शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

केरळमधील सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावर आज सुप्रीम निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 10:02 IST

सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश नाही

नवी दिल्ली: केरळमधील सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबद्दल आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नाही. हा नियम घटनेच्या दृष्टीनं योग्य आहे की नाही, यावर आज सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ निकाल देईल. सबरीमाला मंदिरात विराजमान असणारे अयप्पा ब्रम्हचारी असल्यानं या मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नाही, अशी मंदिर प्रशासनाची भूमिका आहे. मंदिराकडून महिलांसोबत कोणताही भेदभाव केला जात नाही. त्यामुळे न्यायालयानं धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका मंदिर प्रशासनानं घेतली आहे. केरळच्या सबरीमाला मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी आहेत, अशी श्रद्धा आहे. याशिवाय सबरीमाला यात्रेच्या आधी 41 दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग 41 दिवस व्रत करू शकत नाहीत. त्यामुळेच 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. हा नियम संविधानाच्या दृष्टीनं योग्य आहे की नाही, याबद्दल आज सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ निर्णय देणार आहे. मागील सुनावणीत काय घडलं?मागील सुनावणीत मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांच्या वतीनं वकील साई दीपक यांनी बाजू मांडली. हे प्रकरण सामाजिक न्यायाचं नाही, असा दावा त्यांनी केला. 'मंदिर पर्यटनस्थळ नाही. याठिकाणी यायचं असल्यास देवावर श्रद्धा हवी. ज्यांचा देवाच्या सर्वमान्य स्वरुपावर विश्वास नाही, त्यांच्या याचिकांवर न्यायालयाकडून सुनावणी सुरू आहे,' असं साई दीपक म्हणाले. न्यायालयानं काय म्हटलं? धार्मिक नियम संविधानाच्या दृष्टीनं योग्य असायला हवेत, असं 5 न्यायाधीशांच्या घटनापीठातील डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं. 'कोणती गोष्ट धर्माचा अविभाज्य घटक आहे, याचा विचार न्यायालयानं का करावा? आम्ही न्यायाधीश आहोत. धर्माचे जाणकार नाहीत,' असं चंद्रचूड म्हणाले. 'धर्माच्या नियमांचं पालन करण्याच्या काही सीमा आहेत. धर्माच्या नियमांमुळे दुसऱ्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणू शकत नाही,' असं न्यायमूर्ती रोहिंग्टन नरीमन यांनी सुनावणीवेळी म्हटलं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयKeralaकेरळ