शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करा; केंद्रीय गृह खात्याने महाराष्ट्र सरकारला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:36 IST

या घुसखोरांमधील काही दहशतवादी संघटनांशी जोडले असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्रालयानेमहाराष्ट्र सरकारला बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडूनमहाराष्ट्रातील गृह विभागाला पत्र दिलं आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी अवैध बांगलादेशी घुसखोरांविरोधात आलेल्या रिपोर्टचा हवाला देत गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं होते. शेवाळे यांनी टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) च्या अहवालावरून बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा उचलून धरला.

नुकतेच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. हा हल्लेखोर बांगलादेशातून घुसखोरी करून भारतात आला होता. मुंबई पोलिसांनी ३० वर्षीय बांगलादेशी घुसखोर शरीफुल इस्लाम याला सैफवरील हल्ल्याप्रकरणी अटक केली. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्सने बांगलादेशी घुसखोरांवर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक रिपोर्ट जारी केला होता. त्या रिपोर्टनुसार, बांगलादेश आणि म्यानमारहून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करणाऱ्यांमुळे मुंबईत सामाजिक आर्थिक गंभीर परिणाम होत आहेत असं म्हटलं होते.

या अवैध बांगलादेशींमुळे शहरातील मजुरांना रोजगार मिळत नाहीत. मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे ज्यामुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. १९६१ साली मुंबईत हिंदूंची लोकसंख्या ८८ टक्के होती, जी २०११ साली ६६ टक्के झाली. मुस्लीम लोकसंख्या ८ टक्क्यांवरून २१ टक्के इतकी झाली. घुसखोरांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांवर दबाव येत आहे. आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या सुविधेवर ताण पडून स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या घुसखोरांमधील काही दहशतवादी संघटनांशी जोडले असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे यांची नावे निवडणूक यादीत टाकली जातात ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या सर्व प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करत याच्याशी निगडीत सर्व समस्यांना मुळापासून उपटून काढण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रHome Ministryगृह मंत्रालयBangladeshबांगलादेशSaif Ali Khanसैफ अली खान