शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

"अकाऊंटवर बंदी घालून काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक"; जयराम रमेश यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 14:52 IST

Congress Jairam Ramesh : काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या देशाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून 543 जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून या काळात सात टप्प्यांमध्ये मतदानाचा महामहोत्सव पार पडणार आहे. 97 कोटी मतदार देशात सत्तेत कोण असेल, याचा फैसला घेईल आणि त्याचा निकाल लागेल तो 4 जून रोजी. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपचे इलेक्शन मॅनेजमेंट, लोकप्रियता अन् दुसरीकडे राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या इंडिया आघाडीची एकमूठ यांची आजपासून 83 दिवस सत्वपरीक्षा होणार आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जयराम रमेश म्हणाले की, "निवडणूक आयोगाने काल दिलेले भाषण म्हणजे निवडणूक आयोग निःपक्षपाती नाही, त्यांनी गेल्या 10 महिन्यांपासून वेळ दिलेला नाही, आम्ही वेळ मागितला पण त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही, त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. आम्ही कागदपत्रे देतो, निवडणूक आयोग सुनावणी घेत नाही, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांविरोधात तक्रार आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे, केवळ विरोधकांवर कारवाई करू नये."

"इलेक्टोरल बाँड्सचे सर्व पैसे भाजपाकडे गेले आहेत आणि मोदी, अमित शाह यांना याचं उत्तर द्यावे लागेल. 20 कोटी रुपयांचा नफा असलेली आणि 200 कोटी रुपयांची देणगी देणारी कंपनी इलेक्टोरल बाँड मनी लाँड्रिंगचच रुप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या काँग्रेसचं अकाऊंट बंद केलं आहे. आम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अकाऊंटवर बंदी घालून मोदी सरकार काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करत आहे" असंही जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण