शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 18:18 IST

Arvind Kejriwal : न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर सुनावणी सुरू आहे.

Arvind Kejriwal Bail : नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी निर्णय देणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी आदेश येऊ शकतो. आज म्हणजेच बुधवारच्या कामकाजानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी ईडीच्या वकिलाला सांगितले की, या प्रकरणाबाबत शुक्रवारी आदेश दिला जाऊ शकतो.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला, तर या कालावधीत ते त्यांच्या कार्यालयात जाणार नाहीत. यावर, अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा हवाला देऊन सांगितले होते की, या कालावधीत ते कार्यालयात जाणार नाहीत.

या कालावधीत अरविंद केजरीवाल कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी करणार नसल्याचे अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले होते. त्यासाठी एक अट ठेवत अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हणाले होते की, या काळात मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी नसल्यास दिल्लीच्या उपराज्यपालांनी फायली परत पाठवू नयेत. तसेच,  जामिनावर असताना त्यांनी आपली अधिकृत कर्तव्ये पार पाडली तर त्याचे व्यापक परिणाम होऊ शकतात आणि हितसंबंधांच्या संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

दरम्यान, ईडीच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात युक्तीवाद केला होता. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांच्यावरील कोणत्याही उदारतेला विरोध केला. तसेच, असे केले तर राजकारण्यांसाठी वेगळा कायदा पाळल्यासारखे होईल, असे तुषार मेहता म्हणाले. याशिवाय, शेतकरी आणि दुकान मालकाचे उदाहरण देत तुषार मेहता म्हणाले की, कापणीच्या वेळी शेतकऱ्याने जामीन मागितला तर त्यालाही जामीन मिळेल का?

अरविंद केजरीवालांना कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आलीय?आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर दिल्ली मद्य धोरणाद्वारे काही लोकांना फायदा मिळवून देण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नावाचा समावेश आहे. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय