शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

श्यामा प्रसाद मुखर्जींच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने पंडित नेहरूंना लिहिले होते पत्र; जाणून घ्या, काय म्हटले होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 16:27 IST

30 जून 1953 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या आई जोगमाया देवी यांना पत्र लिहून शोक व्यक्त केला होता. यानंतर 4 जुलैला जोगमाया देवी यांनी त्या पत्राला उत्तर दिले होते.

ठळक मुद्देभारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेसवर अनेक प्रश्न उपस्थित केले.जे.पी.नड्डा यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या आईच्या पत्राचा उल्लेखही केला. जे पत्र त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना लिहिले होते.

नवी दिल्ली - भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी (Syama Prasad Mukherjee) यांची आज पुण्यतिथी. आजच्याच दिवशी 23 जून 1953 रोजी जम्मू काश्मीरमधील एक कारागृहात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेसवर अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, कॉंग्रेस पक्षातील लोकांची कोणतीही चौकशी केली नाही. या बरोबरच जे.पी.नड्डा यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या आईच्या पत्राचा उल्लेखही केला. जे पत्र त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना लिहिले होते. या पत्रात त्यानी नेमके काय लिहिले होते?

30 जून 1953 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या आई जोगमाया देवी यांना पत्र लिहून शोक व्यक्त केला होता. यानंतर 4 जुलैला जोगमाया देवी यांनी त्या पत्राला उत्तर दिले होते. या पत्रात त्यांनी लिहिले आहे, की कुठल्याही खटल्याशिवाय माझ्या मुलाचा अटकेतच मृत्यू झाला. आपण म्हणता, की माझा मुलगा अटकेत असताना आपण काश्मीरला गेला होता. आपण त्यांच्या प्रति आपल्या प्रेमाबद्दल बोलता.

जोगमाया देवी यांनी पत्रात लिहिले होते, की मला आश्चर्य वाटते, की आपल्याला त्यांची वैयक्तिक भेट घेण्यापासून आणि त्यांच्या आरोग्याबद्दल तसेच व्यवस्थेबद्दल विचारण्यापासून कुणी रोखले. त्यांच्या अटकेनंतर मला, त्यांच्या आईला, जम्मू-काश्मीर सरकारकडून पहिला संदेश मिळाला, की माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. किती क्रूर पद्धतीने संदेश देण्यात आला?

भाजप अध्यक्षांचे काँग्रेसवर आरोप -भाजप अध्यक्ष नड्डा म्हणाले, जम्मूमध्ये प्रवेश करत असताना डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अटक करण्यात आली होती आणि या घटनेमुळे देशभरात निदर्शनं झाली. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या अटकेनंतर 40 दिवसांनी सरकारी रुग्णालयात त्यांचे रहस्यमय परिस्थितीत निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र, तत्कालीन नेहरू सरकारने डोळेझाक केली. डॉ. मुखर्जी यांच्या आई योगमाया देवी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहून मुलाच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती.

जेपी नड्डा म्हणाले, श्यामा प्रसाद यांच्या आईने पंडित नेहरूंना पत्र लिहिले होते आणि मला खोटे युक्तिवाद ऐकण्याची इच्छा नाही. मला चौकशी हवी आहे आणि चौकशी झालीच पाहिजे, असे म्हटले  होते. परंतु, कॉंग्रेसच्या लोकांनी हे प्रकरण दाबले. नड्डा म्हणाले, की त्यांनी स्पष्ट शब्दात आरोपच केला होता, की जम्मू-काश्मीर सरकारने आमच्या मुलाची रहस्यमय पद्दतीने हत्या केली आहे आणि आपण त्यावर पांघरूण घालत आहात.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाdelhiदिल्ली