शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

सनईचा सुरेल उस्ताद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 3:37 AM

भारतरत्न शहनाईनवाझ उस्ताद बिस्मिल्लाह खाँसाहेब हे नाव जरी ऐकले, तरीही सनईची मंगलधून आपोआप कानांत ऐकू येते

- शैलेश भागवत

भारतरत्न शहनाईनवाझ उस्ताद बिस्मिल्लाह खाँसाहेब हे नाव जरी ऐकले, तरीही सनईची मंगलधून आपोआप कानांत ऐकू येते. या महान कलाकाराचे कार्य पाहता शब्दही थिटे पडतात. शास्त्रीय संगीत सनईसारख्या वाद्यातून ऐकू येणं, हे केवळ शक्य झाले ते खाँसाहेबांमुळे. त्यांची तालीम उस्ताद अली बक्ष या त्यांच्या मामाने करवून घेतली. वाराणसीच्या बालाजी मंदिरात नित्याने १८ तास रोजची तालीम ठरलेली असायची. खाँसाहेब आपल्या साधनेने या वाद्यातून अशी सुरावट घडवू लागले की, पुढे १९४७ साली त्यांच्याच मंगल सनईवादनाने भारताच्या स्वातंत्र्याचादेखील जन्म लाल किल्ल्यावर झाला.सनई हा गिरा हुआ साज होता. म्हणूनच, रस्त्यावर वरातीत वाजणारी सनई जेव्हा खाँसाहेबांनी स्वप्राणाने सुरांनी वाजवली, तेव्हा त्या सनईला एक राजेशाही अस्तित्व निर्माण झाले. सनईला मानाचे स्थान मिळवून देण्यात एकमेव खाँसाहेबांनी आपली हयात खर्च केली. सनईचा सन्मान तर वाढलाच, पण बिस्मिल्लांची सनई संपूर्ण हिंदुस्थानच्या प्रत्येक मंगलकार्याचा एक अविभाज्य घटक बनली. एक तरु ण युवक पुढे सनईचा जनक झाला. सनई म्हणजे फक्त आणि फक्त उस्ताद बिस्मिल्लाह खाँ हे समीकरणच बनून गेले.२१ आॅगस्ट हा खाँसाहेबांचा स्मृती दिन. यंदा त्यांचा बारावा स्मृती दिन आहे. एक तप पूर्ण झाले. मात्र, त्यांच्या महत्तम कार्याचा महिमा, त्यांच्या जादुई सुरांची प्रतिभा आणि त्यांच्या विलक्षण कर्तृत्वाचा पगडा आजदेखील तसाच आहे. शरीराने आज बिस्मिल्लाह खाँसाहेब आपल्यात नसले, तरी आजदेखील सनईच्या सुरावटींच्या माध्यमातून ते आपल्या जीवनाचा एक भाग बनून सदैव सोबत आहेत, हे कायमच सिद्ध होते. मी त्यांना बाबाजान म्हणत असे. त्यांचा सर्वात लाडका शिष्य आणि एकमेव मानसपुत्र म्हणून त्यांनी माझा स्वीकार केला, हा आयुष्यात मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे, असे मी मानतो.सन २००३ मध्ये मुंबईत रंगशारदामध्ये झालेल्या कार्यक्र मात ते उपस्थित होते. शैलेश सनईवादन करणार आहे, हे समजताच आजारी असूनही ते खास विमानाने मुंबईत पोहोचले. माझे गुरू साक्षात माझ्यासमोर बसून माझी सनई ऐकत आहेत, या कल्पनेने मला भरून आले होते. कारण, माझ्या आणि त्यांच्या ४० वर्षांच्या प्रवासात माझे बाबाजान असे कधी कोणत्याच कार्यक्रमाला क्वचितच गेले असतील. भीतीने शहारे येत होते. ३९ वर्षे मी त्यांच्याकडे सनई शिकलो. जरासुद्धा चूक झाली, तरी मला जे हातात येईल, ते घेऊन ते मार देत. इथे तर कार्यक्रमात चूक झाली, तर काय होईल, या भीतीने मी निम्मा झालो होतो. मात्र, जिथे गुरू तिथे शिष्यास मरण ते काय? खाँसाहेबांनी माझी सनई ऐकली. माझं वादन पूर्ण होताच, ते पहिल्या रांगेतून ओरडले... हटो मत... जिस जगह पे बैठे हो, लग जाओ उसमे आगे... और दो साल तगडा जाओ यार, तो तू बिस्मिल्लाह खाँ दुसरा बन जायेगा... त्यांचे हे शब्द म्हणजे माझ्या बाबाजान यांनी मला आयुष्यातला दिलेला सर्वात मोठा पुरस्कार होय.माझ्या डोळ्यांतल्या पाण्यात त्यांची ती समाधानी हास्यमुद्रा असणारी प्रतिमा भरून राहिली होती. या घटनेचे स्मरण होताना ४० वर्षांच्या गुरूशिष्य परंपरेचे आणि पितापुत्र नात्याचे मला मोठे समाधान वाटते.मी स्वत:ला मोठा कलाकार मानत नाही. मात्र आज लोक मला बिस्मिल्लाह खाँ साहेबांचा शिष्य आणि मोठा सनईवादक म्हणूनच ओळखतात. खाँ साहेब आणि रसिकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि आयुष्यभर पुरेल इतके प्रेम दिले. खाँसाहेबांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने असंख्य आठवणी डोळ्यासमोर तरळतात. प्रत्येकाला हे शरीर कधीना कधी सोडून जावे लागते. मात्र, भविष्याची गरज ओळखून माझ्या गुरूंनी दुसऱ्या बिस्मिल्लाहला जन्म दिला होता. माझ्यावर नवी जबाबदारी येऊन पडली आणि ती मी आजदेखील निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करतो आहे.खाँसाहेब मुळातच कडक शिस्तीचे होते. वेळ ते अतिशय काटेकोरपणे पाळत असत. ते अतिशय व्यासंगी कलाकार होते. त्यांना त्यांचा हिंदुस्थान देश, त्यांच्या लाडक्या गंगेच्या तीरावर वसलेले बनारस आणि त्यांची सोबतीण सनई या तीन गोष्टी अतिशय आवडत असत.त्यांना लहर आली की, ते कुठेही, अगदी कुठेही मला बंदिश शिकवत. रागाच्या तपशिलासह त्याची मांडणी किंवा सादरीकरणाच्या पद्धती सांगत असत आणि मला लक्षपूर्वकच ऐकावे लागे. कारण, एकदोन वेळा सांगितलेली गोष्ट पुन्हा विचारण्याची माझ्यात हिम्मत नव्हती. तसे काही झाले, तर गुरूच्या शिक्षेचा धनी व्हावे लागे. मध्येच ते सनई काढून जे शिकवलेले असे ते वाजवून दाखव, असे सांगत. त्यांना वाजवून दाखवल्यावर त्यांची प्रतिक्रि या मला महत्त्वाची असे. कारण, चुकले तर मार आणि प्रसंगी कडवट शब्द, पण जर उत्तम वाजवले तर मात्र ते सर्वांना सांगत राहायचे आणि खूप खाऊपिऊ घालायचे. एका बंद खोलीत ते मला सलग सातआठ तास शिकवायचे. मला कंटाळा आला असे वाटले, तर फिरवून आणायचे. माझ्याकडे पैसे नाहीत असे वाटले, तर मला येण्याजाण्यासाठी, घरखर्चासाठी किंवा खाण्यापिण्यासाठी पैसे द्यायचे. माझ्या बाबाजानने त्यांच्या मुलापेक्षा माझे अधिक लाड केले, असे मी म्हटले तरी चूक ठरणार नाही. त्यांचे नमाजपठण झाले की, ते माझी दृष्ट काढत असत. शिक्षणाचा एक टप्पा पूर्ण झाला की, ते गठबंधन करताना एक गाठ अधिक मारत आणि आनंदाने भरवत. त्यांना मला भरवताना काय आनंद वाटायचा, हे त्यांनाच ठाऊक. परंतु त्यांनी माझ्या मुलीचे (शिरीनचे) देखील अपार लाड केले. ते माझ्या घरी आले, तेव्हा जणू देवाचे पाय घराला लागावे, असे ते क्षण होते. खास बनारसहून ठाण्याला त्यांनी माझ्या घरी यावं, यासारखे भाग्य ते काय असणार?ते गेल्यानंतर १२ वर्षे उलटली, मात्र त्यांच्या अस्तित्वाचा असणारा विलक्षण प्रभाव पाहिला की, ते नाहीत, हे मन मानत नाही. त्यांनी गुरू म्हणून किंवा एक मानसपिता म्हणून जेजे केले, ते ते मोजणे मला शक्य नाही. मात्र, त्यांचे सनईच्याबाबतीले शिक्षण, संस्कार मी कधीही मातीमोल होऊ देणार नाही आणि त्यांच्या आदर्शांचे अवमूल्यन होऊ देणार नाही.शब्दांकन - शुभंकर करंडे