शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

Vidhan Parishad Election 2022: नाही म्हणजे नाहीच! देशमुख-मलिकांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही; मतदानाची परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 15:56 IST

Vidhan Parishad Election 2022: सुप्रीम कोर्टानेही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी नाकारत कोणताही दिलासा दिलेला नाही.

नवी दिल्ली: आताच्या घडीला महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीसह भाजपच्या जवळपास सर्वच आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता काही वेळातच मतमोजणीची प्रक्रियाही सुरू होईल. मात्र, एक शेवटचा प्रयत्न म्हणून ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मतदानाची परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेहीअनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना दिलासा देण्यास नकार दिला असून, मतदानाची परवानगी नाकारली आहे. महाविकास आघाडीसाठी पुन्हा हा एक मोठा धक्का मानला जात आहे. 

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी राज्यसभा निवडणुकीतही मतदान करता यावे, यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने या दोन्ही नेत्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. आता पुन्हा एकदा अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावतीने विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मिळावी, यासाठी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या दोन्ही नेत्यांना विधान परिषद निवडणुकीसाठी परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला. 

नेमकं काय झालं सर्वोच्च न्यायालयात?

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळण्यास उशीर झाल्यामुळे या दोन्ही नेत्यांनी सोमवार सकाळीच सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली. दुपारी साधारण २ वाजेच्या सुमारास ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आली. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण होईपर्यंत सुमारे ३.३० वाजले. यानंतर केवळ अर्धा तास उरलेला असताना, अनिल देशमुख आणि नवाब मलिक मतदानासाठी कसे पोहोचणार, असा सवाल न्यायालयाने केला. यावर शेवटचे काही क्षण महत्त्वाचे आहेत. आम्ही त्याची व्यवस्था करू, असे देशमुख आणि मलिक यांच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. तसेच तीन दिवसांपूर्वी तुम्ही याचिका दाखल केली असती किंवा मतदानाला आणखी तीन दिवस शिल्लक असते, तर तुमच्या याचिकेवर काहीतरी विचार केला असता, असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी नमूद केले. 

दरम्यान, उच्च न्यायालयात केवळ मतदानाच्या दिवशी मत टाकण्यासाठी पोलिस सुरक्षा व्यवस्थेत पाठवण्याचे निर्देश द्यावेत, एवढीच मर्यादित विनंती असल्याचे मलिक आणि देशमुखांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. तर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ६२(५) अन्वये कोणत्याही प्रकारच्या कैद्याला कोणत्याही निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकारच नाही. मग न्यायालयाने विशेषाधिकारात परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तीवाद ईडीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी केला. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर गुरुवारी न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता. तर, शुक्रवारी दुपारी या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला. या निकालाची प्रत रात्री उशिरापर्यंत मिळालेली नव्हती.  

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयAnil Deshmukhअनिल देशमुखnawab malikनवाब मलिकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी