शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत आत्महत्याप्रकरण बिहार निवडणुकीचा मुद्दा नाहीच, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 20:53 IST

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रभारी असलेल्या देवेंद फडणवीसांचा बिहार दौरा जोरात सुरू आहे. बिहारमधील माध्यमांसमोर ते पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडताना दिसून येतात

ठळक मुद्देत्य लपविण्याचा प्रयत्न झाल्यामुळे जनभावना तयार झाली. त्यानंतर, हा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही थांबणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून आक्रमक झालेल्या अभिनेत्री कंगना राणौतचे ठाकरे सरकारवरील हल्ले सुरूच आहेत. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते, तर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा व्यवस्थित झाला असता, असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. सध्या बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे बिहार दौऱ्यावर असून पत्रकारांनी सुशांतच्या मुद्द्यावरुन राजकारण होत असल्याचा प्रश्न विचारला असता, सुशांत हा बिहार निवडणुकीचा मुद्दा नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले. 

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रभारी असलेल्या देवेंद फडणवीसांचा बिहार दौरा जोरात सुरू आहे. बिहारमधील माध्यमांसमोर ते पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडताना दिसून येतात. बिहारमध्ये अॅन्टीइन्कबन्सी असल्याच्या प्रश्नावर बोलताना, कुठेही अॅन्टीइन्कम्बन्सी नसल्याचं ते म्हणाले. तसेच, बिहार विधानसभा निवडणुकीत सुशांत आत्महत्येप्रकरणाचं भाडवल केलं जात असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना, सुशांत हा राजकारणाचा मुद्दा नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आम्ही सुशांतसिंह राजपूतच्या नावाने मत मागत नसून तो राजकारणाचा मुद्दा नाहीच. मात्र, ज्याप्रकारे त्यांचा मृत्यू झाला, त्यावरुन सर्वांनाच वाटते की, सत्य बाहेर आले पाहिजे. त्यामुळे, सत्य लपविण्याचा प्रयत्न झाल्यामुळे जनभावना तयार झाली. त्यानंतर, हा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही थांबणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.   

कंगनाकडून फडणवीसांचे कौतुक

'माफियांचे लाड करणारी भ्रष्ट सोनिया सेना सत्तेत नसती, त्याजागी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते, तर मुंबई पोलिसांना त्यांचं काम योग्यपणे करता आलं असतं, असं मी ठामपणे म्हणू शकते. फडणवीस मुख्यमंत्री असते, तर माध्यमांना आणि जनतेला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला नसता,' अशा शब्दांत कंगनानं ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. तसेच, देवेंद्र फडणवीस यांचं पहिल्यांदाच जाहीरपणे कौतुकही केलंय.

नरेंद्र मोदीच स्टार प्रचारक

बिहार निवडणुकीत कंगना राणौत भाजपासाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणार अशी चर्चा सुरु आहे. यावर विरोधी पक्षनेते आणि बिहार भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एनडीएकडे सर्वात मोठे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे आम्हाला कोणत्या दुसऱ्या स्टार प्रचारकाची आवश्यकता नाही. कंगना राणौत वारंवार तिच्या राजकीय भूमिकेबद्दल सांगण्यास टाळत आलेली आहे. रविवारी कंगना मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटण्यासाठी राज्यपाल भवनात गेली. त्यानंतर ज्यावेळी ती बाहेर आली तेव्हा तिच्या हातात कमळाचं फूल होतं.

उत्तर प्रदेशमध्ये जय जिजाऊ जय शिवराय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालयाचे (Agra Mughal Museum) नाव बदलण्याची घोषणा केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असं ते म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास ट्विट केलं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय! म्हणत योगी सरकारच्या निर्णयाची स्तुती केली आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBiharबिहारvidhan sabhaविधानसभाSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतKangana Ranautकंगना राणौत