारसंघात झालेल्या हिंसाचारात चार भाजपा कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येसाठी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे नेते मुकुल रॉय यांनी केला होता. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने कडवे आव्हान दिले होते. दरम्यान, लोकसभेची निवडणूक तणावपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर राज्यात झालेली हिंसाचाराची ही पहिलीच मोठी घटवा आहे. संदेशखली बशिरहाट लोकसभा मतदारसंघामधील भाग असून, बशीरहाटमधून नुसरत जहाँ या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

दरम्यान पोलिसांवर मनमानी केल्याचा आरोप करत भाजपाने सोमवारी (10 जून) रोजी बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आलेला आहे. भाजपा हा दिवस काळा दिवस म्हणून पाळून राज्य सरकारचा निषेध करणार आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालHome Ministryगृह मंत्रालयtmcठाणे महापालिकाBJPभाजपा