शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दलदल वाढली की कमळ चांगले खुलते- मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:41 IST

पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांचा घेतला समाचार; जनमताविरुद्ध न खेळण्याचा सल्ला

शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) : जेव्हा एखाद्या पक्षासोबत अन्य पक्ष येतात (दल के साथ ‘दल-दल’), तेव्हा अधिक ‘दलदली’मुळे कमळ चांगले खुलते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे विरोधकांचा समाचार घेतला.येथे ‘किसान रॅली’त बोलताना मोदी म्हणाले की, केंद्रात ऐतिहासिक जनादेश देऊन जनतेने जे सरकार स्थापन केले आहे, त्यावर विरोधी पक्षांचा विश्वास नाही. संसदेत आम्ही सातत्याने विचारत होतो की, अविश्वास प्रस्तावाचे कारण काय आहे? जेव्हा कारण सांगू शकले नाहीत, तेव्हा गळ्यात पडले. आम्ही त्यांना हेच सांगत होतो की, लोकशाहीत जनादेश सर्वात श्रेष्ठ आहे. जनतेच्या मनाविरुद्ध असा खेळ खेळणे योग्य नाही.विरोधी पक्षांना असे वाटत होते की, आपण मोदींना धडा शिकवायला हवा, त्यांना पदावरून दूर करायला हवे, पण देशातील सव्वाशे कोटी लोकांच्या ताकदीमुळे, त्यांच्या विश्वासामुळेच आपण पंतप्रधानपदी आहोत, हे विरोधक विसरून गेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेची ही ताकद आहे. साखर कारखान्यांना १ डिसेंबरपासून उसापासून केवळ साखरच नव्हे, इथेनॉल, रस आणि मोलॅसिसची निर्मिती करण्याची परवानगी देण्याचे आमच्या सरकारने ठरविले आहे, असेही मोदी यांनी सांगितले.ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. दलालांना दूर करून शेतकºयांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य किंमत दिली जात आहे. खरेदीत पारर्शकता आणली आहे. आज शेतकºयांच्या नावाने जे अश्रू ढाळत आहेत, त्यांनाही कधी काळी शेतकºयांसाठी काही करण्याची संधी होती, तेव्हा काहीच केले नाही, हे शेतकºयांना माहीत आहे. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पैसा योग्य ठिकाणीकाँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, पूर्वी काँग्रेसच्या एका पंतप्रधानांनी असे म्हटले होते की, दिल्लीहून एक रुपया निघतो तेव्हा गावात जाईपर्यंत १५ पैसे उरतात.तेव्हा पंचायतींपासून ते संसदेपर्यंत त्यांचीच सत्ता होती. मात्र, आम्ही यावर तोडगा काढला आणि आज ९० हजार कोटी रुपये योग्य व्यक्तीच्या खात्यात जात आहेत. पूर्वी ते दुसरीकडेच जात होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस