शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सर्वोच्च न्यायालयाचे सलग १० तास काम; ७५ खटल्यांची करण्यात आली सुनावणी; विविध याचिका निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 10:37 IST

न्यायालयाच्या नियमित वेळेपेक्षा अधिक तास या खंडपीठाने काम केले. 

नवी दिल्ली:सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने शुक्रवारी रात्री ९.१० वाजेपर्यंत विविध याचिकांची सुनावणी घेतली. या खंडपीठाने त्यादिवशी १० तास ४० मिनिटे सुनावणीचे काम केले. त्यामध्ये ७५ खटल्यांचा निपटारा करण्यात आला. न्यायालयाच्या नियमित वेळेपेक्षा अधिक तास या खंडपीठाने काम केले. 

सर्वोच्च न्यायालयाची कामकाजाची वेळ सकाळी साडेदहा ते संध्याकाळी चार इतकी असते. पुढील आठवड्यात दसऱ्याच्या सुट्टीनिमित्त न्यायालयाचे कामकाज बंद राहील.  त्यामुळे न्या. चंद्रचूड व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने शुक्रवारी दहा तासांहून अधिक काळ सुनावणीचे काम केले. रात्री नऊ वाजेपर्यंत सुनावणी सुरू ठेवण्याच्या निर्णयाला वकील व कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला.  सुनावणी संपताच खंडपीठाने वकील व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. (वृत्तसंस्था)

या दोन कारणांसाठीच पुढे ढकलणार सुनावणी

शुक्रवारसाठी सूचिबद्ध करण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती एका वकिलाने केली होती. त्यावर न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सांगितले की, याचिका सुनावणीसाठी सूचिबद्ध होत नाहीत, अशी तक्रार वकील करतात. मात्र, जेव्हा प्रकरण न्यायालयासमोर येते तेव्हा वकील सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करतात. सुनावणीची तारीख कोरोना साथ किंवा एखाद्याच्या मृत्यूची घटना या दोन कारणांमुळेच पुढे ढकलली जाऊ शकते, असे खंडपीठाने म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय