शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

पुढच्या एअर स्ट्राइकवेळी विरोधकांनाही विमानाला बांधून न्या - व्ही. के. सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 18:28 IST

पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर  केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर  केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. ''पुढच्या वेळी भारताकडून अशी कारवाई होत असताना जे प्रश्न उपस्थित करतात त्यांना विमानाखाली बांधून घेऊन जावे, असे व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी लष्करप्रमुख आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या व्ही. के. सिंह यांनी एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ''पुढच्या वेळी जेव्हा अशी कारवाई होईल, तेव्हा विरोधी पक्षांमधील जी मंडळी शंका घेते त्यांनाही हवाई दलाने विमानाखाली बांधून सोबत नेले पाहिजे, असे मला वाटते. जेव्हा बॉम्ब टाकले जातील, तेव्हा ते पाहू शकतील. त्यानंतर त्यांना तिथेच सोडावे, जेणेकरून ते हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा मोजून परत येऊ शकतील.'' व्ही. के. सिंह यांनी याआघाडीही एअरस्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विरोधी पक्षनेते,  प्रसारमाध्यमे आणि विद्यार्थी नेत्यांवर टीका केली होती. सध्याची परिस्थिती पाहता देशांतर्गत भागातही एक सर्जिकल स्ट्राइक होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. '' दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताने इस्राइलचे अनुकरण केले पाहिजे, असे देशातील जनतेला वाटते. मात्र असे विरोधी पक्ष असतील तर ते होणार नाही. इस्राइलमधील विरोधी पक्ष आपल्या सैन्यावर संशय घेत नाही. तसेच त्यांना अपमानितही करत नाही. जेव्हा लष्कराकडून ऑपरेशन म्युनिकसारख्या कारवाई केली जाते, तेव्हा तिच्यावर शंका घेतली जात नाही, असे व्ही. के. सिंह म्हणाले. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारतPoliticsराजकारण