शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

कायदा आणि सुव्यवस्था राखा; केंद्रीय गृह मंत्रालयाचे प. बंगाल सरकारला आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 08:59 IST

जे कोणी अधिकारी बेजबाबदारपणे वागत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल

कोलकाता - भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमधील तणाव निवडणूक निकालानंतरही शमला नसल्याचं चित्र आहे. शनिवारी तृणमूल आणि भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या राड्यात भाजपाच्या 3 आणि तृणमूलच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने या घटनेचा सविस्तर अहवाल मागविला असून राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच जे कोणी अधिकारी बेजबाबदारपणे वागत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा गृह मंत्रालयाने दिला आहे. भाजपाचे प्रदेश महासचिव सयांतन बसु यांनी भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांचा हिंसक घटनेत मृत्यू झाल्याचं सांगितलं. तपन मंडल, सुकांत मंडल आणि प्रदीप मंडल असं या कार्यकर्त्यांची नावे आहेत. भाजपा नेते मुकुल रॉय यांनीही ट्विट करत घडलेल्या हिंसक प्रकाराला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. 

तसेच मुकुल रॉय यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालमधील घटनेबाबत आढावा दिला आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री ज्योतिप्रियो मलिक यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्याची हत्या केली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम राज्य सरकार करेल यामध्ये केंद्र सरकारचं देणंघेणं नाही. 

लोकसभा निवडणुकीदरम्यानही पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसेचे अनेक प्रकार समोर आले होते. तसेच काही कार्यकत्यांची हत्या झाली होती. कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावरून शनिवारी भाजपाचे स्थानिक नेते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. तसेच रविवारी अंत्यसंस्कारासाठी बशीरहाट येथील पक्ष कार्यालयात नेण्यात येणारे भाजपा कार्यकर्त्यांचे मृतदेह मध्येच अडवण्यात आले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यातच या दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यर्त्यामधील वैर दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, बशीरहाट लोकसभा मतदारसंघात झालेल्या हिंसाचारात चार भाजपा कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येसाठी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे नेते मुकुल रॉय यांनी केला होता. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने कडवे आव्हान दिले होते. दरम्यान, लोकसभेची निवडणूक तणावपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर राज्यात झालेली हिंसाचाराची ही पहिलीच मोठी घटवा आहे. संदेशखली बशिरहाट लोकसभा मतदारसंघामधील भाग असून, बशीरहाटमधून नुसरत जहाँ या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

दरम्यान पोलिसांवर मनमानी केल्याचा आरोप करत भाजपाने सोमवारी (10 जून) रोजी बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आलेला आहे. भाजपा हा दिवस काळा दिवस म्हणून पाळून राज्य सरकारचा निषेध करणार आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालHome Ministryगृह मंत्रालयtmcठाणे महापालिकाBJPभाजपा