शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

पाकच्या कृत्याचा बदला घेणार

By admin | Updated: May 5, 2017 01:34 IST

भारतीय जवानांच्या मृतदेहाची पाकिस्तानच्या निर्दयी सैनिकांनी केलेल्या घोर विटंबनेचा जरूर बदला घेतला जाईल, असे ठोस संकेत

नवी दिल्ली : भारतीय जवानांच्या मृतदेहाची पाकिस्तानच्या निर्दयी सैनिकांनी केलेल्या घोर विटंबनेचा जरूर बदला घेतला जाईल, असे ठोस संकेत भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिले आहेत. जोवर प्रत्यक्षात कारवाई फत्ते होत नाही, तोवर भारतीय लष्कर आपली कृती योजना उघड करीत नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी पाकिस्तानच्या या निर्दयी कृत्याला भारतीय सशस्त्र दले तडाखेबाज उत्तर देतील, अशी ठाम ग्वाही दिली.पाकिस्तानी सैनिकांच्या या निर्दयी कृत्याने भारतात सर्वत्र संताप व्यक्त होत असून, भारतानेही याचा सूड घ्यावा, अशी मागणी जोर धरीत आहे. भारतीय लष्कर बदला घेणार का? कधी व कशा पद्धतीने बदला घेणार? अशा एकापाठोपाठ विचारलेल्या प्रश्नांना सामोरे जात लष्करप्रमुख जन. बिपीन रावत म्हणाले की, प्रत्यक्षात अमलात आणण्याआधी भारतीय लष्कर भविष्यातील कृती योजना उघड करीत नाही. ही कामगिरी फत्ते केल्यानंतरच तपशिलाने याबाबतची माहिती जाहीर केली जाईल, असे सांगत त्यांनी यावर अधिक खुलासेवार बोलण्याचे टाळले.मंगळवारीच भारतीय लष्कराचे उपप्रमुख शरद चंद यांनी सांगितले होते की, आम्ही आमच्या पसंतीने वेळ आणि ठिकाण निवडून पाकिस्ताच्या अघोरी कृत्याला उत्तर देऊ. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले होते की, भारताच्या या दोन जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारतील सशस्त्र दले पाकिस्तानी सैन्याच्या या अमानुष कृत्याला चोख उत्तर देतील. पाकिस्तानी सीमा कृती पथकाने भारताच्या दोन जवानांचा शिरच्छेद करून घोर विटंबना केली होती. या कृत्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचे, यासाठी भारतीय लष्कर विविध पर्याय पडताळून पाहत आहे, असे सूत्रांनी सांगितले.काश्मीरमध्ये व्यापक शोधमोहीमठिकठिकाणी दडी मारून बसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यसाठी हेलिकॉप्टर, ड्रोन आणि ४ हजार जवानांनी व्यापक शोधमोहीम राबवून दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्हा पिंजून काढला. दडी मारून बसलेल्या आणि सुरक्षा दलावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना हुडकून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लष्कर, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासह सुरक्षा दलांनी गावागावांत जाऊन गुरुवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू केली. काश्मीर खोऱ्यातील ही आजवरची सर्वात मोठी मोहीम आहे, असे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. घरोघरी जाऊन शोध घेण्याची पद्धत १९९० च्या उत्तरार्धात बंद करण्यात आली होती. ती आज पुन्हा सुरू करण्यात आली. कसून तपासणी करून दहशतवाद्यांना शोधता यावे म्हणून गावकऱ्यांना सामूहिक जागी जमा होण्यास सांगण्यात आले आहे.या मोहिमेदरम्यान अद्याप कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही.  या भागात विदेशी दहशतवाद्यांसह काही दहशतवादी दबा धरून असल्याची खबर गुप्तचर विभागाने दिल्यानंतर या भागात सर्वत्र नाकेबंदी करून कसून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. तुरकावंगन गावातील किरकोळ दगडफेकीचा प्रकार वगळता ही मोहीम सुरळीत होती. एकाही दहशतवाद्याला निसटून जाता येऊ नये म्हणून शोधमोहिमेनंतर खात्री करण्यासाठी हा भाग पुन्हा एकदा पिंजून काढण्यात आला. दरम्यान, दिल्लीत लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले की, शोधमोहीम काही नवीन नाही. मागेही अनेकदा शोधमोहिमा राबविण्यात आल्या होत्या.घुसखोरी रोखण्यासाठी चोख उपायमागच्या वर्षी सर्जिकल स्ट्राईक करून उद्ध्वस्त करण्यात आलेले नियंत्रण रेषेपलीकडचे दहशतवाद्यांचे अड्डे पुन्हा सक्रिय झाले आहेत का? यावर लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले की, घुसखोरी रोखण्यासाठी चोख उपाय योजण्यात आले आहेत. बर्फ वितळत आहे. उन्हाळाही सुरू झाला आहे. तेव्हा दरवर्षीप्रमाणे घुसखोरी होईल. आम्ही सर्वतोपरी उपाय योजले आहेत. दक्षिण काश्मीरमधील शोपियाना जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध ठिकाणी दहशतवादीविरोधी मोहीम सुरू करण्यात आली. काही बँका लुटण्यात आल्या असून, काही पोलिसांनाही ठार करण्यात आल्याने या जिल्ह्यात सर्वत्र व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.