शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Swami Prasad Maurya : 'लक्ष्मण कोणती लढाई लढण्यासाठी आला होता?' माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य पुन्हा बरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 14:27 IST

Swami Prasad Maurya : स्वामी प्रसाद मौर्य यांनी याआधीही रामचरितमानसवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Swami Prasad Maurya : रामचरितमानसच्या काही श्लोकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी भगवान श्री रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मणावर वादग्रस्त विधान केले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे नाव बदलून लक्ष्मणपूर करण्याच्या मागणीवर स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, 'लक्ष्मण कोणती लढाई लढण्यासाठी आला होता?'

माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य म्हणतात, 'लखनौ नाव खराब आहे का? भाजपवालेच म्हणतात की, हे लखनौ गंगा-जमुनी तहजीबचे केंद्र आहे. लखनौ आमच्या संस्कृतीचा वारसा आहे. लक्ष्मणाचा त्या आक्रमकांशी काय संबंध, तो कोणती लढाई लढायला आला होता? स्वातंत्र्य लढ्यात लक्ष्मण कुठेतरी दिसला होता का? भाजपचे मुंगेरीलालचे स्वप्न आहेत,' अशी टीका मौर्य यांनी केली.

मौर्य पुढे म्हणतात, 'तुम्हाला लखनौचे नाव बदलायचे असेल तर पासी समाजातील वीरांगना देवी या महिलेचे नाव का ठेवत नाही? लखन पासी हे लखनौचे राजे होते. मी रामचरितमानसच्या श्लोकांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. मोदींना मागणी करत मौर्य म्हणाले की, पंतप्रधानांनी रामचरितमानसमधील आक्षेपार्ह भाग काढून टाकावा, ज्यामध्ये महिला आणि शूद्रांचा अपमान करण्यात आला आहे. 

टॅग्स :ramayanरामायणSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा