शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

पाकच्या कृत्याचा बदला घेणार

By admin | Updated: May 5, 2017 01:34 IST

भारतीय जवानांच्या मृतदेहाची पाकिस्तानच्या निर्दयी सैनिकांनी केलेल्या घोर विटंबनेचा जरूर बदला घेतला जाईल, असे ठोस संकेत

नवी दिल्ली : भारतीय जवानांच्या मृतदेहाची पाकिस्तानच्या निर्दयी सैनिकांनी केलेल्या घोर विटंबनेचा जरूर बदला घेतला जाईल, असे ठोस संकेत भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिले आहेत. जोवर प्रत्यक्षात कारवाई फत्ते होत नाही, तोवर भारतीय लष्कर आपली कृती योजना उघड करीत नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी पाकिस्तानच्या या निर्दयी कृत्याला भारतीय सशस्त्र दले तडाखेबाज उत्तर देतील, अशी ठाम ग्वाही दिली.पाकिस्तानी सैनिकांच्या या निर्दयी कृत्याने भारतात सर्वत्र संताप व्यक्त होत असून, भारतानेही याचा सूड घ्यावा, अशी मागणी जोर धरीत आहे. भारतीय लष्कर बदला घेणार का? कधी व कशा पद्धतीने बदला घेणार? अशा एकापाठोपाठ विचारलेल्या प्रश्नांना सामोरे जात लष्करप्रमुख जन. बिपीन रावत म्हणाले की, प्रत्यक्षात अमलात आणण्याआधी भारतीय लष्कर भविष्यातील कृती योजना उघड करीत नाही. ही कामगिरी फत्ते केल्यानंतरच तपशिलाने याबाबतची माहिती जाहीर केली जाईल, असे सांगत त्यांनी यावर अधिक खुलासेवार बोलण्याचे टाळले.मंगळवारीच भारतीय लष्कराचे उपप्रमुख शरद चंद यांनी सांगितले होते की, आम्ही आमच्या पसंतीने वेळ आणि ठिकाण निवडून पाकिस्ताच्या अघोरी कृत्याला उत्तर देऊ. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले होते की, भारताच्या या दोन जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारतील सशस्त्र दले पाकिस्तानी सैन्याच्या या अमानुष कृत्याला चोख उत्तर देतील. पाकिस्तानी सीमा कृती पथकाने भारताच्या दोन जवानांचा शिरच्छेद करून घोर विटंबना केली होती. या कृत्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचे, यासाठी भारतीय लष्कर विविध पर्याय पडताळून पाहत आहे, असे सूत्रांनी सांगितले.काश्मीरमध्ये व्यापक शोधमोहीमठिकठिकाणी दडी मारून बसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यसाठी हेलिकॉप्टर, ड्रोन आणि ४ हजार जवानांनी व्यापक शोधमोहीम राबवून दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्हा पिंजून काढला. दडी मारून बसलेल्या आणि सुरक्षा दलावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना हुडकून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लष्कर, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासह सुरक्षा दलांनी गावागावांत जाऊन गुरुवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू केली. काश्मीर खोऱ्यातील ही आजवरची सर्वात मोठी मोहीम आहे, असे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. घरोघरी जाऊन शोध घेण्याची पद्धत १९९० च्या उत्तरार्धात बंद करण्यात आली होती. ती आज पुन्हा सुरू करण्यात आली. कसून तपासणी करून दहशतवाद्यांना शोधता यावे म्हणून गावकऱ्यांना सामूहिक जागी जमा होण्यास सांगण्यात आले आहे.या मोहिमेदरम्यान अद्याप कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही.  या भागात विदेशी दहशतवाद्यांसह काही दहशतवादी दबा धरून असल्याची खबर गुप्तचर विभागाने दिल्यानंतर या भागात सर्वत्र नाकेबंदी करून कसून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. तुरकावंगन गावातील किरकोळ दगडफेकीचा प्रकार वगळता ही मोहीम सुरळीत होती. एकाही दहशतवाद्याला निसटून जाता येऊ नये म्हणून शोधमोहिमेनंतर खात्री करण्यासाठी हा भाग पुन्हा एकदा पिंजून काढण्यात आला. दरम्यान, दिल्लीत लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले की, शोधमोहीम काही नवीन नाही. मागेही अनेकदा शोधमोहिमा राबविण्यात आल्या होत्या.घुसखोरी रोखण्यासाठी चोख उपायमागच्या वर्षी सर्जिकल स्ट्राईक करून उद्ध्वस्त करण्यात आलेले नियंत्रण रेषेपलीकडचे दहशतवाद्यांचे अड्डे पुन्हा सक्रिय झाले आहेत का? यावर लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले की, घुसखोरी रोखण्यासाठी चोख उपाय योजण्यात आले आहेत. बर्फ वितळत आहे. उन्हाळाही सुरू झाला आहे. तेव्हा दरवर्षीप्रमाणे घुसखोरी होईल. आम्ही सर्वतोपरी उपाय योजले आहेत. दक्षिण काश्मीरमधील शोपियाना जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध ठिकाणी दहशतवादीविरोधी मोहीम सुरू करण्यात आली. काही बँका लुटण्यात आल्या असून, काही पोलिसांनाही ठार करण्यात आल्याने या जिल्ह्यात सर्वत्र व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.