शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 15:19 IST

मोबाईल क्रमांक आणि बँक खाते आधार कार्डाशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

ठळक मुद्देतुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डाशी जोडला नाही तर, तुमच्या सेवा खंडीत होऊ शकतात असा मेसेज बँका आणि मोबाईल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना पाठवले.

नवी दिल्ली - मोबाइल क्रमांक आणि बँक खाते आधार कार्डशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. घटनपीठ यासंबंधी अंतिम निर्णय घेईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ग्राहकांना मेसेज पाठवून गोंधळ निर्माण केल्याबद्दल बँका आणि मोबाइल कंपन्यांनाही फटकारले. 

तुम्ही तुमचा मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडला नाही तर, तुमच्या सेवा खंडीत होऊ शकतात असा मेसेज बँका आणि मोबाइल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना पाठवले. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. असा कुठलाही संदेश आपण दिलेला नाही असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. लोकांना अशा प्रकारे घाबरवणे बंद करा असे सर्वोच्च न्यायालयाने बँका आणि मोबाइल कंपन्यांना सांगितले. 

घटनापीठ निर्णय देत नाही तोपर्यंत मोबाइल क्रमांक आणि बँक खाते आधार कार्डशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केली होती. आधार कार्डच्या सक्तीमुळे नागरिकांच्या राईट टू प्रायव्हसीचे उल्लंघन होते. त्यामुळे या निर्णयाला आव्हान देणा-या अऩेक याचिका दाखल झाल्या आहेत. घटनापीठ यावर निर्णय देईल. 

मोबाईल क्रमांक आणि बँक खाते कधीपर्यंत आधार कार्डाशी जोडायचे त्याची माहिती मेसेजमधून देण्याचे निर्देश कंपन्यांना द्या असे सर्वोच्य न्यायालयाने केंद्राला सांगितले. केंद्र सरकारनं कोर्टात सांगितले की, सर्व मोबाइल क्रमांकांना ई-केव्हाईसी व्हेरिफिकेशन अंतर्गत आधार कार्डसोबत जोडणं आवश्यक आहे. शिवाय, नवीन बँक खाते सुरू करण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक आहे. 

मोबाइल क्रमांक आधार कार्डला जोडण्याची सक्ती सरकारकडून केली जात असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी जनहित याचिकादेखील दाखल करण्यात आल्या होत्या. आधार कार्ड लिंक करणे म्हणजे खासगीपणाच्या हक्काचा (राइट टू प्रायव्हसी) भंग असल्याचा आक्षेप घेण्यात आलेल्या याचिकांवर घटनापीठाकडून सुनावणी घेण्यात येणार आहे. 

विशेष म्हणजे यावेळी सरकारनं असेही म्हटले आहे की, आधार कार्डची जोडणी न झाल्यानं देशात कुणाचाही भूकबळी गेलेला नाही. रेशन कार्ड आधार कार्डला न जोडल्याने धान्य नाकारण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये घडली होती. यामुळे 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालय