शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना सुप्रीम कोर्टाचा झटका, हायकोर्टाचा निर्णय बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 13:47 IST

सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी 3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना जोरदार धक्का दिला आहे.

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी 3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना जोरदार धक्का दिला आहे. बिहारमध्ये जवळपास 3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना इतर शिक्षकांप्रमाणे समान वेतन मिळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं बिहार सरकारचं अपील मंजूर करत पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आहे. पाटणा उच्च न्यायालयानं समान कामासाठी समान वेतन देण्याचं आंदोलक शिक्षकांच्या बाजूनं निर्णय दिला होता. त्यानंतर बिहार सरकारनं सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात अपील केलं होतं. त्यात सर्वोच्च न्यायालयानं बिहार सरकारच्या बाजूनं निर्णय दिला आहे.बिहारमधल्या कंत्राटी शिक्षकांचे अनेक नेते दिल्लीत आहेत. शिक्षकांच्या या मुद्द्यावर न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे आणि न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या पीठानं शेवटची सुनावणी गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला केली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. सात महिन्यांनंतर आलेल्या या निर्णयाचा प्रभाव सरळ सरळ बिहारमधल्या पावणे चार लाख शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबावर होणार आहे. बिहारमध्ये कंत्राटी शिक्षकांचं वेतन सध्या 22 ते 25 हजारांच्या दरम्यान आहे. जर न्यायालयाचा निर्णय शिक्षकांच्या बाजूनं लागला असता तर शिक्षकांना 35-40 हजार रुपये पगार मिळाला असता. शिक्षकांच्या बाजूनं देशातील दिग्गज वकिलांनी लढाई लढली होती.

ही लढाई 10 वर्षं जुनी आहे. 2009मध्ये बिहार माध्यमिक शिक्षक संघानं बिहारमधल्या कंत्राटी शिक्षकांना समान काम समान वेतन देण्याच्या मागणीसाठी पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आठ वर्षं चाललेल्या लढाईत बिहारमधल्या पाटणा उच्च न्यायालयानं 2017मध्ये कंत्राटी शिक्षकांच्या बाजूनं निर्णय दिला होता. पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बिहार सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिक्षकांकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवीसारख्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला होता. त्यानंतर शेवटची सुनावणी 2018मध्ये तीन ऑक्टोबरला झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक शिक्षक प्रभावित होणार आहेत.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयTeacherशिक्षक