शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आश्चर्य! मृत्यूनंतर 'तो' चक्क तिरडीवरुन आला अन् केक कापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 15:40 IST

सरकारी लाल फितीत सापडलेल्या लाल बिहारी यांनी उत्तर प्रदेश सरकारने आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल 20 कोटी रुपये भरपाई देण्यासाठी कोर्टात केसही टाकली होती.

लखनऊ - तिरडीवरुन शरीर आलं अन् त्यावरुन उठून मृत झालेल्या माणसाने केक कापला हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. यूपीतील आजमगडमधील रहिवाशी लाल बिहारी आपला 25 वा पुर्नजन्म दिवस सोहळा साजरा करतात. 25 वर्षापूर्वी सरकारी कागदपत्रात त्यांना मृत घोषित केले होतं मात्र लाल बिहारी आजतागायत जिवंत आहेत आणि दरवर्षी अशाच रितीने पुर्नजन्म सोहळा साजरा करतात. सरकारी लालफितीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी ते अनोखं आंदोलन करतात. 

यंदा लाल बिहारी यांच्यासोबत हा पुर्नजन्म सोहळा साजरा करण्यासाठी चित्रपट निर्माते सतीश कौशिकदेखील उपस्थित होते. सतीश कौशिक लाल बिहारी यांच्या जीवनावर चित्रपट आणत आहे. 64 वर्षीय लाल बिहारी यांनी सांगितले की, सरकारी अधिकाऱ्यांनी 1976 मध्ये कागदपत्रात त्यांना मृत घोषित केलं होतं. जमिनीच्या वादात आजमगडच्या सरकारी पुराव्यामध्ये त्यांना मृत घोषित केल्याने त्यांनाही धक्का बसला. याविरोधात अनेक वर्ष कायदेशीर लढाई लढल्यानंतर 30 जून 1994 रोजी लाल बिहारी स्वत:ला जिवंत असल्याचं सिद्ध करण्यात यशस्वी झाले. त्याच दिवसाला ते पुर्नजन्म म्हणून साजरा करतात. 

सरकारी लाल फितीत सापडलेल्या लाल बिहारी यांनी उत्तर प्रदेश सरकारविरोधात आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल 20 कोटी रुपये भरपाई देण्यासाठी कोर्टात केसही टाकली होती. त्यांचे वकील कृष्णा कन्हैया यांनी सांगितले की, हायकोर्टाने सरकारला या प्रकरणात भरपाईसाठी विचारणा केली मात्र या प्रकरणातील कागदपत्रे गहाळ झाली त्याची चौकशी सध्या सुरु आहे. 

लाल बिहारी यांनी देशातील 20 हजार जणांना जिवंत असून मृत घोषित केल्याचं सांगितले. अशा प्रकरणात कोर्टात तसेच सरकारी कार्यालयात अनेक जण आवाज उठवित आहेत. काही दिवसांपूर्वीच मानवाधिकार आयोगाने 1500 लोकांना पुन्हा कागदोपत्री जिवंत घोषित करण्याचे आदेश दिले होते. लाल बिहारी यांनी त्यांच्या नावासमोर मृतक शब्द लिहिण्यास सुरुवात केली त्याचसोबत मृतक संघ बनवून अशारितीने सरकारी कारभाराचा ज्यांना फटका बसला त्यांची मदत करण्यास सुरुवात केली.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश