शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर सुप्रीम कोर्टाची तीव्र नाराजी; ममता बॅनर्जी सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 15:09 IST

West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर होत असलेल्या पलायनासंदर्भात एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमधील हिंसाचारावर सुप्रीम कोर्टाची तीव्र नाराजीममता बॅनर्जी सरकारला उत्तर देण्याचे निर्देशनिवडणूक निकालानंतर बंगालमध्ये मोठा हिंसाचार

कोलकाता:पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर झालेल्या हिंसाचारावरून सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याप्रकरणी राज्य सरकारला चांगलेच सुनावत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर होत असलेल्या पलायनासंदर्भात एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. (supreme court slams mamata banerjee govt over west bengal violence)

न्या. विनीत शरण आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाला पक्षकार करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पश्चिम बंगाल सरकारने कथित पलायन थांबवावे आणि या हिंसाचाराच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले. 

निवडणूक निकालानंतर बंगालमध्ये मोठा हिंसाचार

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर मोठा हिंसाचार घडल्याचे पाहायला मिळाले. नंदीग्राम येथील भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्यानंतर शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी तसेच अन्य नागरिकांनी पश्चिम बंगालमधून पलायन केले होते. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील पलायन रोखण्यासंदर्भात एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. 

पोलिसांकडून योग्य तपास नाही

पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर अनेकांनी सामूहिक पलायन केले. तर अनेकांनी स्थलांतर केले. पोलीस आणि राज्य प्रायोजित गुंड यांची मिलिभगत आहे. त्यामुळे पोलिसांकडून योग्य तपास केला जात नाही. सुरक्षा पुरवण्यात पोलीस अपयशी ठरत असल्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका असून, आतापर्यंत एक लाखांहून अधिक नागरिकांनी स्थलांतर केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.   

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल