शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

Lockdown: योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; लॉकडाऊनच्या आदेशाला स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 14:19 IST

Lockdown: याचिकेसंदर्भात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला दिलासा दिला आहे.

ठळक मुद्देयोगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासालॉकडाऊनच्या आदेशाला स्थगितीएका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असून, उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी सरकारला काही शहरांमध्ये लॉकडाऊन लावावा, असे आदेश दिले होती. मात्र, या निकालाविरोधात योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेसंदर्भात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला दिलासा दिला आहे. (supreme court stays allahabad high court order for imposing lockdown in five cities in uttar pradesh)

उत्तर प्रदेशमधील कोरोनाच्या गंभीर होत चाललेच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लखनऊ, वाराणसी, कानपूर, गोरखपूर व अलाहाबाद (प्रयागराज) या शहरांमध्ये आठवडाभरासाठी सक्तीचा लॉकडाउन लागू करावा, असे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी सरकारला देत दणका दिला होता. मात्र, उच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाविरोधात योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. योगी सरकारची याचिका लगेच दाखल करून घेत त्यावर तातडीची सुनावणी करण्यात आली. 

“माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव”

लॉकडाऊन लावणे योग्य भूमिका नाही

योगी सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाने दिलेल्या काही सूचना गरजेच्या आहेत, मात्र पाच शहरांमध्ये लॉकडाऊन लावणे योग्य भूमिका नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने काही सूचना दिल्या असून पूर्वकाळजी घेतली जात आहे. पाच शहरांमध्ये लॉकडाउन लावल्याने प्रशासनासमोर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, असा युक्तिवाद त्यांनी केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत कोरोनाला रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कोणती पावले उचलली आणि उपाययोजना केल्यात, याची माहिती देणारा अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

उच्च न्यायालयाने काय दिला आदेश?

उत्तर प्रदेशमधील परिस्थिती पाहता जनतेला सुरुवातीला एका आठवड्यासाठी घराबाहेर पडण्यापासून रोखण्यात आले, तर करोना संसर्गाची सध्याची साखळी तोडली जाऊ शकते. यामुळे वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे मत व्यक्त करत प्रयागराज, लखनऊ, वाराणसी, कानपूर शहर व गोरखपूर या शहरांमध्ये लॉकडाऊन करून त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश न्या. सिद्धार्थ वर्मा व न्या. अजित कुमार यांच्या खंडपीठाने दिला होता. विलगीकरण केंद्रांची अवस्था आणि करोना रुग्णांवरील उपचारांची परिस्थितीबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. 

दरम्यान, कोरोनाप्रसार रोखण्यासाठी निर्बंध आवश्यक असून, सरकारने यासाठी अनेक पावले उचलली आहेत. पण, जीव वाचवण्याइतकेच रोजगार वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरांमध्ये पूर्ण लॉकडाउन राबवणे अशक्य आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळेत संचारबंदीचे आदेश देण्यात आले असून, १५ मे पर्यंत संपूर्ण राज्यात दर रविवारी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती योगी सरकारकडून देण्यात आली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याyogi adityanathयोगी आदित्यनाथSupreme Courtसर्वोच्च न्यायालय