शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

अयोध्या प्रकरणावर मध्यस्थी होणार की नाही? सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 13:40 IST

दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांची नियुक्ती करावी की नाही यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली यावर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. संध्याकाळपर्यत सुप्रीम कोर्टाचा निर्णय देशासमोर येऊ शकतो

दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद विवादीत जमीन प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांची नियुक्ती करावी की नाही यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने अय़ोध्या प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला आहे. संध्याकाळपर्यत सुप्रीम कोर्टाचा निर्णय देशासमोर येऊ शकतो.

 

मात्र मध्यस्थीकडे हे प्रकरण सोपवण्याला हिंदू समाज पार्टी वकीलांनी विरोध केला तर निर्मोही आखाडा आणि मुस्लिम पक्षकार मध्यस्थाच्या चर्चेसाठी तयार झाले. तासभर झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. अयोध्या वाद दोन पक्षकारांचा नसून धार्मिक भावनेचा विषय आहे. त्यामुळे जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही पक्षकार इथे आहात. त्यामुळे सामोपचाराने तोडगा काढण्यावर सुप्रीम कोर्टाचा भर दिला. न्या. बोबडे यांनी पक्षकारांनी सहमतीने घेतलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाची मोहोर असेल असे मत मांडले. तसेच या संवेदनशील प्रकरणावर मध्यस्थी करताना मध्यस्थांकडून केलेला तोडगा गोपनीय ठेवावा. गरज भासल्यास प्रक्रियेदरम्यान माध्यमांनीही यावर भाष्य करू नये, असं न्या. बोबडे यांनी सांगितले. 

याबाबत मुख्य सरन्यायाधीश यांनी रंजन गोगोई यांनीही दोन्ही पक्षकारांनी मध्यस्थांचे नाव सुचवा. एकाहून अधिक मध्यस्थांची समिती नेमली जाऊ शकते. आम्ही त्यास मंजुरी देऊ, अशी मतं मांडली.

मात्र मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन हे जाणूनबुजून अयोध्या प्रकरणी विलंब करत आहेत. मध्यस्थी करणे म्हणजे वेळकाढूपणाचे धोरण असून  धवन प्रत्येकवेळी सुनावणी पुढे कशी जाईल यासाठी प्रयत्नशील असतात, असा आरोप हिंदू समाज पार्टीच्या वकीलांनी केला. 

दरम्यान सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणावर दोन्ही पक्षकारांनी सहमतीचे तोडगा काढवा यावर भर दिला आहे. एक तासाच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत अयोध्या प्रकरणी मध्यस्थांची नियुक्ती करावी का याबाबत निर्णय देणार आहे. 

गेल्या अनेक वर्षापासून सुप्रीम कोर्टात राम जन्मभूमी - बाबरी मस्जिद जमीन वाद प्रकरणावर सुनावणी होत आहे. मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह 5 न्यायाधीशांचे खंडपीठ याबाबत सुनावणी करत आहे. 9 जुलै 2017 रोजीही दोन्ही पक्षकारांची बैठक झाली होती, मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर ऑगस्ट 2017 दरम्यान हिंदू महासभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य सरन्यायाधीशांना अयोध्या प्रकरणावर मध्यस्थी मार्ग काढावा असं पत्र लिहून मागणी केली होती, अशी माहिती हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी दिली.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHinduहिंदूMuslimमुस्लीम