शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

Sushant Singh Rajput Case : "ती राजकारणाचा बळी ठरली, जास्त त्रास देऊ नका", काँग्रेस नेत्याने केली रियाच्या सुटकेची मागणी

By सायली शिर्के | Updated: October 5, 2020 09:10 IST

Rhea Chakraborty in Sushant Singh Rajput Case : काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी रिया चक्रवर्ती ही राजकारणाचा बळी ठरली असल्याचं म्हटलं आहे. तसेच तिला त्रास देऊ नका, तिची सुटका करा अशी मागणी केली आहे.

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी 14 जून रोजी आत्महत्या केली होती. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर दिल्लीच्या एम्समधील डॉक्टरांच्या एका पॅनेलने सीबीआयला सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नाही तर हे आत्महत्येचं प्रकरण असल्याची माहिती दिली आहे. यानंतर आता काँग्रेसच्या एका नेत्याने रिया चक्रवर्तीच्या सुटकेची मागणी केली आहे. 

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी रिया चक्रवर्ती ही राजकारणाचा बळी ठरली असल्याचं म्हटलं आहे. तसेच तिला त्रास देऊ नका, तिची सुटका करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. एम्सने सुशांतने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याचं म्हटल्यानंतर चौधरी यांनी रियाच्या सुटकेची मागणी केली आहे. "आता भाजपाची प्रचार यंत्रणा एम्सच्या फॉरेन्सिक टीमवर देखील आरोप करू शकते. सुशांतच्या मृत्यूमुळे सर्वच जण दु:खी आहेत. मी आधीच म्हटलं होतं रिया चक्रवर्ती निर्दोष आहे."

"जास्त त्रास न देता तिची सुटका केली पाहिजे"

"रिया राजकारणाचा बळी ठरली आहे. जास्त त्रास न देता तिची सुटका केली पाहिजे" असं अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे. चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट केलं आहे. काही दिवसांपूर्वी चौधरी यांनी रिया चक्रवर्ती ही बंगाली ब्राह्मण महिला असल्याचं सांगितलं. तसेच रियाचे वडील हे लष्करामधून निवृत्त झालेले अधिकारी असून, त्यांनी अनेक वर्षे देशाची सेवा केला. मात्र आज ते आपल्या दोन मुलांना न्याय मिळवून देऊ शकत नाही आहेत अशी खंत व्यक्त केली होती.

रियाने कुठलाही आर्थिक गुन्हा केला नसल्याचा केला होता दावा

रिया चक्रवर्तीला झालेली अटक ही भयावह घटना असल्याचंही ते म्हणाले होते. रियाने कोणालाही आत्महत्या किंवा हत्येसाठी भाग पाडले नसल्याचं, तसेच तिने कुठलाही आर्थिक गुन्हा केला नसल्याचा दावाही चौधरी यांनी केला होता. रियाला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. ही कारवाई केवळ आपल्या राजकीय नेतृत्वाला खूश करण्यासाठी करण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणांनी आपली भूमिका निभावून नेली आहे. मात्र या समुद्र मंथनातून त्यांनी अमृताऐवजी अंमली पदार्थांचा शोध लावला आहे, असा टोला अधीर रंजन चौधरी यांनी लगावला होता. 

"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता'

बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपयोग करून घ्यायची चलाख खेळी भाजपाने केल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर व मास्क भाजपाने तयार केले आहेत. यावरून काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला होता. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. "सुशांतसिंह राजपूत हा देशाचा अभिनेता होता. मात्र भाजपाने निवडणुकीत फायदा करून घेण्यासाठी त्याला बिहारी अभिनेता करून टाकलं" असं म्हटलं आहे. तसेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडीलही आपल्या मुलांसाठी न्याय मागण्यास पात्र आहेत, सर्वांसाठी न्याय हे आपल्या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे" असं म्हटलं होतं.  

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीcongressकाँग्रेसSushant Singhसुशांत सिंगBJPभाजपा