शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

UP Election 2022: “PM मोदींच्या रॅलीला गर्दी जमा करणे एवढेच CM योगी आदित्यनाथांचे काम राहिलेय का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 09:37 IST

UP Election 2022: उत्तर प्रदेशमधील प्रशासकीय नेमणुकांबाबत योगी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची (UP Election 2022) धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. हळूहळू प्रचारसभांना वेग येत असून, सर्वपक्षीयांनी या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावल्याचे दिसत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे, हाच मुख्य अजेंडा या निवडणुकीसाठी विरोधकांचा असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे उत्तर प्रदेशमधील दौरे आणि प्रचारसभा वाढत चालल्या आहेत. यातच पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभांना गर्दी जमवणे एवढेच आता मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचे काम राहिले आहे का, अशी थेट विचारणा करण्यात आली आहे. 

भाजपचे माजी खासदार आणि माजी गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांनीच आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. स्वामी चिन्मयानंद तीनवेळा भाजपच्या तिकिटावर यापूर्वी निवडून आले आहेत. स्वामी चिन्मयानंद यांनी फेसबुक पोस्ट लिहिली असून, यामध्ये योगी आदित्यनाथ सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. स्वामी चिन्मयानंद यांचा मुख्य रोख हा प्रधान सचिवांच्या नेमणुकीवर आहे. तसेच चिन्मयानंद यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला.

मोदींच्या रॅलीला गर्दी जमवणे एवढेच योगींचे काम राहिलेय का?

स्वामी चिन्मयानंद यांनी निवृत्त होत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या सेवेचा विस्तार करत त्यांना प्रधान सचिव केल्याबाबत योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान मोदी आता केंद्राच्या विविध विभागांप्रमाणे उत्तर प्रदेश शासनही यांच्याच जीवावर चालवणार का, असा सवाल स्वामी चिन्मयानंद यांनी केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रशासकीय स्तरावर केलेले बदल आश्चर्यकारक आहेत. प्रधान सचिवपदी नेमणूक करण्यासाठी अनेक योग्य अधिकारी प्रशासनात आहेत. मात्र, निवृत्त होत असलेल्या अधिकाऱ्याचा सेवा विस्तार करून त्यांना प्रधान सचिव करणे कितपत योग्य आहे, अशी विचारणा चिन्मयानंद यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभा, रॅलींना गर्दी जमवणे एवढेच काम योगी आदित्यनाथ यांचे राहिले आहे का, असा रोखठोक सवालही त्यांनी यावेळी केला. 

आपल्या विधानाबाबत दिले स्पष्टीकरण

स्वामी चिन्मयानंद यांनी फेसबुक पोस्ट त्यांनीच लिहिल्याचे मान्य केले असून, निवृत्त अधिकाऱ्याला प्रधान सचिवपदी नेमणूक करण्याबाबत कोणताही आक्षेप नाही. या नेमणुकीला माझा विरोधही नाही. मी कोणत्याही व्यवस्थेचा विरोध केलेला नाही. मात्र, अन्य योग्य अधिकारी असतानाही निवृत्तीच्या केवळ दोन दिवस आधी सेवा विस्तार करून अशा प्रकारे नेमणुका होत असल्याबाबत मत मांडले आहे, असे स्पष्टीकरण स्वामी चिन्मयानंद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथprime ministerपंतप्रधानCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी