शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

पुढच्या एअर स्ट्राइकवेळी विरोधकांनाही विमानाला बांधून न्या - व्ही. के. सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 18:28 IST

पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर  केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर  केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. ''पुढच्या वेळी भारताकडून अशी कारवाई होत असताना जे प्रश्न उपस्थित करतात त्यांना विमानाखाली बांधून घेऊन जावे, असे व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी लष्करप्रमुख आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या व्ही. के. सिंह यांनी एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ''पुढच्या वेळी जेव्हा अशी कारवाई होईल, तेव्हा विरोधी पक्षांमधील जी मंडळी शंका घेते त्यांनाही हवाई दलाने विमानाखाली बांधून सोबत नेले पाहिजे, असे मला वाटते. जेव्हा बॉम्ब टाकले जातील, तेव्हा ते पाहू शकतील. त्यानंतर त्यांना तिथेच सोडावे, जेणेकरून ते हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा मोजून परत येऊ शकतील.'' व्ही. के. सिंह यांनी याआघाडीही एअरस्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विरोधी पक्षनेते,  प्रसारमाध्यमे आणि विद्यार्थी नेत्यांवर टीका केली होती. सध्याची परिस्थिती पाहता देशांतर्गत भागातही एक सर्जिकल स्ट्राइक होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. '' दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताने इस्राइलचे अनुकरण केले पाहिजे, असे देशातील जनतेला वाटते. मात्र असे विरोधी पक्ष असतील तर ते होणार नाही. इस्राइलमधील विरोधी पक्ष आपल्या सैन्यावर संशय घेत नाही. तसेच त्यांना अपमानितही करत नाही. जेव्हा लष्कराकडून ऑपरेशन म्युनिकसारख्या कारवाई केली जाते, तेव्हा तिच्यावर शंका घेतली जात नाही, असे व्ही. के. सिंह म्हणाले. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारतPoliticsराजकारण