शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

अयोध्या प्रकरणावर मध्यस्थी होणार की नाही? सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 13:40 IST

दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांची नियुक्ती करावी की नाही यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली यावर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. संध्याकाळपर्यत सुप्रीम कोर्टाचा निर्णय देशासमोर येऊ शकतो

दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद विवादीत जमीन प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांची नियुक्ती करावी की नाही यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने अय़ोध्या प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला आहे. संध्याकाळपर्यत सुप्रीम कोर्टाचा निर्णय देशासमोर येऊ शकतो.

 

मात्र मध्यस्थीकडे हे प्रकरण सोपवण्याला हिंदू समाज पार्टी वकीलांनी विरोध केला तर निर्मोही आखाडा आणि मुस्लिम पक्षकार मध्यस्थाच्या चर्चेसाठी तयार झाले. तासभर झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. अयोध्या वाद दोन पक्षकारांचा नसून धार्मिक भावनेचा विषय आहे. त्यामुळे जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही पक्षकार इथे आहात. त्यामुळे सामोपचाराने तोडगा काढण्यावर सुप्रीम कोर्टाचा भर दिला. न्या. बोबडे यांनी पक्षकारांनी सहमतीने घेतलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाची मोहोर असेल असे मत मांडले. तसेच या संवेदनशील प्रकरणावर मध्यस्थी करताना मध्यस्थांकडून केलेला तोडगा गोपनीय ठेवावा. गरज भासल्यास प्रक्रियेदरम्यान माध्यमांनीही यावर भाष्य करू नये, असं न्या. बोबडे यांनी सांगितले. 

याबाबत मुख्य सरन्यायाधीश यांनी रंजन गोगोई यांनीही दोन्ही पक्षकारांनी मध्यस्थांचे नाव सुचवा. एकाहून अधिक मध्यस्थांची समिती नेमली जाऊ शकते. आम्ही त्यास मंजुरी देऊ, अशी मतं मांडली.

मात्र मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन हे जाणूनबुजून अयोध्या प्रकरणी विलंब करत आहेत. मध्यस्थी करणे म्हणजे वेळकाढूपणाचे धोरण असून  धवन प्रत्येकवेळी सुनावणी पुढे कशी जाईल यासाठी प्रयत्नशील असतात, असा आरोप हिंदू समाज पार्टीच्या वकीलांनी केला. 

दरम्यान सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणावर दोन्ही पक्षकारांनी सहमतीचे तोडगा काढवा यावर भर दिला आहे. एक तासाच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत अयोध्या प्रकरणी मध्यस्थांची नियुक्ती करावी का याबाबत निर्णय देणार आहे. 

गेल्या अनेक वर्षापासून सुप्रीम कोर्टात राम जन्मभूमी - बाबरी मस्जिद जमीन वाद प्रकरणावर सुनावणी होत आहे. मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह 5 न्यायाधीशांचे खंडपीठ याबाबत सुनावणी करत आहे. 9 जुलै 2017 रोजीही दोन्ही पक्षकारांची बैठक झाली होती, मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर ऑगस्ट 2017 दरम्यान हिंदू महासभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य सरन्यायाधीशांना अयोध्या प्रकरणावर मध्यस्थी मार्ग काढावा असं पत्र लिहून मागणी केली होती, अशी माहिती हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी दिली.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHinduहिंदूMuslimमुस्लीम