शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाच्या निर्णयामुळे हिंदू दहशतवाद थिअरी नष्ट झाली - स्वामी असीमानंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 12:07 IST

मला हिंदू दहशतवादाचे प्रतिक बनवलं गेले. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2010 रोजी हरिद्वार येथून अटक करण्यात आली आणि माझ्यावर समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाचा खोटा आरोप लावण्यात आला.

नवी दिल्ली - हिंदू दहशतवाद ही थिअरी समझोता एक्सप्रेस बॉम्बब्लास्ट प्रकरणातून निर्दोष सुटल्यामुळे नष्ट झाली असल्याची प्रतिक्रिया स्वामी असीमानंद यांनी दिली आहे. एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्वामी असीमानंद यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. मी मूळचा पश्चिम बंगालमधील आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केलं जात होतं अशा वातावरणात मी हिंदुत्त्वाबद्दल जागरुकता करण्याचं काम केलं. अनेक लोकांच्या धर्मपरिवर्तनाला विरोध केला त्यामुळे मला खोट्या प्रकरणात अडकवून तत्कालीन सरकारने फसविण्याचे काम केले असा आरोप असीमानंद यांनी केला आहे. 

समझोता एक्सप्रेस ब्लास्ट प्रकरणात पोलीस चौकशी करत असताना मी कुठेही फरार झालो नव्हतो. जर मला लपायचे होते तर मी मोबाईल सुरु का ठेवला असता? मी तेव्हा आश्रमात होतो. मला हिंदू दहशतवादाचे प्रतिक बनवलं गेले. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2010 रोजी हरिद्वार येथून अटक करण्यात आली आणि माझ्यावर समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाचा खोटा आरोप लावण्यात आल्याचं स्वामी असीमानंद यांनी सांगितले. 

या मुलाखतीत बोलताना स्वामी असीमानंद म्हणाले की, पोलिसांनी मी अटकेत असताना अनेक अत्याचार केले. मी गुन्हा कबूल करावा यासाठी माझा छळ करण्यात आला. या छळानंतरही मी हरलो नाही. मात्र त्यांनी माझ्या कुटुंबीयांना, आईला-भावाला आणून त्यांचाही छळ करण्याची धमकी दिली तेव्हा मी तुम्ही सांगाल तसे करायला तयार असल्याच सांगत गुन्हा कबूल केला. माझ्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठीच मी गुन्हा कबूल केला. मात्र कोर्टासमोर हे सिद्ध झालं की माझ्यावर जबरदस्ती करुन खोटा गुन्हा कबूल करुन घेतला आहे. त्यामुळे कोर्टाने मला निर्दोष सिद्ध केलं. 

साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना स्वामी असीमानंद यांनी ज्या पद्धतीने मागील सरकारने खोट्या आरोपाखाली आम्हाला फसवून आमच्यावर अत्याचार केले. पण कोर्टाने आम्हाला न्याय दिला. हे सगळे जनतेला माहीत आहे. हिंदू दहशतवाद ही थिअरी खोट्या आरोपाखाली पसरविण्यात आली. त्याचे उत्तर जनता देईल. मलादेखील निवडणूक लढवण्याची ऑफर दिली तर मी निवडणूक लढवेन हे स्वामी असीमानंद यांनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :Bombsस्फोटकेBlastस्फोटHinduहिंदूSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा