शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

"अकाऊंटवर बंदी घालून काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक"; जयराम रमेश यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 14:52 IST

Congress Jairam Ramesh : काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या देशाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून 543 जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून या काळात सात टप्प्यांमध्ये मतदानाचा महामहोत्सव पार पडणार आहे. 97 कोटी मतदार देशात सत्तेत कोण असेल, याचा फैसला घेईल आणि त्याचा निकाल लागेल तो 4 जून रोजी. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपचे इलेक्शन मॅनेजमेंट, लोकप्रियता अन् दुसरीकडे राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या इंडिया आघाडीची एकमूठ यांची आजपासून 83 दिवस सत्वपरीक्षा होणार आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जयराम रमेश म्हणाले की, "निवडणूक आयोगाने काल दिलेले भाषण म्हणजे निवडणूक आयोग निःपक्षपाती नाही, त्यांनी गेल्या 10 महिन्यांपासून वेळ दिलेला नाही, आम्ही वेळ मागितला पण त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही, त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. आम्ही कागदपत्रे देतो, निवडणूक आयोग सुनावणी घेत नाही, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांविरोधात तक्रार आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे, केवळ विरोधकांवर कारवाई करू नये."

"इलेक्टोरल बाँड्सचे सर्व पैसे भाजपाकडे गेले आहेत आणि मोदी, अमित शाह यांना याचं उत्तर द्यावे लागेल. 20 कोटी रुपयांचा नफा असलेली आणि 200 कोटी रुपयांची देणगी देणारी कंपनी इलेक्टोरल बाँड मनी लाँड्रिंगचच रुप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या काँग्रेसचं अकाऊंट बंद केलं आहे. आम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अकाऊंटवर बंदी घालून मोदी सरकार काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करत आहे" असंही जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण