शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

आश्चर्य! मृत्यूनंतर 'तो' चक्क तिरडीवरुन आला अन् केक कापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 15:40 IST

सरकारी लाल फितीत सापडलेल्या लाल बिहारी यांनी उत्तर प्रदेश सरकारने आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल 20 कोटी रुपये भरपाई देण्यासाठी कोर्टात केसही टाकली होती.

लखनऊ - तिरडीवरुन शरीर आलं अन् त्यावरुन उठून मृत झालेल्या माणसाने केक कापला हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. यूपीतील आजमगडमधील रहिवाशी लाल बिहारी आपला 25 वा पुर्नजन्म दिवस सोहळा साजरा करतात. 25 वर्षापूर्वी सरकारी कागदपत्रात त्यांना मृत घोषित केले होतं मात्र लाल बिहारी आजतागायत जिवंत आहेत आणि दरवर्षी अशाच रितीने पुर्नजन्म सोहळा साजरा करतात. सरकारी लालफितीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी ते अनोखं आंदोलन करतात. 

यंदा लाल बिहारी यांच्यासोबत हा पुर्नजन्म सोहळा साजरा करण्यासाठी चित्रपट निर्माते सतीश कौशिकदेखील उपस्थित होते. सतीश कौशिक लाल बिहारी यांच्या जीवनावर चित्रपट आणत आहे. 64 वर्षीय लाल बिहारी यांनी सांगितले की, सरकारी अधिकाऱ्यांनी 1976 मध्ये कागदपत्रात त्यांना मृत घोषित केलं होतं. जमिनीच्या वादात आजमगडच्या सरकारी पुराव्यामध्ये त्यांना मृत घोषित केल्याने त्यांनाही धक्का बसला. याविरोधात अनेक वर्ष कायदेशीर लढाई लढल्यानंतर 30 जून 1994 रोजी लाल बिहारी स्वत:ला जिवंत असल्याचं सिद्ध करण्यात यशस्वी झाले. त्याच दिवसाला ते पुर्नजन्म म्हणून साजरा करतात. 

सरकारी लाल फितीत सापडलेल्या लाल बिहारी यांनी उत्तर प्रदेश सरकारविरोधात आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल 20 कोटी रुपये भरपाई देण्यासाठी कोर्टात केसही टाकली होती. त्यांचे वकील कृष्णा कन्हैया यांनी सांगितले की, हायकोर्टाने सरकारला या प्रकरणात भरपाईसाठी विचारणा केली मात्र या प्रकरणातील कागदपत्रे गहाळ झाली त्याची चौकशी सध्या सुरु आहे. 

लाल बिहारी यांनी देशातील 20 हजार जणांना जिवंत असून मृत घोषित केल्याचं सांगितले. अशा प्रकरणात कोर्टात तसेच सरकारी कार्यालयात अनेक जण आवाज उठवित आहेत. काही दिवसांपूर्वीच मानवाधिकार आयोगाने 1500 लोकांना पुन्हा कागदोपत्री जिवंत घोषित करण्याचे आदेश दिले होते. लाल बिहारी यांनी त्यांच्या नावासमोर मृतक शब्द लिहिण्यास सुरुवात केली त्याचसोबत मृतक संघ बनवून अशारितीने सरकारी कारभाराचा ज्यांना फटका बसला त्यांची मदत करण्यास सुरुवात केली.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश