शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 15:19 IST

मोबाईल क्रमांक आणि बँक खाते आधार कार्डाशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

ठळक मुद्देतुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डाशी जोडला नाही तर, तुमच्या सेवा खंडीत होऊ शकतात असा मेसेज बँका आणि मोबाईल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना पाठवले.

नवी दिल्ली - मोबाइल क्रमांक आणि बँक खाते आधार कार्डशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. घटनपीठ यासंबंधी अंतिम निर्णय घेईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ग्राहकांना मेसेज पाठवून गोंधळ निर्माण केल्याबद्दल बँका आणि मोबाइल कंपन्यांनाही फटकारले. 

तुम्ही तुमचा मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडला नाही तर, तुमच्या सेवा खंडीत होऊ शकतात असा मेसेज बँका आणि मोबाइल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना पाठवले. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. असा कुठलाही संदेश आपण दिलेला नाही असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. लोकांना अशा प्रकारे घाबरवणे बंद करा असे सर्वोच्च न्यायालयाने बँका आणि मोबाइल कंपन्यांना सांगितले. 

घटनापीठ निर्णय देत नाही तोपर्यंत मोबाइल क्रमांक आणि बँक खाते आधार कार्डशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केली होती. आधार कार्डच्या सक्तीमुळे नागरिकांच्या राईट टू प्रायव्हसीचे उल्लंघन होते. त्यामुळे या निर्णयाला आव्हान देणा-या अऩेक याचिका दाखल झाल्या आहेत. घटनापीठ यावर निर्णय देईल. 

मोबाईल क्रमांक आणि बँक खाते कधीपर्यंत आधार कार्डाशी जोडायचे त्याची माहिती मेसेजमधून देण्याचे निर्देश कंपन्यांना द्या असे सर्वोच्य न्यायालयाने केंद्राला सांगितले. केंद्र सरकारनं कोर्टात सांगितले की, सर्व मोबाइल क्रमांकांना ई-केव्हाईसी व्हेरिफिकेशन अंतर्गत आधार कार्डसोबत जोडणं आवश्यक आहे. शिवाय, नवीन बँक खाते सुरू करण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक आहे. 

मोबाइल क्रमांक आधार कार्डला जोडण्याची सक्ती सरकारकडून केली जात असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी जनहित याचिकादेखील दाखल करण्यात आल्या होत्या. आधार कार्ड लिंक करणे म्हणजे खासगीपणाच्या हक्काचा (राइट टू प्रायव्हसी) भंग असल्याचा आक्षेप घेण्यात आलेल्या याचिकांवर घटनापीठाकडून सुनावणी घेण्यात येणार आहे. 

विशेष म्हणजे यावेळी सरकारनं असेही म्हटले आहे की, आधार कार्डची जोडणी न झाल्यानं देशात कुणाचाही भूकबळी गेलेला नाही. रेशन कार्ड आधार कार्डला न जोडल्याने धान्य नाकारण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये घडली होती. यामुळे 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालय