शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

"श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा हा ढोंगीपणा...", स्वामी प्रसाद मौर्य यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 17:47 IST

Swami Prasad Maurya : स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा राम मंदिराबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील नेते स्वामी प्रसाद मौर्य हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टीतून बाहेर पडल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपला नवा पक्ष काढला आहे. देशाची राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये एका कार्यक्रमादरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

'राष्ट्रीय शोषित समाज पार्टी' असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पक्षाचे नाव दिले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा राम मंदिराबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच, भाजपावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा धर्माच्या नावावर धूळफेक करत आहे. भाजपा तुम्हाला महत्त्वाच्या मुद्द्यापासून फिरवत आहे, भाजपाला धर्म आणि राम मंदिराच्या नावाखाली मते मिळवायची आहेत. श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा हा ढोंगीपणा आणि फसवणूक आहे, असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले. 

भाजपा रामाच्या नावाखाली लूट करत आहे. जो सर्वांना जन्म देणारा आहे. त्यांची पंतप्रधान मोदी प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गेले. मग काय, राम निष्प्राण होते का? असा सवाल करत हे देवालाही फसवू शकतात. हा रामाचा हा अपमान आहे, असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले. याचबरोबर, संविधानाच्या व्यवस्थेत फेरफार केला जात असून, देशाचे संविधान धोक्यात आली आहे. कोणतीही जाहिरात न देता नोकऱ्या दिल्या जात आहेत. जनतेची फसवणूक केली जात आहे, असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी सांगितले. 

तरुण बेरोजगार होत आहेत. महागाईमुळे कंबरडे मोडत आहे, भाजपा सरकारने फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना शत्रूसारखी वागणूक दिली जात आहे. सरकारी संपत्ती उद्योगपतींना दिली आहे, असे सांगत कांशीराम यांना सम्राट अशोकाच्या स्वप्नांचा भारत घडवायचा होता, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कोणतीही जोखीम पत्करू, असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, दुप्पट लाभाचे आश्वासन देणारे सरकार आज एमएसपीच्या मागणीवरून लाठीचार्ज करत आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा