शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

दलवीर भंडारी यांच्या विजयामागे सुषमा स्वराजांची कूटनीती, लॉबिंगसाठी केले 60 फोन कॉल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 11:22 IST

भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदी निवड व्हावी यासाठी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज स्वत: सक्रिय होत्या. दलवीर भंडारींना पुर्ण समर्थन मिळावं यासाठी सुषमा स्वराजांनी परराष्ट्र मंत्र्यांना 60 हून जास्त फोन कॉल्स केले.

ठळक मुद्देदलवीर भंडारी यांची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या राजनैतिक मुत्सद्दीगिरीचा हा मोठा विजय मानला जात आहेषमा स्वराज यांच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून राबवण्यात आलेली आक्रमक कूटनीती यासाठी कारणीभूत ठरलीदलवीर भंडारींना पुर्ण समर्थन मिळावं यासाठी सुषमा स्वराजांनी परराष्ट्र मंत्र्यांना 60 हून जास्त फोन कॉल्स केले

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारताचे उमेदवार न्यायाधीश दलवीर भंडारी यांची आणखी नऊ वर्षांसाठी फेरनिवड झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या राजनैतिक मुत्सद्दीगिरीचा हा मोठा विजय मानला जात आहे. भारताचा हा विजय सहजासहजी झाला नसून केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून राबवण्यात आलेली आक्रमक कूटनीती यासाठी कारणीभूत ठरली. भारताला मोठ्या प्रमाणात मिळणार समर्थन मिळताना पाहून ब्रिटनचे उमेदवार न्यायाधीश ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने भारताला आपल्या विजयाची खात्री पटली.

भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदी निवड व्हावी यासाठी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज स्वत: सक्रिय होत्या. दलवीर भंडारींना पुर्ण समर्थन मिळावं यासाठी सुषमा स्वराजांनी परराष्ट्र मंत्र्यांना 60 हून जास्त फोन कॉल्स केले. परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनीदेखील सोमवारी होणा-या पुढील राऊंडच्या निमित्ताने देशभरातील नेत्यांशी चर्चा करत भारताची बाजू त्यांच्यासमोर मांडली. मंगळवारी दलवीर भंडारी यांची निवड झाल्यानंतर एस जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिन आणि वरिष्ठ नेत्यांना फोन करुन भारताच्या बाजूने मतदान करण्यासाठी इतर देशांना तयार केल्याबद्दल आभार मानले. परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांनीदेखील दलवीर भंडारी यांना समर्थन मिळावं यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. 

'भारताच्या इतिहासातील हा एक मोठा दिवस होता. जगाचा भारताबद्दलचा दृष्टीकोन बदलला आहे', अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली आहे. 

आंतरराष्ट्रीय न्यायालयातील १५पैकी ५ न्यायाधीशांची मुदत संपल्याने त्या जागांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा आणि सुरक्षा परिषदेत एकाच वेळी मतदान घेण्यात आले. ब्रिटनचे उमेदवार न्या. ख्रिस्तोफर ग्रीनवूड आणि न्या. भंडारी यांच्यात लढत अपेक्षित होती. परंतु भारताच्या मुत्सद्दीगिरीमुळे न्या. भंडारी यांचे पारडे जड असल्याचे जाणवताच ब्रिटनने न्या. ग्रीनवूड यांची उमेदवारी ऐनवेळी मागे घेतली. परिणामी, महासभेत १९३पैकी १८३ व सुरक्षा परिषदेत सर्व १५ मते मिळवून ७० वर्षांचे न्या. भंडारी सहज विजयी झाले. या निवडणुकीसाठी पडद्यामागून सूत्रे हलविणारे भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दिन यांनी न्या. भंडारी यांच्या विजयाबद्दल खास स्वागत समारंभ आयोजित करून आनंद साजरा केला.

- कसे असते हे न्यायालय?सदस्य देशांमधील वाद सोडविण्याचे संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्य न्यायिक अंग.सन १९४५मध्ये स्थापना.एकूण १५ न्यायाधीशांची आमसभा व सुरक्षा परिषदेकडून निवड.न्यायाधीशांची मुदत एका वेळी नऊ वर्षे. फेरनिवडीस पात्र.न्यायाधीशांमधून अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड.त्यांची मुदत प्रत्येकी तीन वर्षे

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजBJPभाजपा