शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Survey : चार सदस्य असलेल्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती असायला हवे? लोकांनी दिली अशी उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 20:22 IST

सी व्होटरच्या माध्यमाने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार, लोकांना प्रश्न करण्यात आला की, जर चार सदस्यांचे कुटुंब असेल, तर त्याचे मासिक उत्पन्न किती असायला हवे? या प्रश्नासाठी अनेक पर्याय देण्यात आले होते.

पाच राज्यांत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीशी झुंज देत असलेल्या देशाला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. या काळात मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आणि निम्न स्तरांतील लोकांना गंभीर आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. मात्र, हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजने सी व्होटरच्या माध्यमाने बजेटशी संबंधित एक विशेष सर्वेक्षण केले आहे.

सी व्होटरच्या माध्यमाने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार, लोकांना प्रश्न करण्यात आला की, जर चार सदस्यांचे कुटुंब असेल, तर त्याचे मासिक उत्पन्न किती असायला हवे? या प्रश्नासाठी अनेक पर्याय देण्यात आले होते. यावर, 29 टक्के लोकांनी सांगितले की, चार लोकांच्या कुटुंबासाठी दरमहा 20 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असायला हवे. 15 टक्के लोकांनी सांगितले, की 20 ते 30 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असायला हवे. तसेच 30-40 हजारपर्यंत उत्पन्न असावे, असे 17 टक्के लोकांनी म्हटले आहे.

याशिवाय, 7 टक्के लोक असेही आढळून आले की, एवढ्या मोठ्या कुटुंबासाठी 40-50 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असावे, तर 21 टक्के लोकांनी 50 हजार ते 1 लाख रुपये उत्पन्न असावे, असे सांगितले. याशिवाय एवढ्या मोठ्या कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असावे, असे मानणारेही 11 टक्के लोक समोर आले आहेत.

4 सदस्यांच्या कुटुंबासाठी मासिक उत्पन्न किती असायला हवे?Cvoter सर्व्हे -20 हजार पर्यंत - 29%20-30 हजार पर्यंत - 15%30-40 हजार पर्यंत - 17 %40-50 हजार पर्यंत - 7%50 हजार ते 1 लाख पर्यंत - 21%1 लाखपेक्षा अधिक - 11%

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022FamilyपरिवारMONEYपैसा