शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

स्थलांतरित मजुरांची स्वत:च्या मुलांप्रमाणे काळजी घ्या, रेल्वेमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 05:57 IST

विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि त्याहून वरच्या अधिकाºयांसोबत रविवारी घेतलेल्या बैठकीत स्थलांतरित कामगारांच्या बाबतीत रेल्वेमंत्री खूपच भावूक झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : गेला दीड महिना अत्यंत खडतर परिस्थितीत काढलेल्या स्थलांतरित कामगारांचा मूळ राज्यांत परत जाण्याचा प्रवास सुकर व्हावा यासाठी जे काही चांगल्यात चांगले करता येण्यासारखे असेल ते करा. या कामगारांची स्वत:च्या मुलांप्रमाणे काळजी घ्या, अशी सूचना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि त्याहून वरच्या अधिकाºयांसोबत रविवारी घेतलेल्या बैठकीत स्थलांतरित कामगारांच्या बाबतीत रेल्वेमंत्री खूपच भावूक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एवढेच नव्हे तर गोयल यांनी या कामगारांसाठी विशेष ‘श्रमिक’ गाड्या सोडण्याच्या बाबतीत आधीची भूमिका बदलल्याचेही सूत्रांनी सांगितले.सूत्रांनसार २ मे रोजी झालेल्या बैठकीत गोयल यांनी अधिकाºयांना मालगाड्यांच्या वाहतुकीस प्राधान्य देणयास सांगितले होते. विशेष ‘श्रमिक’ रेल्वेगाड्या फक्त १७ मेपर्यंतच चालवाव्यात, राज्यांनी मागणी केली व आधी पैसे दिले तरच गाडी सोडावी आणि या गाड्यांना मध्ये कुठेही थांबे ठेवू नयेत, असेही रेल्वेमंत्र्यांनी त्या बैठकीत सांगितले होते.मात्र रविवारच्या बैठकीत त्यांनी अधिकाºयांना सांगितले की, जागेवरील परिस्थिती पाहून जे काही करणे शक्य असेल ते लगेच करा. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझी संमती आहे, असे गृहित धरून खर्चाच्या किंवा प्रशासकीय मंजुरीच्या बाबतीत रेल्वे मंडळाकडून होकार मिळण्याची वाट पाहूनका.बाहेर वाहतुकीचा अन्य साधने बंद असल्याने या मजुरांना घराच्या शक्यतो जवळपर्यंत जाता यावे यासाठी वाटेत त्यांना सोयीच्या अशा ठिकाणी गाडी थांबविण्याची व्यवस्था करा. त्यांना घ्यायला येणाºया बसना वेळ लागणार असेल तर या मजुरांना तोपर्यंत आरामशीर बसता यावे यासाठी रेल्वे स्टेशनच्या आवारात शामियाना उभारून तेथे पाण्याची व खाण्या-पिण्याची सोय करा, अशा सूचनाही गोयल यांनी दिल्याचे समजते.प्रत्येक जिल्ह्यातून विशेष गाडीरेल्वेमंत्र्यांच्या या बैठकीनंतर लगेचच जेथे रेल्वेची सोय आहे अशा प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या शहरातून हव्या त्या राज्यात विशेष ‘श्रमिक’ रेल्वेगाडी सोडण्याची तयारी रेल्वेने जाहीर केली.1,200 रेल्वे देशाच्या विविध भागातून निघण्यासाठी तयार आहेत. जिल्हाधिकाºयांनी मागणी केल्यास त्यांना हव्या त्या स्टेशनपासून गाडीची सोय तीन तासांत केली जाऊ शकेल, असे रेल्वेचे म्हणणे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpiyush goyalपीयुष गोयलrailwayरेल्वे