शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सर्वाेच्च न्यायालयाची कृषी कायद्यांना स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 06:29 IST

समितीशी चर्चेस शेतकऱ्यांचा नकार; आंदोलन सुरूच राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांना सरकारने स्थगिती द्यावी अन्यथा ते काम आम्हाला करावे लागेल, अशा स्पष्ट शब्दांत केंद्र सरकारची कानउघाडणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त ठरलेल्या तीनही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला मंगळवारी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. तसेच या कायद्यांवरून केंद्र सरकार व शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला वाद मिटविण्यासाठी चार तज्ज्ञांची समितीही सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केली. मात्र, या समितीशी चर्चा करण्यास नकार दर्शवतानाच आंदोलन सुरूच ठेवण्याच्या मुद्द्यावर शेतकरी संघटना ठाम आहेत.

कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकासंचांवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठापुढे गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी केली होती. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने थेट कृषी कायद्यांच्या 

अंमलबजावणीवरच स्थगिती आणली. हा हंगामी आदेश असून त्यावर आठ आठवड्यांनी पुन्हा सुनावणी होणार आहे.कायद्यांच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणताना सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले की, ‘तीनही कायदे अंमलात येण्याआधीपासून किमान हमीभावाची जी पद्धत सुरू आहे तीच पुढीलआदेश येईपर्यंत सुरू ठेवावी. तसेच शेतकऱ्यांकडील जमिनींची संरक्षण केले जावे. कृषी कायद्यांतर्गत कोणाही शेतकऱ्याची जमीन हिरावून घेतली जाऊ नये’. तसेच सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापित तज्ज्ञ समिती सरकारची तसेच शेतकरी संघटनांची बाजू समजून घेईल आणि येत्या दोन महिन्यांत त्यांचा अहवाल न्यायालयात सादर करेल.  या समितीत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदरसिंह मान, शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष अनिल घनवट, आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेच्या दक्षिण आशिया विभागाचे संचालक प्रमोदकुमार जोशी आणि कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी या चौघांची समिती केंद्र आणि शेतकरी संघटना यांच्यातील वाद सोडविण्यासाठी प्रयत्न करेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले. समितीची पहिली बैठक दिल्लीत पुढील दहा दिवसांच्या आत व्हायला हवी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. खंडपीठात सरन्यायाधिशांव्यतिरिक्त न्यायाधीश ए. एस. बोपण्णा आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमणियन यांचाही समावेश आहे.

तज्ज्ञ समितीच्या सदस्यांवर आक्षेपसर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञ समितीसाठी जी चार नावे सुचवली आहेत त्यावर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. हे सर्व जण कृषी कायद्यांचे समर्थक असल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. तसेच ही तर सरकारी समिती असून त्यांच्याशी काय चर्चा करायची असा सवाल आंदोलकांचे नेते योगेंद्र यादव यांनी उपस्थित केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या इच्छेविरूद्ध असला तरी त्यांनी दिलेले निर्देश सर्वमान्य आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचेेही स्वागत करतो.- कैलास चौधरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री

तीनही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणण्याच्या तसेच चार जणांच्या समिती स्थापन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. - शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री

कोर्टाची निरीक्षणे n तज्ज्ञांची समिती दोन्ही पक्षांची बाजू समजून घेण्यासाठी स्थापन केली आहे. समिती स्थापन करण्यापासून न्यायालयाला कोणीही रोखू शकत नाही. आंदोलक शेतकऱ्यांनी समितीला सहकार्य करावेn वाद मिटावा, असे ज्यांना खरोखरच वाटत असेल, ते समितीपुढे आपल्या समस्या मांडतीलn शेतकऱ्यांनी शिस्तबद्ध रीतीने आंदोलन सुरू ठेवले आहे. आंदोलनात कुठेही गडबडगोंधळ नाही.  त्यासाठी शेतकरी कौतुकास पात्र आहेत. n आंदोलन थांबवू शकत नसलो, तरी शेतकऱ्यांच्या नेत्यांनी आंदोलकांना घरी जाण्यासाठी उद्युक्त करायला हवे. ते सगळ्यांच्या हिताचे ठरेल

स्थगिती देण्याचा आम्हाला अधिकार - सर्वोच्च न्यायालयसंसदेद्वारा मंजुरी मिळालेल्या आणि घटनात्मक असलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देऊ शकत नाही, हा केंद्र सरकारचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. वैधानिक अधिनियमांतर्गत कार्यकारी मंडळाच्या कोणत्याही कृतीवर स्थगिती आणण्याचा अधिकार आम्हाला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. केंद्र सरकारची बाजू मांडताना महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी मूलभूत हक्कांचे अथवा घटनेचे उल्लंघन होत आहे, असे निदर्शनास येत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय कोणत्याही कायद्यावर स्थगिती आणू शकत नाही, असा युक्तिवाद केला. 

टॅग्स :Courtन्यायालयFarmer strikeशेतकरी संप