शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Hathras Stampede : १२१ भाविकांच्या मृत्यूवर पहिल्यांदा बोलले भोले बाबा; म्हणाले, "त्या घटनेनंतर मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 08:55 IST

Bhole Baba : हाथरस दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना भोले बाबा यांनी आपण या घटनेने व्यथित झाल्याचे म्हटलं आहे.

Hathras Stampede :उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत १२० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर उत्तर प्रदेशपोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. त्यानंतर आता पाच दिवसांनी 'भोले बाबा' म्हणजेच सूरजपाल पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले आहेत. भोले बाबांनी हाथरस चेंगराचेंगरीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. या घटनेबाबत भोले बाबा म्हणाले की, २ जुलै रोजी घडलेल्या घटनेने मी दु:खी आणि व्यथित आहे.

२ जुलै रोजी हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगनंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२३ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले. राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला. त्याचवेळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या अपघातावर शोक व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. याप्रकरणात आतापर्यंत बाबांच्या सेवेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे आता भोले बाबा यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडले आहे.

हाथरस चेंगराचेंगरीच्या घटनेवर सूरजपाल उर्फ ​​भोले बाबा यांनी एका व्हिडिओ निवेदनातून आपलं म्हणणं मांडले आहे. “२ जुलैच्या घटनेनंतर मी खूप दुःखी आहे. प्रभुने आम्हाला या दु:खावर मात करण्यासाठी शक्ती देईल यावर सर्वांचा विश्वास आहे. सर्वांनी सरकार आणि प्रशासनावर विश्वास ठेवा. गैरप्रकार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे. मी माझे वकील ए.पी. सिंग यांच्यामार्फत समिती सदस्यांना विनंती केली आहे की, त्यांनी शोकग्रस्त कुटुंबियांच्या आणि जखमींच्या पाठीशी उभे राहून त्यांना आयुष्यभर साथ द्यावी,” असे भोले बाबा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी सूरजपाल सिंग उर्फ ​​भोले बाबा आणि या प्रकरणातील सर्व आरोपींच्या कॉल रेकॉर्ड तपशीलांवर हाथरस चेंगराचेंगरीनंतर घडलेल्या घटनांचा क्रम पुन्हा तयार केला. चेंगराचेंगरी झाल्यामुळे सत्संग स्थळ सोडल्यानंतर  ​​भोले बाबा यांनी काय केले याबद्दल पोलिसांनी अनेक महत्त्वाचे तपशील उघड केले. चेंगराचेंगरी झाली जेव्हा अनेक लोक त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावत आले होते. चेंगराचेंगरीनंतर बाबा दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताफ्यातून निघून गेले. त्यानंतर भोले बाबा यांना त्यांचे मुख्य संयोजक देव प्रकाश मधुकर यांचा दुपारी २.४८ वाजता फोन आला आणि त्यांनी त्यांना चेंगराचेंगरीची माहिती दिली.  दुपारी ३ ते ४.३५ दरम्यान बाबांचे फोन लोकेशन त्यांच्या मैनपुरी आश्रमात सापडले. या प्रकारानंतर बाबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक फोन केले. त्यानंतर बाबांचा मोबाईल फोन ४,३५ नंतर बंद झाला आणि तेव्हापासून त्याचे लोकेशन सापडले नाही.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिस