शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

दलदल वाढली की कमळ चांगले खुलते- मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:41 IST

पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांचा घेतला समाचार; जनमताविरुद्ध न खेळण्याचा सल्ला

शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) : जेव्हा एखाद्या पक्षासोबत अन्य पक्ष येतात (दल के साथ ‘दल-दल’), तेव्हा अधिक ‘दलदली’मुळे कमळ चांगले खुलते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे विरोधकांचा समाचार घेतला.येथे ‘किसान रॅली’त बोलताना मोदी म्हणाले की, केंद्रात ऐतिहासिक जनादेश देऊन जनतेने जे सरकार स्थापन केले आहे, त्यावर विरोधी पक्षांचा विश्वास नाही. संसदेत आम्ही सातत्याने विचारत होतो की, अविश्वास प्रस्तावाचे कारण काय आहे? जेव्हा कारण सांगू शकले नाहीत, तेव्हा गळ्यात पडले. आम्ही त्यांना हेच सांगत होतो की, लोकशाहीत जनादेश सर्वात श्रेष्ठ आहे. जनतेच्या मनाविरुद्ध असा खेळ खेळणे योग्य नाही.विरोधी पक्षांना असे वाटत होते की, आपण मोदींना धडा शिकवायला हवा, त्यांना पदावरून दूर करायला हवे, पण देशातील सव्वाशे कोटी लोकांच्या ताकदीमुळे, त्यांच्या विश्वासामुळेच आपण पंतप्रधानपदी आहोत, हे विरोधक विसरून गेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेची ही ताकद आहे. साखर कारखान्यांना १ डिसेंबरपासून उसापासून केवळ साखरच नव्हे, इथेनॉल, रस आणि मोलॅसिसची निर्मिती करण्याची परवानगी देण्याचे आमच्या सरकारने ठरविले आहे, असेही मोदी यांनी सांगितले.ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. दलालांना दूर करून शेतकºयांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य किंमत दिली जात आहे. खरेदीत पारर्शकता आणली आहे. आज शेतकºयांच्या नावाने जे अश्रू ढाळत आहेत, त्यांनाही कधी काळी शेतकºयांसाठी काही करण्याची संधी होती, तेव्हा काहीच केले नाही, हे शेतकºयांना माहीत आहे. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पैसा योग्य ठिकाणीकाँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, पूर्वी काँग्रेसच्या एका पंतप्रधानांनी असे म्हटले होते की, दिल्लीहून एक रुपया निघतो तेव्हा गावात जाईपर्यंत १५ पैसे उरतात.तेव्हा पंचायतींपासून ते संसदेपर्यंत त्यांचीच सत्ता होती. मात्र, आम्ही यावर तोडगा काढला आणि आज ९० हजार कोटी रुपये योग्य व्यक्तीच्या खात्यात जात आहेत. पूर्वी ते दुसरीकडेच जात होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस