शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा हा ढोंगीपणा...", स्वामी प्रसाद मौर्य यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 17:47 IST

Swami Prasad Maurya : स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा राम मंदिराबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील नेते स्वामी प्रसाद मौर्य हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टीतून बाहेर पडल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपला नवा पक्ष काढला आहे. देशाची राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये एका कार्यक्रमादरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

'राष्ट्रीय शोषित समाज पार्टी' असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पक्षाचे नाव दिले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा राम मंदिराबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच, भाजपावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा धर्माच्या नावावर धूळफेक करत आहे. भाजपा तुम्हाला महत्त्वाच्या मुद्द्यापासून फिरवत आहे, भाजपाला धर्म आणि राम मंदिराच्या नावाखाली मते मिळवायची आहेत. श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा हा ढोंगीपणा आणि फसवणूक आहे, असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले. 

भाजपा रामाच्या नावाखाली लूट करत आहे. जो सर्वांना जन्म देणारा आहे. त्यांची पंतप्रधान मोदी प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गेले. मग काय, राम निष्प्राण होते का? असा सवाल करत हे देवालाही फसवू शकतात. हा रामाचा हा अपमान आहे, असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले. याचबरोबर, संविधानाच्या व्यवस्थेत फेरफार केला जात असून, देशाचे संविधान धोक्यात आली आहे. कोणतीही जाहिरात न देता नोकऱ्या दिल्या जात आहेत. जनतेची फसवणूक केली जात आहे, असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी सांगितले. 

तरुण बेरोजगार होत आहेत. महागाईमुळे कंबरडे मोडत आहे, भाजपा सरकारने फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना शत्रूसारखी वागणूक दिली जात आहे. सरकारी संपत्ती उद्योगपतींना दिली आहे, असे सांगत कांशीराम यांना सम्राट अशोकाच्या स्वप्नांचा भारत घडवायचा होता, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कोणतीही जोखीम पत्करू, असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, दुप्पट लाभाचे आश्वासन देणारे सरकार आज एमएसपीच्या मागणीवरून लाठीचार्ज करत आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा