शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

कोर्टाच्या निर्णयामुळे हिंदू दहशतवाद थिअरी नष्ट झाली - स्वामी असीमानंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 12:07 IST

मला हिंदू दहशतवादाचे प्रतिक बनवलं गेले. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2010 रोजी हरिद्वार येथून अटक करण्यात आली आणि माझ्यावर समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाचा खोटा आरोप लावण्यात आला.

नवी दिल्ली - हिंदू दहशतवाद ही थिअरी समझोता एक्सप्रेस बॉम्बब्लास्ट प्रकरणातून निर्दोष सुटल्यामुळे नष्ट झाली असल्याची प्रतिक्रिया स्वामी असीमानंद यांनी दिली आहे. एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्वामी असीमानंद यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. मी मूळचा पश्चिम बंगालमधील आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केलं जात होतं अशा वातावरणात मी हिंदुत्त्वाबद्दल जागरुकता करण्याचं काम केलं. अनेक लोकांच्या धर्मपरिवर्तनाला विरोध केला त्यामुळे मला खोट्या प्रकरणात अडकवून तत्कालीन सरकारने फसविण्याचे काम केले असा आरोप असीमानंद यांनी केला आहे. 

समझोता एक्सप्रेस ब्लास्ट प्रकरणात पोलीस चौकशी करत असताना मी कुठेही फरार झालो नव्हतो. जर मला लपायचे होते तर मी मोबाईल सुरु का ठेवला असता? मी तेव्हा आश्रमात होतो. मला हिंदू दहशतवादाचे प्रतिक बनवलं गेले. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2010 रोजी हरिद्वार येथून अटक करण्यात आली आणि माझ्यावर समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाचा खोटा आरोप लावण्यात आल्याचं स्वामी असीमानंद यांनी सांगितले. 

या मुलाखतीत बोलताना स्वामी असीमानंद म्हणाले की, पोलिसांनी मी अटकेत असताना अनेक अत्याचार केले. मी गुन्हा कबूल करावा यासाठी माझा छळ करण्यात आला. या छळानंतरही मी हरलो नाही. मात्र त्यांनी माझ्या कुटुंबीयांना, आईला-भावाला आणून त्यांचाही छळ करण्याची धमकी दिली तेव्हा मी तुम्ही सांगाल तसे करायला तयार असल्याच सांगत गुन्हा कबूल केला. माझ्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठीच मी गुन्हा कबूल केला. मात्र कोर्टासमोर हे सिद्ध झालं की माझ्यावर जबरदस्ती करुन खोटा गुन्हा कबूल करुन घेतला आहे. त्यामुळे कोर्टाने मला निर्दोष सिद्ध केलं. 

साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना स्वामी असीमानंद यांनी ज्या पद्धतीने मागील सरकारने खोट्या आरोपाखाली आम्हाला फसवून आमच्यावर अत्याचार केले. पण कोर्टाने आम्हाला न्याय दिला. हे सगळे जनतेला माहीत आहे. हिंदू दहशतवाद ही थिअरी खोट्या आरोपाखाली पसरविण्यात आली. त्याचे उत्तर जनता देईल. मलादेखील निवडणूक लढवण्याची ऑफर दिली तर मी निवडणूक लढवेन हे स्वामी असीमानंद यांनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :Bombsस्फोटकेBlastस्फोटHinduहिंदूSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा