शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करा; केंद्रीय गृह खात्याने महाराष्ट्र सरकारला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:36 IST

या घुसखोरांमधील काही दहशतवादी संघटनांशी जोडले असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्रालयानेमहाराष्ट्र सरकारला बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडूनमहाराष्ट्रातील गृह विभागाला पत्र दिलं आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी अवैध बांगलादेशी घुसखोरांविरोधात आलेल्या रिपोर्टचा हवाला देत गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं होते. शेवाळे यांनी टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) च्या अहवालावरून बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा उचलून धरला.

नुकतेच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. हा हल्लेखोर बांगलादेशातून घुसखोरी करून भारतात आला होता. मुंबई पोलिसांनी ३० वर्षीय बांगलादेशी घुसखोर शरीफुल इस्लाम याला सैफवरील हल्ल्याप्रकरणी अटक केली. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्सने बांगलादेशी घुसखोरांवर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक रिपोर्ट जारी केला होता. त्या रिपोर्टनुसार, बांगलादेश आणि म्यानमारहून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करणाऱ्यांमुळे मुंबईत सामाजिक आर्थिक गंभीर परिणाम होत आहेत असं म्हटलं होते.

या अवैध बांगलादेशींमुळे शहरातील मजुरांना रोजगार मिळत नाहीत. मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे ज्यामुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. १९६१ साली मुंबईत हिंदूंची लोकसंख्या ८८ टक्के होती, जी २०११ साली ६६ टक्के झाली. मुस्लीम लोकसंख्या ८ टक्क्यांवरून २१ टक्के इतकी झाली. घुसखोरांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांवर दबाव येत आहे. आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या सुविधेवर ताण पडून स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या घुसखोरांमधील काही दहशतवादी संघटनांशी जोडले असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे यांची नावे निवडणूक यादीत टाकली जातात ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या सर्व प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करत याच्याशी निगडीत सर्व समस्यांना मुळापासून उपटून काढण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रHome Ministryगृह मंत्रालयBangladeshबांगलादेशSaif Ali Khanसैफ अली खान