शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

Lockdown: योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; लॉकडाऊनच्या आदेशाला स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 14:19 IST

Lockdown: याचिकेसंदर्भात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला दिलासा दिला आहे.

ठळक मुद्देयोगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासालॉकडाऊनच्या आदेशाला स्थगितीएका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असून, उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी सरकारला काही शहरांमध्ये लॉकडाऊन लावावा, असे आदेश दिले होती. मात्र, या निकालाविरोधात योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेसंदर्भात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला दिलासा दिला आहे. (supreme court stays allahabad high court order for imposing lockdown in five cities in uttar pradesh)

उत्तर प्रदेशमधील कोरोनाच्या गंभीर होत चाललेच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लखनऊ, वाराणसी, कानपूर, गोरखपूर व अलाहाबाद (प्रयागराज) या शहरांमध्ये आठवडाभरासाठी सक्तीचा लॉकडाउन लागू करावा, असे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी सरकारला देत दणका दिला होता. मात्र, उच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाविरोधात योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. योगी सरकारची याचिका लगेच दाखल करून घेत त्यावर तातडीची सुनावणी करण्यात आली. 

“माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव”

लॉकडाऊन लावणे योग्य भूमिका नाही

योगी सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाने दिलेल्या काही सूचना गरजेच्या आहेत, मात्र पाच शहरांमध्ये लॉकडाऊन लावणे योग्य भूमिका नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने काही सूचना दिल्या असून पूर्वकाळजी घेतली जात आहे. पाच शहरांमध्ये लॉकडाउन लावल्याने प्रशासनासमोर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, असा युक्तिवाद त्यांनी केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत कोरोनाला रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कोणती पावले उचलली आणि उपाययोजना केल्यात, याची माहिती देणारा अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

उच्च न्यायालयाने काय दिला आदेश?

उत्तर प्रदेशमधील परिस्थिती पाहता जनतेला सुरुवातीला एका आठवड्यासाठी घराबाहेर पडण्यापासून रोखण्यात आले, तर करोना संसर्गाची सध्याची साखळी तोडली जाऊ शकते. यामुळे वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे मत व्यक्त करत प्रयागराज, लखनऊ, वाराणसी, कानपूर शहर व गोरखपूर या शहरांमध्ये लॉकडाऊन करून त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश न्या. सिद्धार्थ वर्मा व न्या. अजित कुमार यांच्या खंडपीठाने दिला होता. विलगीकरण केंद्रांची अवस्था आणि करोना रुग्णांवरील उपचारांची परिस्थितीबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. 

दरम्यान, कोरोनाप्रसार रोखण्यासाठी निर्बंध आवश्यक असून, सरकारने यासाठी अनेक पावले उचलली आहेत. पण, जीव वाचवण्याइतकेच रोजगार वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरांमध्ये पूर्ण लॉकडाउन राबवणे अशक्य आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळेत संचारबंदीचे आदेश देण्यात आले असून, १५ मे पर्यंत संपूर्ण राज्यात दर रविवारी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती योगी सरकारकडून देण्यात आली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याyogi adityanathयोगी आदित्यनाथSupreme Courtसर्वोच्च न्यायालय