शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बिहार बालिकाश्रम बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सुओ मोटो दाखल; केंद्रासह राज्य सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 13:32 IST

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश 

नवी दिल्ली : बिहारमधील मुजफ्फरपूर येथील बालिकाश्रमातील मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं सुओ मोटो दाखल करुन घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयानं महिला आणि बालविकास मंत्रालय, बिहार सरकार आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला नोटीस पाठवली आहे. या धक्कादायक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं लक्ष घालावं, यासाठी सुओ मोटो दाखल करुन घेण्याची विनंती पाटण्यातील एका व्यक्तीनं केली होती. बिहारमधील बालिकागृहात घडलेली घटना अतिशय धक्कादायक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. याप्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयानं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला दिले आहेत. या प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्या माध्यमांनाही न्यायालयानं विशेष सूचना दिल्या आहेत. बलात्कार प्रकरणातील एकाही पीडित मुलीचं छायाचित्र समोर येणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना न्यायालयानं दिली आहे. याशिवाय पीडित मुलींच्या मुलाखती घेण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयानं वकील अपर्णा भट्ट यांची ऍमिकस क्युरी (न्याय मित्र) म्हणून नियुक्ती केली आहे. 

माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आल्यानंतर बिहारमध्ये राजकारण तापलं आहे. मुजफ्फरपूरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर डाव्या पक्षांनी आज बिहार बंदची हाक दिली आहे. या बंदला आरजेडी आणि काँग्रेस यांनी पाठिंबा दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजनाम्याची मागणी डाव्या पक्षांकडून केली जात आहे. याआधी माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी या प्रकरणाचा निषेध म्हणून सायकल रॅली काढली होती. 

टॅग्स :BiharबिहारRapeबलात्कारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय